साठ्याच्या दुप्पट पाणी वाटपाचा हिशोब!
By Admin | Updated: September 15, 2014 23:24 IST2014-09-15T21:20:24+5:302014-09-15T23:24:46+5:30
अधिकाऱ्याचा जावईशोध : साठवण क्षमता ५.८५ टीएमसी

साठ्याच्या दुप्पट पाणी वाटपाचा हिशोब!
एकनाथ माळी - तारळे -तारळी धरणातील पाणीसाठा व त्याचा होणारा वापर याबाबत अधिकारीच अनभिज्ञ असल्याची माहिती समोर आली आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ५.८५ टीएमसी असताना चक्क १० टीएमसी पाणी वाटप होणार असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे़ याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करूनही संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही सांगतो, एवढेच उत्तर त्यांच्याकडून दिले जात आहे़
मुरूड येथे सुमारे ५़८५ टीएमसी पाणीसाठ्याचे धरण बांधण्यात आले आहे़ बांबवडे, तारळे या दोन उपसा सिंचन योजना पूर्ण झाल्या असून, धुमाकवाडी, आवर्डे, कोंजवडे या उपसा सिंचन योजनांची कामे काही दिवसांत सुरू होणार आहेत़ पन्नास मीटर हेडने शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्यात येणार आहे़ या धरणामुळे पाटण तालुक्यासह कऱ्हाड, सातारा, माण, खटाव तालुक्यांतील शेती सुजलाम्-सुफलाम् होणार आहे़ मात्र, तारळे विभागातील व इतर तालुक्यात देण्यात येणारे पाणी किती प्रमाणात देण्यात येणार, हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे़
तारळी धरणक्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने यावर्षी अल्पावधीतच धरण भरून वाहू लागले़ धरणातील पाणीसाठ्याचा वापर शेती व अन्य कारणासाठी किती होणार, याची बहुतांश लोकांना माहितीच नाही़ अशातच काही दिवसांतच तारळे व बांबवडे उपसा सिंचन योजनांच्या पोटपाटाचे काम सुरू होणार आह़े यासाठी संबंधित विभागाच्या परूळेकर नामक अधिकाऱ्याकडे ग्रामस्थांनी पाणी वापराबाबत चौकशी केली़ त्यावेळी त्यांनी दिलेली आकडेवारी व पाणीसाठा यामध्ये फारच तफावत दिसून आली़ संबंधित अधिकाऱ्यांना चूक निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना ‘पुन्हा माहिती देतो,’ असे सांगितले़ त्यानंतर मात्र त्या अधिकाऱ्याने फोन घेणेच टाळले़ धरणाची पाणी साठवण क्षमता ५़८५ टीएमसी असताना अधिकाऱ्याने ९़०५, ८़८४, ७़४९, ६़३७ टीएमसी असा पाणी वाटपाचा हिशोब सांगितला आह़े़ वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही ही गोष्ट गांभीर्र्याने घेतली नाही़