शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
4
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
5
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
6
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
7
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
8
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
9
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
10
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
11
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
12
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
13
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
14
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
15
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
16
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
17
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
18
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
20
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

उजळला लोणंदचा पालखीतळ !

By admin | Updated: June 27, 2014 00:57 IST

लोकमत इफेक्ट : अखेर नीरा नदीपात्रात वीर धरणातून पाणी; स्नानाचा मार्ग मोकळा

लोणंद : ज्ञानोबा माउलींच्या पालखीचे जिल्ह्यात शुक्रवार, दि. २७ रोजी आगमन होत आहे. जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा नदीत पादुकांना स्नान घालण्याची परंपरा आहे. मात्र, नदी कोरडी असल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. यावर मार्ग काढण्यासाठी वीर धरणातून पाणी सोडले आहे. दरम्यान, लोणंदचा पालखीतळ विद्युत रोषणाईने झगमगला आहे.‘साधुसंत येति घरा, तोचि दिवाळी दसरा’ याप्रमाणे दरवर्षी ज्ञानोबा माउलींची पालखी अन् वारकऱ्यांचे स्वागत केले जाते. जिल्ह्यात प्रवेश करत असताना माउलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घातले जाते. वारकऱ्यांच्या दृष्टीने या स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यानंतर प्रशासनातर्फे पालखीचे स्वागत केल्यानंतर लोणंद मुक्कामी स्थिरावते. सातारा जिल्ह्यात मान्सूनने दडी मारली आहे. यामुळे वीर धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. यामुळे नीरा नदी कोरडी पडल्याने माउलींच्या पादुका व वारकऱ्यांच्या स्नानाचा प्रश्न निर्माण झाला. यासंदर्भात ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात ‘कैसे करावे नीरास्नान... यक्षचि प्रश्ने’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन वीर धरणातील सातशे क्युसेक उर्वरित पाणी धरण व्यवस्थापनाने नीरा नदीत सोडले. हे पाणी आज (गुरुवारी) दुपारी लोणंद हद्दीत आले. लोणंद शहरातही सध्या पाणीटंचाई भासत आहे. या पाण्यामुळे लोणंदमध्ये पाण्याची सोय होणार आहे. ग्रामपंचायतीवरील ताण यामुळे कमी होणार आहे. हेच पाणी पुढे अडीच दिवस लोणंद मुक्कामी येत असलेल्या वारीतील भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून लोणंद ग्रामपंचायतीने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. याअंतर्गत विविध भागात विद्युत दिवे लावण्यात आले. यावेळी सरपंच स्नेहलता शेळके-पाटील, वीजवितरणचे सहायक अभियंता मोहन सूळ, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी शेळके, गीतांजली क्षीरसागर, भरत बोडरे, तुकाराम क्षीरसागर, अनुप्रिता शेडे, ग्रामविकास अधिकारी लालासाहेब निंबाळकर उपस्थित होते. (वार्ताहर)