शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

उजळला लोणंदचा पालखीतळ !

By admin | Updated: June 27, 2014 00:57 IST

लोकमत इफेक्ट : अखेर नीरा नदीपात्रात वीर धरणातून पाणी; स्नानाचा मार्ग मोकळा

लोणंद : ज्ञानोबा माउलींच्या पालखीचे जिल्ह्यात शुक्रवार, दि. २७ रोजी आगमन होत आहे. जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा नदीत पादुकांना स्नान घालण्याची परंपरा आहे. मात्र, नदी कोरडी असल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. यावर मार्ग काढण्यासाठी वीर धरणातून पाणी सोडले आहे. दरम्यान, लोणंदचा पालखीतळ विद्युत रोषणाईने झगमगला आहे.‘साधुसंत येति घरा, तोचि दिवाळी दसरा’ याप्रमाणे दरवर्षी ज्ञानोबा माउलींची पालखी अन् वारकऱ्यांचे स्वागत केले जाते. जिल्ह्यात प्रवेश करत असताना माउलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घातले जाते. वारकऱ्यांच्या दृष्टीने या स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यानंतर प्रशासनातर्फे पालखीचे स्वागत केल्यानंतर लोणंद मुक्कामी स्थिरावते. सातारा जिल्ह्यात मान्सूनने दडी मारली आहे. यामुळे वीर धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. यामुळे नीरा नदी कोरडी पडल्याने माउलींच्या पादुका व वारकऱ्यांच्या स्नानाचा प्रश्न निर्माण झाला. यासंदर्भात ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात ‘कैसे करावे नीरास्नान... यक्षचि प्रश्ने’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन वीर धरणातील सातशे क्युसेक उर्वरित पाणी धरण व्यवस्थापनाने नीरा नदीत सोडले. हे पाणी आज (गुरुवारी) दुपारी लोणंद हद्दीत आले. लोणंद शहरातही सध्या पाणीटंचाई भासत आहे. या पाण्यामुळे लोणंदमध्ये पाण्याची सोय होणार आहे. ग्रामपंचायतीवरील ताण यामुळे कमी होणार आहे. हेच पाणी पुढे अडीच दिवस लोणंद मुक्कामी येत असलेल्या वारीतील भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून लोणंद ग्रामपंचायतीने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. याअंतर्गत विविध भागात विद्युत दिवे लावण्यात आले. यावेळी सरपंच स्नेहलता शेळके-पाटील, वीजवितरणचे सहायक अभियंता मोहन सूळ, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी शेळके, गीतांजली क्षीरसागर, भरत बोडरे, तुकाराम क्षीरसागर, अनुप्रिता शेडे, ग्रामविकास अधिकारी लालासाहेब निंबाळकर उपस्थित होते. (वार्ताहर)