शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
2
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
3
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
4
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
5
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
6
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
7
WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार! नवीन फीचर कॉल मॅनेजमेंटला सुपरफास्ट बनवणार
8
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
9
देसी सुपरस्टार मनोज वाजपेयींच्या 'भैय्याजी'चा अ‍ॅक्शनपॅक ट्रेलर भेटीला
10
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
11
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
12
दमदार इंजिन अन् शानदार मायलेज; लॉन्च झाली नवीन मारुती Swift, जाणून घ्या किंमत...
13
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
14
KL Rahul ला झापणाऱ्या संजीव गोएंका यांनी MS Dhoni लाही अचानक कर्णधारपदावरून हटवले होते... 
15
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
16
Go Digit IPO : १५ मे पासून खुला होतोय 'हा' IPO, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजी; Virat Kohli ची आहे गुंतवणूक
17
अक्षय्य तृतीया: ‘असे’ कसे करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, अद्भूत योग, महत्त्व अन् मान्यता
18
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
19
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
20
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा

ब्रेक द चेन; पण उपाययोजना शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 4:38 AM

सचिन काकडे राज्य शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ मोहीम हाती घेतली आहे. मात्र, सातारा जिल्ह्यात ही साखळी ...

सचिन काकडे

राज्य शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ मोहीम हाती घेतली आहे. मात्र, सातारा जिल्ह्यात ही साखळी तुटण्याचे नाव घेईना. गतवर्षी जिल्हा व स्थानिक प्रशासनाकडून राबविल्या जाणाऱ्या उपाययोजना आता ढिम्म झाल्याने अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.

जिल्ह्यात गतवर्षी सुरुवातीचे तीन महिने कोरोनाचे संक्रमण पूर्णतः नियंत्रणात होते. यावेळी जिल्हा व स्थानिक प्रशासनाकडून कोरोनाला रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात आल्या. ज्याठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळून येईल, असा परिसर तातडीने सील केला जात होता. त्या परिसरातील सर्व नागरिकांची सलग चौदा दिवस आरोग्य तपासणी केली जात होती. यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल केले जात होते. संशयितांना अलगीकरण कक्षात ठेवले जात होते. बाधित रुग्ण आढळलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला जात होता. याठिकाणी सर्व अत्यावश्यक सेवा-सुविधा पुरविल्या जात होत्या. आता मात्र एखादे घर किंवा अपार्टमेंट सील केली जात आहे. त्या परिसरात गृहभेटीद्वारे सर्वेक्षण केले जात नाही. नागरिकांच्या आरोग्याच्या नोंदी घेतल्या जात नाहीत. कोण बाहेरून आला, कोण नाही, याचा तपशीलही आता प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे.

स्थानिक पालिका प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठी विशेष पथके तयार केली होती. यामध्ये अंगणवाडी सेविका, शिक्षक, पालिका कर्मचारी आदींचा समावेश होता. ही पथके प्रभागातील प्रत्येक घराला भेट देत होती. आता रुग्णसंख्या वाढत असतानाही अशा कोणत्याही उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात नाहीत. संपूर्ण शहरात गल्ली-बोळात निर्जंतुकीकरण मोहीम राबवली जात होती. ही मोहीमही पूर्णतः थंडावली आहे. जिल्ह्यात, शहरात परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना आता कसलीच धास्ती राहिलेली नाही. कोणीही केव्हाही व कधीही घराकडे येऊ शकतो व जाऊ शकतो. जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तीची ना कोणती तपासणी केली जाते ना कोणत्या नोंदी ठेवल्या जातात.

ज्या भागात रुग्णसंख्या अधिक असेल, अशा भागातील रहिवाशांची प्रशासनाकडून सक्तीने कोरोना चाचणी केली जायची. आता रुग्ण वाढत असताना अशी शिबिरे बंद झाली आहेत.

(चौकट)

प्रयत्न आले होते कामी...

१. फिजिकल डिस्टन्सचे पालन व्हावे, यासाठी भाजी विक्रेते, दुकानदार सर्वांनाच सुरक्षित अंतराचे पट्टे आखणे बंधनकारक केले होते. हे पट्टे आता गायब झाले आहेत.

२. प्रशासनाकडून राबविल्या जाणाऱ्या या उपाययोजनांमुळे दिवाळीनंतर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या पूर्णतः नियंत्रणात होती. मात्र, आता कोरोनाचा उद्रेक होत असताना या उपाययोजना मात्र बंद आहेत.

३. कोरोना प्रतिबंधासाठी वर्षभरापासून झटणाऱ्या शासकीय यंत्रणेवर कामकाजाचा प्रचंड ताण आहे. मनुष्यबळ अपुरे पडत आहे. मात्र, असे असले तरी मुख्यत: गतवर्षी हीच यंत्रणा कोरोना प्रतिबंधासाठी जीवतोड मेहनत घेत होती आणि त्याचे चांगले परिणाम कालांतराने समोर आले.

४. त्यामुळे प्रशासनाने गाफील न राहता उपाययोजनांची तीव्रता अधिक गतिमान करणे गरजेचे आहे.