शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईतही अरबवाडी तलावातून बेसुमार पाणीउपसा

By admin | Updated: February 29, 2016 00:59 IST

वीजपुरवठा खंडीत करावा : महावितरणच्या मदतीने परवानाधारक शेतकऱ्यांची मनमानी

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागातील नांदवळ धरणातील बेसुमार पाणी उपशानंतर आता याच परिसरातील अरबवाडी पाझर तलावातूनही परवानाधारक शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीसाठी पाणीउपसा करत आहेत. यामुळे गावावर पाण्याचे मोठे संकट निर्माण होणार आहे. प्रशासनाने पाणी उपशावर बंदी घालून महावितरणने या शेतकऱ्यांच्या मोटारींची वीजजोडणी खंडीत करावी, अशी मागणी अरबवाडी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील जवळपास ४७ गावातील शेती व माणसांची तहान भागवणाऱ्या तळहिरा, अरबवाडी व नांदवळ या तीन धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. सध्या दुष्काळाचे सावट या भागात दिसत आहे. अनेक गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. असे असतानाही या धरणातून पाणी उपशाला परवानगी दिली गेल्याने शासनाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.अरबवाडी पाझर तलावात सध्या अत्यल्प पाणी शिल्लक आहे. या धरणातून शेतीसाठी पाणीउपसा करण्याचा अनेक शेतकऱ्यांकडे परवाने आहेत, मात्र सध्याच्या भीषण दुष्काळी परिस्थितीत या धरणातील पाणी उपसा झाल्यास आगामी ४ ते ५ महिन्यांच्या दुष्काळात लोकांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल. याशिवाय जनावरांच्या पाण्याचाही मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. यासाठी आतापासूनच असलेले पाणी शिल्लक राहावे, अशी मागणी अरबवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे दिली आहे यासाठी महावितरणला जबाबदार धरुन प्रशासनाने या ठिकाणी सुरु असलेल्या वीजपंपांचा वीजपुरवठा खंडित करावा, अशी प्रमुख मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. (वार्ताहर)अरबवाडी, बनवडी, दुधनवाडी या गावांसाठी दुष्काळात आधार असलेल्या अरबवाडी धरणातून सध्या सुरु असलेल्या पाणीउपशाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन उपसाबंदी बंद करावी. - तानाजीराव गोळे, चेअरमन, अरबवाडी सोसायटी