शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मागवला मोबाईल अन् हातात पडला बूट, नामांकित वस्तू स्वस्तात देत असल्याचे आमिष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 16:05 IST

काही दिवसांपूर्वी मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. समोरून नामांकित कंपनीचा मोबाईल केवळ चार हजार रुपयांत मिळत असल्याचे सांगण्यात आले. या कॉलवर विश्वास ठेवून युवकाने लगेचच मोबाईलही बुक केला. काही दिवसांतच टपाल कार्यालयात त्याच्या नावाचे पार्सल आले.

ठळक मुद्देमागवला मोबाईल अन् हातात पडला बूटनामांकित वस्तू स्वस्तात देत असल्याचे आमिषऔंध परिसरात अनेकांची मोबाईल कॉलद्वारे फसवणूक

औंध : काही दिवसांपूर्वी मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. समोरून नामांकित कंपनीचा मोबाईल केवळ चार हजार रुपयांत मिळत असल्याचे सांगण्यात आले. या कॉलवर विश्वास ठेवून युवकाने लगेचच मोबाईलही बुक केला. काही दिवसांतच टपाल कार्यालयात त्याच्या नावाचे पार्सल आले.

चार हजार रुपये भरून त्याने पार्सल ताब्यात घेतले अन् सत्य उघडकीस आले. त्या पार्सलमधून मोबाईलऐवजी चक्क शंभर-दोनशे रुपये किमतीचे बूट त्याच्या हाती पडले. खटाव तालुक्यातील औंध परिसरातील अनेक युवकांची अशा प्रकारच्या फसव्या कॉलने फसवणूक होत आहे.

औंध परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारचे कॉल येऊ लागले आहेत. कॉल आल्यानंतर हॅलो... नमस्कार... आपल्या मोबाईल नंबरची ही वस्तू घेण्यासाठी निवड झाली आहे. ही वस्तू एवढ्या किमतीची असून, आपणास ती कमी किमतीत मिळत आहे. बाजारभावापेक्षा आपले एवढे पैसे बचत होत आहेत, असेसांगून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे.औंध येथील एका युवकाला अशाच एका प्रसंगाला सामोरे जावे लागले. या युवकाला निनावी नंबरवरून आलेल्या फोनद्वारे नामांकित कंपनीच्या मोबाईलचे आमिष दाखविण्यात आले. पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल केवळ चार हजार रुपयांना मिळत असल्याचे त्याचे सांगण्यात आल्याने त्या फोनवर विश्वास ठेवला.

नाव व पत्ता सांगितल्यानंतर काही दिवसांतच गावातील टपाल कार्यालयात त्या युवकाच्या नावाचे पार्सल आले. ही माहिती मिळताच त्याने आनंदाच्या भरात टपाल कार्यालय गाठले आणि चार हजार रुपये भरून आलेले पार्सल आपल्या ताब्यात घेतले.घरी आल्यानंतर त्याने पार्सल उघडून पाहिले असता त्याचा मोठा धक्काच बसला. पार्सलमध्ये मोबाईल ऐवजी शंभर-दोनशे रुपये किमतीचे बूट त्याच्या हाती पडले. आपली फसवणूक झाल्याचे युवकाच्या लक्षात आले. मात्र, घरच्यांच्याभीतीमुळे त्याने ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही.

अशा प्रकारच्या आणखी घटना औंध परिसरात घडल्या आहेत. परंतु बदनामीमुळे कोणीही याची वाच्यता केली नाही. नागरिकांनी अशा फसव्या फोन कॉल वरून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाSatara areaसातारा परिसर