शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

ग्रंथ महोत्सव -- जागर वाचन संस्कृतीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 01:07 IST

राजधानी दिल्ली येथील साहित्य अकादमीला भुरळ घालणारा राजधानी साताऱ्याचा ग्रंथमहोत्सव दोन दशकांची वाटचाल करत सुवर्णमहोत्सवाच्या दिशेने सरकू लागला आहे. वाचन संस्कृतीच्या

- प्रगती जाधव - पाटील

राजधानी दिल्ली येथील साहित्य अकादमीला भुरळ घालणारा राजधानी साताऱ्याचा ग्रंथमहोत्सव दोन दशकांची वाटचाल करत सुवर्णमहोत्सवाच्या दिशेने सरकू लागला आहे. वाचन संस्कृतीच्या जागराला वाहिलेले पालखीचे भोई कोणत्याही हेतूशिवाय एकत्र असताना अक्षर चळवळीचा हा जगन्नाथरुपी रथ पुढे जातो आहे, हेच साताºयाच्या मातीचे आणि येथे रुजलेल्या पुरोगामी संस्कृतीचे वैशिष्ट्यआहे.आज साताºयाचा ग्रंथमहोत्सव खºया अर्थाने तारुण्यात आहे. साहित्य वर्तुळात समीक्षेची कठोर वाणी बोलणाºया साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ग्रंथमहोत्सवाच्या यशस्वीतेचे मनापासून कौतुक केले. एरव्ही वाङमय पातळीवर अ ब क ड च्या भाषेत साहित्याची शास्त्रीय समीक्षा करणारे समीक्षकनकोसे वाटतात. तिथे डॉ. सबनीस यांनी साताºयाच्या ग्रंथमहोत्सवाच्या यशाचे रहस्य ‘ग्रंथ संस्कारच माणसाला जगवणारा आहे,’ अशा शब्दांत उलगडले. येथील साहित्य भोई कोणत्याही अहगंडाशिवाय वाचन संस्कृतीच्या जागरासाठी एकत्र येतात. शासकीय अधिकारी पदाधिकारी यांचे खºयाखुºया संघभावनेचे अद्वैत रूप येथे पाहायला मिळते.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी व्हिजन २०१९ साठी जलसंवर्धनाचा संकल्प केला आहे. त्या संकल्पाला शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारा जलक्रांतीचा परिसंवाद एक साधक बाधक चर्चा ग्रंथमहोत्सवाच्या व्यासपीठावर झाली आणि जलसंवर्धनाचे गांभीर्य फार उत्कट पातळीवरून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले, हाच ग्रंथ संस्कार अथवा जाणिवांची निर्मिती ग्रंथ महोत्सवाचा हेतू आहे आणि तो फलद्रूप होताना पाहणे याचि देही याचि डोळा ‘आनंद तरंग’ अनुभव आहे.पहिल्या दशकाच्या वाटचालीत ग्रंथमहोत्सवाचा यूएसपी ठरणारे परिसंवाद प्रगल्भ साहित्य मंडळीसाठी असायचे; पण साताºयाच्या ग्रंथमहोत्सवाने ही परंपरा मोडीत काढत अक्षर संस्कृतीचे नव सृजन करणाºया नव्या लेखकांना वाचकांना आपल्यामध्ये सामावून घेतले! त्यांच्या बौद्धिकतेला चालना मिळावी यासाठी नवलेखक, कवी यांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. याठिकाणी देणारे परिसंवाद हेच वैशिष्ट्य आहे.