शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

ग्रंथ महोत्सव -- जागर वाचन संस्कृतीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 01:07 IST

राजधानी दिल्ली येथील साहित्य अकादमीला भुरळ घालणारा राजधानी साताऱ्याचा ग्रंथमहोत्सव दोन दशकांची वाटचाल करत सुवर्णमहोत्सवाच्या दिशेने सरकू लागला आहे. वाचन संस्कृतीच्या

- प्रगती जाधव - पाटील

राजधानी दिल्ली येथील साहित्य अकादमीला भुरळ घालणारा राजधानी साताऱ्याचा ग्रंथमहोत्सव दोन दशकांची वाटचाल करत सुवर्णमहोत्सवाच्या दिशेने सरकू लागला आहे. वाचन संस्कृतीच्या जागराला वाहिलेले पालखीचे भोई कोणत्याही हेतूशिवाय एकत्र असताना अक्षर चळवळीचा हा जगन्नाथरुपी रथ पुढे जातो आहे, हेच साताºयाच्या मातीचे आणि येथे रुजलेल्या पुरोगामी संस्कृतीचे वैशिष्ट्यआहे.आज साताºयाचा ग्रंथमहोत्सव खºया अर्थाने तारुण्यात आहे. साहित्य वर्तुळात समीक्षेची कठोर वाणी बोलणाºया साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ग्रंथमहोत्सवाच्या यशस्वीतेचे मनापासून कौतुक केले. एरव्ही वाङमय पातळीवर अ ब क ड च्या भाषेत साहित्याची शास्त्रीय समीक्षा करणारे समीक्षकनकोसे वाटतात. तिथे डॉ. सबनीस यांनी साताºयाच्या ग्रंथमहोत्सवाच्या यशाचे रहस्य ‘ग्रंथ संस्कारच माणसाला जगवणारा आहे,’ अशा शब्दांत उलगडले. येथील साहित्य भोई कोणत्याही अहगंडाशिवाय वाचन संस्कृतीच्या जागरासाठी एकत्र येतात. शासकीय अधिकारी पदाधिकारी यांचे खºयाखुºया संघभावनेचे अद्वैत रूप येथे पाहायला मिळते.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी व्हिजन २०१९ साठी जलसंवर्धनाचा संकल्प केला आहे. त्या संकल्पाला शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारा जलक्रांतीचा परिसंवाद एक साधक बाधक चर्चा ग्रंथमहोत्सवाच्या व्यासपीठावर झाली आणि जलसंवर्धनाचे गांभीर्य फार उत्कट पातळीवरून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले, हाच ग्रंथ संस्कार अथवा जाणिवांची निर्मिती ग्रंथ महोत्सवाचा हेतू आहे आणि तो फलद्रूप होताना पाहणे याचि देही याचि डोळा ‘आनंद तरंग’ अनुभव आहे.पहिल्या दशकाच्या वाटचालीत ग्रंथमहोत्सवाचा यूएसपी ठरणारे परिसंवाद प्रगल्भ साहित्य मंडळीसाठी असायचे; पण साताºयाच्या ग्रंथमहोत्सवाने ही परंपरा मोडीत काढत अक्षर संस्कृतीचे नव सृजन करणाºया नव्या लेखकांना वाचकांना आपल्यामध्ये सामावून घेतले! त्यांच्या बौद्धिकतेला चालना मिळावी यासाठी नवलेखक, कवी यांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. याठिकाणी देणारे परिसंवाद हेच वैशिष्ट्य आहे.