शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे व-हाडींकडून नवदाम्पत्याला आशीर्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 16:36 IST

मात्र, १४ एप्रिलनंतर ही परिस्थिती कायम राहिल्याने हा विवाह ठरल्या तारखेला घ्यायचा, हे वधू-वर पक्षाकडून ठरले. त्यानुसार देऊर येथील ब्राह्मण वाड्यात अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला.

ठळक मुद्देकाकडे कुटुंबांचा आदर्श : मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगद्वारे विवाह संपन्न

संजय कदमवाठार स्टेशन- सातारा : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशावेळी पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास मनाई आहे. त्यामुळे कोरेगाव तालुक्यातील देऊर येथील काकडे कुटुंबीयांनी अत्यंत मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत राहत्या घरात आपल्या मुलाचा विवाह पार पडला. या विवाहाचे सोशल मीडियावर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. या लग्नाचे प्रक्षेपण पाहणारे वºहाडी व नातेवाइकांनीही या दाम्पत्याना अक्षदारुपी आशीर्वाद दिले.

आजपर्यंत २५० हून अधिक दाम्पत्याचा विवाह लावून त्यांना सुखी जीवनाचा कानमंत्र देणाऱ्या देऊर, ता. कोरेगाव येथील दीपक काकडे यांचे चिरंजीव रविकिरण आणि साखरवाडी येथील मनीषा कुमठेकर या नवदाम्पत्य नुकतेच विवाहबद्ध झाले.

फेब्रुवारी महिन्यात या दोघांचा विवाह निश्चित झाला होता. त्यावेळी १० एप्रिल रोजी खुंटे येथील मंगलकार्यालयात हा सोहळा घेण्यात येईल, असं वधू पक्षाकडून ठरविण्यात आले होते. मात्र, २३ मार्चला जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातल्याने संपूर्ण देशच लॉकडाऊन करण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांनीही याबाबत जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला. त्यामुळे हा नियोजित विवाह सोहळा १४ तारखेला लॉकडाऊन उठल्यावर घेण्याबाबत ठरले. मात्र, १४ एप्रिलनंतर ही परिस्थिती कायम राहिल्याने हा विवाह ठरल्या तारखेला घ्यायचा, हे वधू-वर पक्षाकडून ठरले. त्यानुसार देऊर येथील ब्राह्मण वाड्यात अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला.

ना व-हाडी, ना वाजत्री, ना बँड ना घोडा. कुरवलीची लगबग नाही की वरमाईची पळापळ नाही ना सत्कार सोहळा ना जावयाचं मानपान सगळंच त्यामुळे अगदीच शांततेत हा विलक्षण सोहळा पार पडला.

सकाळी साडेनऊलाच ब्राह्मणवाड्याचा मुख्य दरवाजा बंद करत हा सोहळा सुरू झाला. त्यासाठी वाठार स्टेशनचे पुरोहित खरे यांनी विवाहाची सर्व सूत्रे हाती घेतली होती. नियोजित असलेल्या देऊर येथील विवाहासाठी प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते. मात्र, संचारबंदी असल्याने या सोहळ्याला मुला-मुलीच्या मामा-मामींना देखील हजर राहता आलं नाही. लग्न सुरू झाल्यावर व्हिडीओ कॉलिंगवरून मुलाच्या मामाने आणि इतर वºहाडी मंडळींनी अक्षदा टाकून दाम्पत्याला आशीर्वाद दिले. 

  • लग्न सोहळा म्हटलं की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला हा अनमोल एकमेव क्षण असल्याने लाखो रुपयांची उलाढाल करत मंडप, हॉल, वाजत्री, घोडं, जेवण, बस्ता, सोनं खरेदी, कपडे अशा सर्व गोष्टी लग्नात निश्चित होतात. मात्र, आज झालेल्या या लग्नात या सर्व गोष्टींना फाटा देत स्वत:च्या राहत्या घरात अगदी मामा-मामी शिवाय हा लग्नसोहळा पार पडला.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmarriageलग्न