शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे व-हाडींकडून नवदाम्पत्याला आशीर्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 16:36 IST

मात्र, १४ एप्रिलनंतर ही परिस्थिती कायम राहिल्याने हा विवाह ठरल्या तारखेला घ्यायचा, हे वधू-वर पक्षाकडून ठरले. त्यानुसार देऊर येथील ब्राह्मण वाड्यात अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला.

ठळक मुद्देकाकडे कुटुंबांचा आदर्श : मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगद्वारे विवाह संपन्न

संजय कदमवाठार स्टेशन- सातारा : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशावेळी पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास मनाई आहे. त्यामुळे कोरेगाव तालुक्यातील देऊर येथील काकडे कुटुंबीयांनी अत्यंत मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत राहत्या घरात आपल्या मुलाचा विवाह पार पडला. या विवाहाचे सोशल मीडियावर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. या लग्नाचे प्रक्षेपण पाहणारे वºहाडी व नातेवाइकांनीही या दाम्पत्याना अक्षदारुपी आशीर्वाद दिले.

आजपर्यंत २५० हून अधिक दाम्पत्याचा विवाह लावून त्यांना सुखी जीवनाचा कानमंत्र देणाऱ्या देऊर, ता. कोरेगाव येथील दीपक काकडे यांचे चिरंजीव रविकिरण आणि साखरवाडी येथील मनीषा कुमठेकर या नवदाम्पत्य नुकतेच विवाहबद्ध झाले.

फेब्रुवारी महिन्यात या दोघांचा विवाह निश्चित झाला होता. त्यावेळी १० एप्रिल रोजी खुंटे येथील मंगलकार्यालयात हा सोहळा घेण्यात येईल, असं वधू पक्षाकडून ठरविण्यात आले होते. मात्र, २३ मार्चला जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातल्याने संपूर्ण देशच लॉकडाऊन करण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांनीही याबाबत जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला. त्यामुळे हा नियोजित विवाह सोहळा १४ तारखेला लॉकडाऊन उठल्यावर घेण्याबाबत ठरले. मात्र, १४ एप्रिलनंतर ही परिस्थिती कायम राहिल्याने हा विवाह ठरल्या तारखेला घ्यायचा, हे वधू-वर पक्षाकडून ठरले. त्यानुसार देऊर येथील ब्राह्मण वाड्यात अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला.

ना व-हाडी, ना वाजत्री, ना बँड ना घोडा. कुरवलीची लगबग नाही की वरमाईची पळापळ नाही ना सत्कार सोहळा ना जावयाचं मानपान सगळंच त्यामुळे अगदीच शांततेत हा विलक्षण सोहळा पार पडला.

सकाळी साडेनऊलाच ब्राह्मणवाड्याचा मुख्य दरवाजा बंद करत हा सोहळा सुरू झाला. त्यासाठी वाठार स्टेशनचे पुरोहित खरे यांनी विवाहाची सर्व सूत्रे हाती घेतली होती. नियोजित असलेल्या देऊर येथील विवाहासाठी प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते. मात्र, संचारबंदी असल्याने या सोहळ्याला मुला-मुलीच्या मामा-मामींना देखील हजर राहता आलं नाही. लग्न सुरू झाल्यावर व्हिडीओ कॉलिंगवरून मुलाच्या मामाने आणि इतर वºहाडी मंडळींनी अक्षदा टाकून दाम्पत्याला आशीर्वाद दिले. 

  • लग्न सोहळा म्हटलं की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला हा अनमोल एकमेव क्षण असल्याने लाखो रुपयांची उलाढाल करत मंडप, हॉल, वाजत्री, घोडं, जेवण, बस्ता, सोनं खरेदी, कपडे अशा सर्व गोष्टी लग्नात निश्चित होतात. मात्र, आज झालेल्या या लग्नात या सर्व गोष्टींना फाटा देत स्वत:च्या राहत्या घरात अगदी मामा-मामी शिवाय हा लग्नसोहळा पार पडला.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmarriageलग्न