शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

भाजपकडून राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:14 IST

राज्यातील सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरत आहे, असे म्हणता येणार नाही. सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. याउलट भाजपकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यपालांच्या भूमिकेबाबतही आमच्या मनात शंका आहे. महामारी संकटात कोणी राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते चुकीचे आहे,ह्ण असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देभाजपकडून राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न : पृथ्वीराज चव्हाणराज्यपालांच्या भूमिकेबाबत आमच्या मनात शंका

कऱ्हाड : राज्यातील सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरत आहे, असे म्हणता येणार नाही. सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. याउलट भाजपकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यपालांच्या भूमिकेबाबतही आमच्या मनात शंका आहे. महामारी संकटात कोणी राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते चुकीचे आहे,ह्ण असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.कऱ्हाड येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे कऱ्हाड तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, शहराध्यक्ष अप्पा माने, इंद्रजित चव्हाण, राहुल चव्हाण उपस्थित होते.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कोरोनासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने ११ मार्च रोजी जागतिक महामारी घोषित केली. मात्र आमच्याकडे २५ मार्चला लॉकडाऊन करण्यात आले. केंद्र सरकारने १४ दिवस वाया घालविले. त्याचे परिणाम आज भोगावे लागत आहेत. वास्तविक आपल्या सरकारने मुंबई विमानतळावर परेदशातून येणारे प्रवासी याबाबत काळजी घ्यायला हवी होती. अथवा विमानतळ त्याचवेळी बंद करायला हवे होते. मात्र त्याकडे लक्ष देण्यापेक्षा आमचे पंतप्रधान ट्रम्प यांचे स्वागत करण्यात मग्न होते. तर मध्यप्रदेशचं सरकार पाडण्यात त्यांना जास्त रस होता.कोरोना संकट हाताळायला केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. लोकांना स्वत:च्या घरापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्थाही हे सरकार नीट करू शकलेले नाही. भारताची एवढी मोठी नाचक्की यापूर्वी कधीच झालेली नाही. यातून सावरण्यासाठी सरकारने २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे; पण २ लाख कोटींच्यावर त्यांनी खर्च केलेला नाही. १८ लाख कोटींची नुसती आश्वासने आहेत. त्यामुळे सर्वांचा भ्रमनिरास झाला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याकडून अर्थव्यवस्थेची गाडी पुन्हा रुळावर येईल, असे वाटत नाही.ह्ण असेही आ. चव्हाण म्हणाले.मला ट्रॅप करण्याचा कोणीतरी प्रयत्न करतंयदोन दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांच्या आवाजातील ह्यहे सरकार आमचं नाही, सेनेचे आहे,ह्ण या आशयाची आॅडिओ क्लिप व्हायरल झाली होती. याबाबत विचारताच; मला कोणीतरी ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतंय. मी असे काही बोललोय असं आठवत नाही. त्या संभाषणातील माझा आवाज खरा की खोटा याचा मी अभ्यास करतोय, असे उत्तर चव्हाण यांनी दिले.... ते सरकार ठरवेल!तुमचे एकेकाळचे निकटचे सहकारी, विधान परिषद सदस्य आमदार आनंदराव पाटील यांची आमदारकीची मुदत संपत आली आहे. त्याऐवजी कोणाला संधी देणार? याबाबत विचारताच ह्यआता तो निर्णय सरकार घेईल. एवढेच उत्तर देणे त्यांनी पसंद केले.भ्रमात राहू नकाएचआयव्हीसारख्या आजारावर चाळीस वर्षांत लस शोधायला यश आलेले नाही. त्यामुळे कोरोना विषाणूच्या आजारावर काही महिन्यांत लस तयार होईल, या भ्रमात कोणी राहू नका. त्यामुळे स्वत:ची काळजी स्वत:च घ्या, असे आवाहनही चव्हाण यांनी केले.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणSatara areaसातारा परिसरBJPभाजपा