शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

कोरोनात घरात बसून दिवस काढले, तसेच आताही काढावे लागतील; माधव भंडारी यांचा उद्धव ठाकरेंना टोला

By नितीन काळेल | Updated: August 3, 2024 19:28 IST

ठाकरेंचे वक्तव्य वैफल्यातून..

सातारा : राजकीय स्वास्थासाठी फेक नरेटीव्ह पसरिवण्याचा विरोधकांच्या कटाचा नवा चेहरा समोर आला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात मिळालेल्या भरघोस निधीचा थांगपत्ताच न लागल्याने त्यांनी शेरेबाजी सुरू केली आहे. पण, याला भाजपने चोख उत्तर दिल्याने विरोधकांचे अर्थसंकल्पाविषयीचे अज्ञान उघड पडले आहे, असा टोला भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी लगावला. तसेच फडणवीस यांना आव्हान दिल्याबद्दल ‘कोरोनात घरात बसून दिवस काढले. तसेच आताही काढावे लागतील, असा इशाराही उद्धव ठाकरे यांना दिला.सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत भंडारी बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.भंडारी म्हणाले, केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसमावेशक, सर्वांच्या गरजा, अपेक्षा लक्षात घेऊन सादर करण्यात आला आहे. यातून महाराष्ट्राला भरघोस तरतूद झालेली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ग्रामीण रस्ते विकासासाठी ४०० कोटी दिले आहेत. महाराष्ट्र-गुजरात-मध्यप्रदेश- हरियाणा आणि उत्तरप्रदेश या राज्यांना जोडणाऱ्या मुंबई-दिल्ली आैद्योगिक काॅरिडाॅरसाठी ४९९ कोटी तर बंगळूरू-मुंबई काॅरिडाॅरसाठी ४६६ कोटींची तरतूद आहे. मुंबई, पुणे येथील मेट्रो प्रकल्पासाठी २ हजार ५८४ कोटींची तरतूद आहे. राज्यात ७६ हजार कोटींचा वाढवण बंदर प्रकल्प होतोय. दोन लाख रोजगार निर्मिती होणार आहे. बिहार आणि आंध्रप्रदेशला अर्थसंकल्पात तरतूद केली त्यापेक्षा या प्रकल्पाची किंमत अधिक आहे.विराेधक हे केंद्रीय अर्थसंकल्पातून काही मिळाले नसल्याचे शेरेबाजी करतात. पण, त्यांना अऱ्थसंकल्पाचे ज्ञान कमीच आहे. मुख्यमंत्रिपदावर असातना उध्दव ठाकरे यांनी आपल्याला अर्थसंकल्पातील काहीच कळत नाही अशी जाहीर कबुली दिली होती. त्यांचेही ज्ञान आता उघड झाले असून अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी विरोधकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेले पुस्तक वाचावे. तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मागणी केल्यास पुस्तकाच्या प्रती मोफत वितरित करु, असेही भंडारी यांनी जाहीर केले.

ठाकरेंचे वक्तव्य वैफल्यातून..माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान दिले आहे, याविषयी पत्रकारांनी प्रश्न केला. यावर माधव भंडारी यांनी ठाकरे यांचे हे वक्तव्य वैफल्य आणि नैराश्येतून आहे. महाराष्ट्रातील जनता एकेरी भाषा सहन करत नाही. शिशुपालने श्रीकृष्णालाही असेच सांगितले होते. यामध्ये पुढे काय झाले सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे कोरोनात जसे घरात बसून दिवस काढले. तसेच यापुढे दिवस काढावे लागतील, असा इशारा दिला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे