शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
4
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
5
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
6
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
8
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
9
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
10
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
11
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
12
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
13
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
14
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
15
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
16
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
17
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
18
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
19
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
20
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

धनगर समाजाच्या पाठीशी भाजप ठाम; संघशक्तीने विरोधकांना पळवून लावा - चंद्रशेखर बावनकुळे 

By प्रमोद सुकरे | Updated: November 13, 2022 11:32 IST

नांदगाव (ता. कराड) येथे कराड दक्षिण भाजपच्या वतीने धनगर समाजाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता.

कराड : धनगर समाजाला वैभवशाली इतिहास आहे. संघटित समाजच संघर्ष करू शकतो हे समाजाने लक्षात घेतले पाहिजे. त्याचबरोबर या समाजाने केवळ पारंपारिक व्यवसायात न अडकता उच्चशिक्षित पिढी तयार केली पाहिजे. धनगर समाजाच्या उन्नतीसाठी भाजप त्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे. असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

नांदगाव (ता. कराड) येथे कराड दक्षिण भाजपच्या वतीने धनगर समाजाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून    बावनकुळे बोलत होते. भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, भाजपचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर ,सातारा लोकसभेचे प्रभारी डॉ.अतुल भोसले, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

बावनकुळे म्हणाले, धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजप नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे. सन २०१९ ला अजित पवारांच्या विरोधात गोपीचंद पडळकर लढले. त्यावेळी त्यांना भाजपने शब्द दिला होता तो भाजपने पाळला. त्यांना आमदार केले. गत अडीच वर्षात पडळकरांनी महाविकास आघाडीला सळो की पळो करुन सोडले होते. त्याचप्रमाणे कराड दक्षिणमधील विरोधकांना तुम्ही संघशक्तीने सळो की पळो करून लावा. भाजप तुमच्या प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच तुमच्या पाठीशी राहील.

आमदार जयकुमार गोरे म्हणाले, धनगर समाजाच्या भावना समजावून घेण्यासाठी आजचा हा मेळावा आयोजित केला आहे. चाळीस-पन्नास वर्षे काँग्रेसची सत्ता असूनही धनगर समाजाचे प्रश्न आहे तसेच राहिले आहेत. त्यांचा फक्त मतांसाठी वापर करून घेण्यात आला. यापुढे तसा वापर होऊ देऊ नका. भाजपच तुम्हाला न्याय देऊ शकतो हे लक्षात घ्या .

डॉ. अतुल भोसले म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी धनगर समाजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले .अन आजही सत्ता आल्याने ते घेणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला जगात प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. या साऱ्याचा परिणाम म्हणून भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पण मूळच्या स्थानिक लोकांनी राजकारण जरा बाजूला ठेवावे. काम करणाऱ्या प्रत्येकाला इथे संधी मिळेल पण संधी मिळण्यासाठी काम करू नका. सत्तेची, पदाची अपेक्षा न ठेवता काम करा. असा कानमंत्रही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

ते तर बेईमानी सरकार!आता राज्यात आपले सरकार आले आहे. पण अडीच वर्षांपूर्वी सत्तेत आलेले महाविकास आघाडी सरकार हे तर बेईमानीने सत्तेवर आलेले सरकार होते. अशी टीका डॉ.अतुल भोसले यांनी भाषणात केली. पण बेईमानी फार काळ टिकत नाही. आता आलेले सरकार धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कराड दक्षिणचा मोठा वाटा असेलआगामी लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार विजयी होईल. त्यात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा मोठा वाटा असेल, असे डॉ अतुल भोसले यांनी सांगितले. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याला प्रतिसाद दिला.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपा