शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

धनगर समाजाच्या पाठीशी भाजप ठाम; संघशक्तीने विरोधकांना पळवून लावा - चंद्रशेखर बावनकुळे 

By प्रमोद सुकरे | Updated: November 13, 2022 11:32 IST

नांदगाव (ता. कराड) येथे कराड दक्षिण भाजपच्या वतीने धनगर समाजाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता.

कराड : धनगर समाजाला वैभवशाली इतिहास आहे. संघटित समाजच संघर्ष करू शकतो हे समाजाने लक्षात घेतले पाहिजे. त्याचबरोबर या समाजाने केवळ पारंपारिक व्यवसायात न अडकता उच्चशिक्षित पिढी तयार केली पाहिजे. धनगर समाजाच्या उन्नतीसाठी भाजप त्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे. असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

नांदगाव (ता. कराड) येथे कराड दक्षिण भाजपच्या वतीने धनगर समाजाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून    बावनकुळे बोलत होते. भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, भाजपचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर ,सातारा लोकसभेचे प्रभारी डॉ.अतुल भोसले, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

बावनकुळे म्हणाले, धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजप नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे. सन २०१९ ला अजित पवारांच्या विरोधात गोपीचंद पडळकर लढले. त्यावेळी त्यांना भाजपने शब्द दिला होता तो भाजपने पाळला. त्यांना आमदार केले. गत अडीच वर्षात पडळकरांनी महाविकास आघाडीला सळो की पळो करुन सोडले होते. त्याचप्रमाणे कराड दक्षिणमधील विरोधकांना तुम्ही संघशक्तीने सळो की पळो करून लावा. भाजप तुमच्या प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच तुमच्या पाठीशी राहील.

आमदार जयकुमार गोरे म्हणाले, धनगर समाजाच्या भावना समजावून घेण्यासाठी आजचा हा मेळावा आयोजित केला आहे. चाळीस-पन्नास वर्षे काँग्रेसची सत्ता असूनही धनगर समाजाचे प्रश्न आहे तसेच राहिले आहेत. त्यांचा फक्त मतांसाठी वापर करून घेण्यात आला. यापुढे तसा वापर होऊ देऊ नका. भाजपच तुम्हाला न्याय देऊ शकतो हे लक्षात घ्या .

डॉ. अतुल भोसले म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी धनगर समाजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले .अन आजही सत्ता आल्याने ते घेणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला जगात प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. या साऱ्याचा परिणाम म्हणून भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पण मूळच्या स्थानिक लोकांनी राजकारण जरा बाजूला ठेवावे. काम करणाऱ्या प्रत्येकाला इथे संधी मिळेल पण संधी मिळण्यासाठी काम करू नका. सत्तेची, पदाची अपेक्षा न ठेवता काम करा. असा कानमंत्रही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

ते तर बेईमानी सरकार!आता राज्यात आपले सरकार आले आहे. पण अडीच वर्षांपूर्वी सत्तेत आलेले महाविकास आघाडी सरकार हे तर बेईमानीने सत्तेवर आलेले सरकार होते. अशी टीका डॉ.अतुल भोसले यांनी भाषणात केली. पण बेईमानी फार काळ टिकत नाही. आता आलेले सरकार धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कराड दक्षिणचा मोठा वाटा असेलआगामी लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार विजयी होईल. त्यात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा मोठा वाटा असेल, असे डॉ अतुल भोसले यांनी सांगितले. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याला प्रतिसाद दिला.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपा