शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

भाजप-सेनेची भिस्त आयात उमेदवारांवर, निष्ठावंतांची गोची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 13:16 IST

विरोधकांना नामोहरम करण्यात यशस्वी झालेल्या भाजप-शिवसेनेच्या युतीला अजूनही आयात उमेदवारांच्या भरवशावरच बसावे लागले आहे. सातारा जिल्ह्यातील बहुतांश विधानसभा मतदारसंघांमध्ये युतीची भिस्त ही आयात उमेदवारांवरच अवलंबून आहे.

ठळक मुद्देभाजप-सेनेची भिस्त आयात उमेदवारांवर,निष्ठावंतांची गोची युतीची पावले फुटीच्या दिशेने; मावळ्यांवर जिंदाबाद म्हणण्याची वेळ

सागर गुजर सातारा : विरोधकांना नामोहरम करण्यात यशस्वी झालेल्या भाजप-शिवसेनेच्या युतीला अजूनही आयात उमेदवारांच्या भरवशावरच बसावे लागले आहे. सातारा जिल्ह्यातील बहुतांश विधानसभा मतदारसंघांमध्ये युतीची भिस्त ही आयात उमेदवारांवरच अवलंबून आहे.जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी वाई-खंडाळा-महाबळेश्वर, पाटण, कऱ्हाड  उत्तर, कऱ्हाड दक्षिण, कोरेगाव या पाच मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या आघाडीचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत.

या मतदारसंघांमध्ये अनुक्रमे आमदार मकरंद पाटील, सत्यजित पाटणकर, आ. बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व आ. शशिकांत शिंदे यांना उमेदवारी मिळणार असल्याने या मंडळींनी कामाला सुरुवात केलेली आहे.दुसऱ्या बाजूला भाजप आणि शिवसेना या पक्षांतर्फेही काहींनी तयारी केलेली आहे. मात्र, त्यांच्या तयारीवर विरजण टाकण्याचे काम त्यांच्याच नेत्यांकडून केले जात असल्याचे दिसते. दोन्ही पक्षांच्या युतीचे घोडे अजूनही जागा वाटपात अडकून पडलेले आहे.

शिवसेनेला युती हवी असली तरी २८८ पैकी निम्म्या म्हणजे १४४ जागा हव्या आहेत, त्याउलट एवढ्या जागा देणे अशक्य असल्याची माहिती भाजपचे नेते वारंवार देत आहेत. शिवसेनेच्या ६३ व भाजपच्या १२२ विद्यमान जागा जैसे थे ठेवून उर्वरित १०३ जागांबाबत वाटपाचा विचार भाजपने सुरू केलेला आहे.दुसऱ्या बाजूला आयातांची मेगा भरती दोन्ही पक्षांनी सुरूच ठेवल्याने युतीतर्फे इच्छुक असणाऱ्या संभावित उमेदवारांमध्ये संभ्रमावस्थेचे वातावरण आहे. या परिस्थितीत दोन्ही पक्ष शेवटच्या क्षणी युती फोडून वेगवेगळे लढण्याचीही शक्यताही राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.दरम्यान, सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे दीपक पवार, अमित कदम यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळेल, असा अंदाज होता; परंतु राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपमध्ये गेल्याने त्यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे. पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना सध्याच्या घडीला तरी युतीमधून दुसरा स्पर्धक नसल्याचे चित्र आहे.वाई विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार मदन भोसले हे भाजपमध्ये गेले आहेत. त्यांचा सामना राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्याशी पारंपरिक पद्धतीने होणार आहे. माण-खटाव मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांची भाजपमध्ये जाण्याची जोरदार तयारी सुरू आहे, तर त्यांना भाजपमधूनच माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांचा विरोध आहे. त्यातूनही आ. गोरे यांनाच भाजपने उमेदवारी दिली तर या ठिकाणी मोठा भडका उडण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेने राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या शेखर गोरे यांच्या हातात शिवबंधन बांधले आहे.फलटणमधून भाजपतर्फे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे समर्थक दिगंबर आगवणे यांनी तयारी सुरू केली असली तरी त्यांचे विरोधक असणारे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या संपूर्ण गटाने भाजपची दारे ठोठावल्याने आगवणे यांची गोची झाली आहे. महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनीही फलटण मतदारसंघातून जोरदार तयारी सुरू केली असल्याने भाजपमधून तिघे इच्छुक होण्याची शक्यता आहे.कऱ्हाड उत्तरमधून भाजपतर्फे जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे यांनी गेल्या पाच वर्षांपूर्वीपासूनच तयारी सुरू केलेली आहे. कऱ्हाड दक्षिणमधूनही विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले, कोरेगावातून महेश शिंदे यांना भाजपची उमेदवारी निश्चितपणे मिळणार असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे.

या ठिकाणी जर भाजपने इनकमिंग केले तर आणखी क्लिस्ट परिस्थिती निर्माण होणार आहे. रोजच्या रोज नव्या घडत आहेत. राष्ट्रवादीत निष्ठावंत म्हणवून घेणारे कुठल्याही क्षणी रंग बदलत आहेत.सतरंज्या उचलणाऱ्यांना दोन्ही काँग्रेसमध्ये महत्त्व...सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष आहे. जिल्ह्यातील अपवाद वगळता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. तर जिल्हा बँक, मजूर फेडरेशन, विविध कार्यकारी सहकारी संस्था, बाजार समित्यांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे, अशा परिस्थितीत राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्यांची संख्याही मोठी आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतून कधी कोण निघून जाईल, याचा भरवसा राहिला नसल्याने वर्षानुवर्षे सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना मोठे महत्त्व आल्याचे चित्र आहे. तर दुसऱ्या बाजूला सतरंज्या उचलायलाही कार्यकर्ते उरले नसल्याची विदारक परिस्थिती काँग्रेसमध्ये आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण