शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

भाजपकडे सरकार बदलणार हे सांगण्याशिवाय पर्याय नाही : बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 13:36 IST

राज्यातील आमचे सरकार पाच वर्षे चांगलेच चालणार आहे. पण, विरोधकाकडील आमदारांत चलबिचल आहे. त्यांचे मनोधैर्य पक्षाला टिकवून ठेवायचंय आहे. त्यामुळे राज्यात सरकार बदलणार हे सांगण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही,,अशी खरमरीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर केली.

ठळक मुद्दे भाजपकडे सरकार बदलणार हे सांगण्याशिवाय पर्याय नाही : बाळासाहेब थोरातविरोधी आमदारांत चलबिचल; मनोधैर्य टिकविण्याचे काम

सातारा : राज्यातील आमचे सरकार पाच वर्षे चांगलेच चालणार आहे. पण, विरोधकाकडील आमदारांत चलबिचल आहे. त्यांचे मनोधैर्य पक्षाला टिकवून ठेवायचंय आहे. त्यामुळे राज्यात सरकार बदलणार हे सांगण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही,,अशी खरमरीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर केली.सातारा येथे जिल्हा काँग्रेस कमिटीला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सोनल पटेल, अ‍ॅड. सुरेश कुराडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे रजनी पवार, धनश्री महाडिक, प्रल्हाद चव्हाण, मनोजकुमार तपासे आदी उपस्थित होते.जिल्हा काँग्रेस कमिटीत प्रथम माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनादरम्यान, मंत्री थोरात यांनी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येण्यासाठी व जातीयवादी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पुढाकार होता. देश सांभाळावा असे नेतृत्व बाबांचे आहे. काळाच्या ओघात काहीही होऊ शकते, असे स्पष्टपणे सांगितले. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे दिले. आता नियमित कर्ज भरणारे व दोन लाखांवरील कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ देणार आहे. अतिवृष्टीतील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. जिल्ह्यात काका आणि बाबा एकत्र आले, याचा फायदा होईल, असेही मंत्री थोरात यांनी यावेळी सांगितले.भाजपला हिंदुत्ववादी सरकार आणायचंय : पृथ्वीराज चव्हाणकाँग्रेस कमिटीत मार्गदर्शन करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी साम, दाम, दंड, भेदचा वापर केला. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील ४० हून अधिक नेते त्यांच्याकडे गेले. निवडणूक आयोग, सीबीय यासह अनेक संस्था भाजपने कॅप्चर केल्यात. भाजपला हिंदुत्ववादी सरकार आणायचं आहे, अशी जोरदार टिकाही चव्हाण यांनी यावेळी केली.

 

टॅग्स :congressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातSatara areaसातारा परिसर