शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

भाजपकडे सरकार बदलणार हे सांगण्याशिवाय पर्याय नाही : बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 13:36 IST

राज्यातील आमचे सरकार पाच वर्षे चांगलेच चालणार आहे. पण, विरोधकाकडील आमदारांत चलबिचल आहे. त्यांचे मनोधैर्य पक्षाला टिकवून ठेवायचंय आहे. त्यामुळे राज्यात सरकार बदलणार हे सांगण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही,,अशी खरमरीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर केली.

ठळक मुद्दे भाजपकडे सरकार बदलणार हे सांगण्याशिवाय पर्याय नाही : बाळासाहेब थोरातविरोधी आमदारांत चलबिचल; मनोधैर्य टिकविण्याचे काम

सातारा : राज्यातील आमचे सरकार पाच वर्षे चांगलेच चालणार आहे. पण, विरोधकाकडील आमदारांत चलबिचल आहे. त्यांचे मनोधैर्य पक्षाला टिकवून ठेवायचंय आहे. त्यामुळे राज्यात सरकार बदलणार हे सांगण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही,,अशी खरमरीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर केली.सातारा येथे जिल्हा काँग्रेस कमिटीला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सोनल पटेल, अ‍ॅड. सुरेश कुराडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे रजनी पवार, धनश्री महाडिक, प्रल्हाद चव्हाण, मनोजकुमार तपासे आदी उपस्थित होते.जिल्हा काँग्रेस कमिटीत प्रथम माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनादरम्यान, मंत्री थोरात यांनी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येण्यासाठी व जातीयवादी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पुढाकार होता. देश सांभाळावा असे नेतृत्व बाबांचे आहे. काळाच्या ओघात काहीही होऊ शकते, असे स्पष्टपणे सांगितले. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे दिले. आता नियमित कर्ज भरणारे व दोन लाखांवरील कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ देणार आहे. अतिवृष्टीतील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. जिल्ह्यात काका आणि बाबा एकत्र आले, याचा फायदा होईल, असेही मंत्री थोरात यांनी यावेळी सांगितले.भाजपला हिंदुत्ववादी सरकार आणायचंय : पृथ्वीराज चव्हाणकाँग्रेस कमिटीत मार्गदर्शन करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी साम, दाम, दंड, भेदचा वापर केला. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील ४० हून अधिक नेते त्यांच्याकडे गेले. निवडणूक आयोग, सीबीय यासह अनेक संस्था भाजपने कॅप्चर केल्यात. भाजपला हिंदुत्ववादी सरकार आणायचं आहे, अशी जोरदार टिकाही चव्हाण यांनी यावेळी केली.

 

टॅग्स :congressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातSatara areaसातारा परिसर