शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

सातारा : भाजप मध्यस्थाकरवी व्यवहार करत नाही; हेच काँग्रेसचे दुखणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 15:51 IST

काँग्रेस सरकारच्या काळात मध्यस्थाशिवाय कधी कोणता व्यवहारच झाला नाही. राफेल करारात त्यांना मध्यस्थ हवा होता. पण फ्रान्स सरकार मध्यस्थ देत नव्हते. म्हणूनच काँग्रेसने राफेलचा सौदा पूर्ण केला नाही. भाजपने मध्यस्थाशिवाय राफेलचा व्यवहार केला, हेच काँग्रेसचे दुखणे आहे. शंभर वेळा खोटे बोलून ते खरे होऊ शकत नाही, अशी टीका केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

ठळक मुद्देभाजप मध्यस्थाकरवी व्यवहार करत नाही; हेच काँग्रेसचे दुखणे : प्रकाश जावडेकर बँकांची कर्जे बुडविणाऱ्यांच्या विदेशातील मालमत्ता जप्त करत असल्याचे स्पष्टीकरण

सातारा : काँग्रेस सरकारच्या काळात मध्यस्थाशिवाय कधी कोणता व्यवहारच झाला नाही. राफेल करारात त्यांना मध्यस्थ हवा होता. पण फ्रान्स सरकार मध्यस्थ देत नव्हते. म्हणूनच काँग्रेसने राफेलचा सौदा पूर्ण केला नाही. भाजपने मध्यस्थाशिवाय राफेलचा व्यवहार केला, हेच काँग्रेसचे दुखणे आहे. शंभर वेळा खोटे बोलून ते खरे होऊ शकत नाही, अशी टीका केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली.मंत्री जावडेकर म्हणाले, राज्यातील २७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये २०० ग्रामपंचायती आम्हाला मिळाल्या आहेत. त्यामुळे लाट केवळ २०१४ ची नव्हती, तर गेल्या चारही वर्षात सर्व निवडणुकांत भाजपची वाढ झाली आहे.सर्वसामान्य जनतेला सुशासन हवे आहे. जातीपातीच्या राजकारणाला लोक बळी पडत नाहीत. तसेच खोटेनाटे प्रचार करून लोक मते देत नाहीत, हे दिसून आले आहे. त्यामुळे भाजप विरोधकांची लोकांच्यातील मान्यता संपुष्टात येत आहे.भाजप विरोधकांना कोणताही मुद्दा हाताशी मिळत नसल्याने नसलेले मुद्दे चर्चेत आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण शेतकऱ्यांपासून सामान्य जनतेपर्यंत मोदींच्या विकास योजनांचा फायदा होत असल्याने लोक आमच्यासोबतआहेत. राहुल गांधींच्या अमेठी मतदारसंघातील लोकच आता आम्ही मोदींच्या बरोबर असल्याचे सांगत आहेत, असेही ते म्हणाले.दरम्यान, बँकांची कर्जे बुडविणाऱ्या कर्जदारांच्या विदेशातील मिळकतीही ताब्यात घेण्याचे काम सुरु आहे. बुडित खात्यातील कर्जे सरकारने माफ केलेली नाहीत. केवळ बँकांचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ही कर्जे थकीत कर्जदारांकडून कुठल्याही परिस्थितीत वसूल केली जातील, असेही मंत्री जावडेकर यांनी सांगीतले.साताऱ्यात भाजपचे ९00 लोकप्रतिनिधी असल्याचा दावासातारा जिल्ह्यात झालेल्या विविध निवडणुकांत भाजपचे ९00 लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत, असा दावा मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी केला. लोक सुशासनाला मते देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :BJPभाजपाSangliसांगलीministerमंत्री