शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

कड्या-कपारीत धरती नटली । दीड किलोमीटरवरून पाणी विहिरीत आणले-- पारंपरिक जलव्यवस्थाने केली गव्हाची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 18:43 IST

कास पठार भागातील डोंगर माथ्यावर मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते. जमीन उताराची व मुरबाड असल्याने पावसाळ्यात सर्व पाणी वाहून जाते. परिसरात मोठा पाऊस पडल्याने बहुतांशी ठिकाणी झरे, उफळे फुटले जातात. सुरुवातीस या झऱ्यांना खूप पाणी असते.

ठळक मुद्दे पारंपरिक जलव्यवस्थाने केली गव्हाची शेतीपरिसरात एक किंवा एकापेक्षा अधिक कुटुंबे आळीपाळीने गव्हाची शेती भिजवतात.

सागर चव्हाण।पेट्री : डोंगरमाथ्यावरील बहुतांशी गावांमध्ये कड्याखाली, डोंगरांतील झऱ्याचे पाणी साधारण एक ते दीड किलोमीटर अंतरावरून शेण, चिखल-मातीत सारवलेल्या आडात आणले जात आहे. या पाण्यावरच रब्बी पीक म्हणून गव्हाची शेती कित्येक पिढ्यांपासून पारंपरिक पद्धतीने केली जात आहे.

कास पठार भागातील डोंगर माथ्यावर मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते. जमीन उताराची व मुरबाड असल्याने पावसाळ्यात सर्व पाणी वाहून जाते. परिसरात मोठा पाऊस पडल्याने बहुतांशी ठिकाणी झरे, उफळे फुटले जातात. सुरुवातीस या झऱ्यांना खूप पाणी असते. उन्हाळ्यापर्यंत झ-याचे पाणी कमी होते. येथील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने भात काढल्यानंतर लगेच गहू पेरला जातो.

शेताच्या उंच ठिकाणी आड तयार करून तळापर्यंतच्या वावराला पाणी पोहोचेल, अशी व्यवस्था याद्वारे केली जाते. या परिसरात एक किंवा एकापेक्षा अधिक कुटुंबे आळीपाळीने गव्हाची शेती भिजवतात. दिलेल्या दिवसांची विभागणी करून जेवढे रान भिजेल तेवढे दिलेल्या मुदतीत वावर भिजवले जाते. गव्हाला पाणी कमी पडू नये, यासाठी शेतकरी एक-दीड किलोमीटर अंतरावरून पाट तसेच पाईप जोडून पाणी साठवणुकीसाठी एका आडात आणतात.छिद्र लाकडापासून बनवला जातो ‘व्हॉल्व्ह’आडात तीन इंच पाईपाएवढे एकदम तळाला छिद्र ठेवून त्यावर उभे लाकूड ठेवले जात होते. त्यानंतर चिखलाने छिंदे बंद केले जायचे. आड संपूर्ण भरल्यानंतर लाकूड हलविले की पाणी शेतजमिनीकडे पोहोचते. सध्या काही ठिकाणी व्हॉल्व्ह बसविला जात आहे. डोंगर पट्ट्यात ही व्यवस्था आजही टिकून आहे. भात काढून गहू पेरल्यानंतर तो काढेपर्यंत भिजवण्यासाठी लागणा-या पाण्यासाठी ही पारंपरिक पद्धत वापरतात. किती पाणी साठवायचे? या अंदाजानुसार दसºयानंतर आड बनवला जातो. जननी, चिकनवाडी, एकीवमुरा, गोरेवाडी, गेळदरे येथे अशा पारंपरिक जलव्यवस्थापन व्यवस्था पाहावयास मिळत आहे. 

शेताच्या उंच ठिकाणी कायमस्वरूपी सिमेंटमध्ये बंधारे बांधले तर डोंगरमाथ्यावरील शेतकरी बारमाही शेती करू शकतील. पाणी साठवणुकीसाठी तलाव बांधल्यास उत्तम प्रकारे शेती करू शकेल.- गणपती गोरे, गोेरेवाडी, कुसुंबीमुराहा आड बारा ते पंधरा फूट लांब, सात ते आठ फूट रुंद, पाच-सहा फूट खोल असतो. सकाळ-संध्याकाळ आड फोडून एका वेळेला दोन ते तीन गुंठे शेतजमीन भिजवली जाते.-शिवाजी गोरे, गोरेवाडी. 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीWaterपाणी