शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
4
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
5
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
6
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
7
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
8
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
9
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
10
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
11
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
12
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
13
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
14
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
15
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
16
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
17
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
18
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
20
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...

कड्या-कपारीत धरती नटली । दीड किलोमीटरवरून पाणी विहिरीत आणले-- पारंपरिक जलव्यवस्थाने केली गव्हाची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 18:43 IST

कास पठार भागातील डोंगर माथ्यावर मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते. जमीन उताराची व मुरबाड असल्याने पावसाळ्यात सर्व पाणी वाहून जाते. परिसरात मोठा पाऊस पडल्याने बहुतांशी ठिकाणी झरे, उफळे फुटले जातात. सुरुवातीस या झऱ्यांना खूप पाणी असते.

ठळक मुद्दे पारंपरिक जलव्यवस्थाने केली गव्हाची शेतीपरिसरात एक किंवा एकापेक्षा अधिक कुटुंबे आळीपाळीने गव्हाची शेती भिजवतात.

सागर चव्हाण।पेट्री : डोंगरमाथ्यावरील बहुतांशी गावांमध्ये कड्याखाली, डोंगरांतील झऱ्याचे पाणी साधारण एक ते दीड किलोमीटर अंतरावरून शेण, चिखल-मातीत सारवलेल्या आडात आणले जात आहे. या पाण्यावरच रब्बी पीक म्हणून गव्हाची शेती कित्येक पिढ्यांपासून पारंपरिक पद्धतीने केली जात आहे.

कास पठार भागातील डोंगर माथ्यावर मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते. जमीन उताराची व मुरबाड असल्याने पावसाळ्यात सर्व पाणी वाहून जाते. परिसरात मोठा पाऊस पडल्याने बहुतांशी ठिकाणी झरे, उफळे फुटले जातात. सुरुवातीस या झऱ्यांना खूप पाणी असते. उन्हाळ्यापर्यंत झ-याचे पाणी कमी होते. येथील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने भात काढल्यानंतर लगेच गहू पेरला जातो.

शेताच्या उंच ठिकाणी आड तयार करून तळापर्यंतच्या वावराला पाणी पोहोचेल, अशी व्यवस्था याद्वारे केली जाते. या परिसरात एक किंवा एकापेक्षा अधिक कुटुंबे आळीपाळीने गव्हाची शेती भिजवतात. दिलेल्या दिवसांची विभागणी करून जेवढे रान भिजेल तेवढे दिलेल्या मुदतीत वावर भिजवले जाते. गव्हाला पाणी कमी पडू नये, यासाठी शेतकरी एक-दीड किलोमीटर अंतरावरून पाट तसेच पाईप जोडून पाणी साठवणुकीसाठी एका आडात आणतात.छिद्र लाकडापासून बनवला जातो ‘व्हॉल्व्ह’आडात तीन इंच पाईपाएवढे एकदम तळाला छिद्र ठेवून त्यावर उभे लाकूड ठेवले जात होते. त्यानंतर चिखलाने छिंदे बंद केले जायचे. आड संपूर्ण भरल्यानंतर लाकूड हलविले की पाणी शेतजमिनीकडे पोहोचते. सध्या काही ठिकाणी व्हॉल्व्ह बसविला जात आहे. डोंगर पट्ट्यात ही व्यवस्था आजही टिकून आहे. भात काढून गहू पेरल्यानंतर तो काढेपर्यंत भिजवण्यासाठी लागणा-या पाण्यासाठी ही पारंपरिक पद्धत वापरतात. किती पाणी साठवायचे? या अंदाजानुसार दसºयानंतर आड बनवला जातो. जननी, चिकनवाडी, एकीवमुरा, गोरेवाडी, गेळदरे येथे अशा पारंपरिक जलव्यवस्थापन व्यवस्था पाहावयास मिळत आहे. 

शेताच्या उंच ठिकाणी कायमस्वरूपी सिमेंटमध्ये बंधारे बांधले तर डोंगरमाथ्यावरील शेतकरी बारमाही शेती करू शकतील. पाणी साठवणुकीसाठी तलाव बांधल्यास उत्तम प्रकारे शेती करू शकेल.- गणपती गोरे, गोेरेवाडी, कुसुंबीमुराहा आड बारा ते पंधरा फूट लांब, सात ते आठ फूट रुंद, पाच-सहा फूट खोल असतो. सकाळ-संध्याकाळ आड फोडून एका वेळेला दोन ते तीन गुंठे शेतजमीन भिजवली जाते.-शिवाजी गोरे, गोरेवाडी. 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीWaterपाणी