शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
6
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
7
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
8
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
9
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
10
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
11
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
12
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
13
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
14
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
15
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
16
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
17
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
18
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
19
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
20
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ

कड्या-कपारीत धरती नटली । दीड किलोमीटरवरून पाणी विहिरीत आणले-- पारंपरिक जलव्यवस्थाने केली गव्हाची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 18:43 IST

कास पठार भागातील डोंगर माथ्यावर मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते. जमीन उताराची व मुरबाड असल्याने पावसाळ्यात सर्व पाणी वाहून जाते. परिसरात मोठा पाऊस पडल्याने बहुतांशी ठिकाणी झरे, उफळे फुटले जातात. सुरुवातीस या झऱ्यांना खूप पाणी असते.

ठळक मुद्दे पारंपरिक जलव्यवस्थाने केली गव्हाची शेतीपरिसरात एक किंवा एकापेक्षा अधिक कुटुंबे आळीपाळीने गव्हाची शेती भिजवतात.

सागर चव्हाण।पेट्री : डोंगरमाथ्यावरील बहुतांशी गावांमध्ये कड्याखाली, डोंगरांतील झऱ्याचे पाणी साधारण एक ते दीड किलोमीटर अंतरावरून शेण, चिखल-मातीत सारवलेल्या आडात आणले जात आहे. या पाण्यावरच रब्बी पीक म्हणून गव्हाची शेती कित्येक पिढ्यांपासून पारंपरिक पद्धतीने केली जात आहे.

कास पठार भागातील डोंगर माथ्यावर मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते. जमीन उताराची व मुरबाड असल्याने पावसाळ्यात सर्व पाणी वाहून जाते. परिसरात मोठा पाऊस पडल्याने बहुतांशी ठिकाणी झरे, उफळे फुटले जातात. सुरुवातीस या झऱ्यांना खूप पाणी असते. उन्हाळ्यापर्यंत झ-याचे पाणी कमी होते. येथील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने भात काढल्यानंतर लगेच गहू पेरला जातो.

शेताच्या उंच ठिकाणी आड तयार करून तळापर्यंतच्या वावराला पाणी पोहोचेल, अशी व्यवस्था याद्वारे केली जाते. या परिसरात एक किंवा एकापेक्षा अधिक कुटुंबे आळीपाळीने गव्हाची शेती भिजवतात. दिलेल्या दिवसांची विभागणी करून जेवढे रान भिजेल तेवढे दिलेल्या मुदतीत वावर भिजवले जाते. गव्हाला पाणी कमी पडू नये, यासाठी शेतकरी एक-दीड किलोमीटर अंतरावरून पाट तसेच पाईप जोडून पाणी साठवणुकीसाठी एका आडात आणतात.छिद्र लाकडापासून बनवला जातो ‘व्हॉल्व्ह’आडात तीन इंच पाईपाएवढे एकदम तळाला छिद्र ठेवून त्यावर उभे लाकूड ठेवले जात होते. त्यानंतर चिखलाने छिंदे बंद केले जायचे. आड संपूर्ण भरल्यानंतर लाकूड हलविले की पाणी शेतजमिनीकडे पोहोचते. सध्या काही ठिकाणी व्हॉल्व्ह बसविला जात आहे. डोंगर पट्ट्यात ही व्यवस्था आजही टिकून आहे. भात काढून गहू पेरल्यानंतर तो काढेपर्यंत भिजवण्यासाठी लागणा-या पाण्यासाठी ही पारंपरिक पद्धत वापरतात. किती पाणी साठवायचे? या अंदाजानुसार दसºयानंतर आड बनवला जातो. जननी, चिकनवाडी, एकीवमुरा, गोरेवाडी, गेळदरे येथे अशा पारंपरिक जलव्यवस्थापन व्यवस्था पाहावयास मिळत आहे. 

शेताच्या उंच ठिकाणी कायमस्वरूपी सिमेंटमध्ये बंधारे बांधले तर डोंगरमाथ्यावरील शेतकरी बारमाही शेती करू शकतील. पाणी साठवणुकीसाठी तलाव बांधल्यास उत्तम प्रकारे शेती करू शकेल.- गणपती गोरे, गोेरेवाडी, कुसुंबीमुराहा आड बारा ते पंधरा फूट लांब, सात ते आठ फूट रुंद, पाच-सहा फूट खोल असतो. सकाळ-संध्याकाळ आड फोडून एका वेळेला दोन ते तीन गुंठे शेतजमीन भिजवली जाते.-शिवाजी गोरे, गोरेवाडी. 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीWaterपाणी