शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
3
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
4
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
5
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
6
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
7
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
8
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
9
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
10
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
11
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
12
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
13
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
14
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
15
Mumbai: १४ वर्षाच्या मुलीशी लग्न करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल
16
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
17
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
18
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
19
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
20
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा

‘अजिंक्यतारा’चे एफआरपीनुसार बिल अदा

By admin | Updated: January 29, 2015 00:08 IST

शिवेंद्रसिंहराजे : साखर उद्योगाला उभारी देण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी

सातारा : ‘अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने एफआरपीनुसार २ हजार ३४६ रुपये ऊसदर जाहीर केला होता. साखरेचे दर उतरल्याने कारखाना एकरकमी बिल अदा करू शकणार नसल्याचे कारखान्याच्या संचालक मंडळाने गळीत हंगाम चालू होण्यापूर्वीच सांगितले होते. पहिल्या हप्त्यात १८०० रुपये अदा करण्यात आले होते. उर्वरित ५४६ रुपये प्रती मे. टन रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. कायद्यानुसार एफआरपीप्रमाणे कारखान्याने ऊसदर दिला आहे. कोणतेही शासकीय अनुदान, पॅकेज न घेता, जिल्हा बँक अथवा इतर कोणत्याही संस्थेकडून आर्थिक मदत न घेता अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने स्वउत्पन्नावर एफआरपीनुसार उसाचे बिल अदा केले आहे,’ अशी माहिती कारखान्याचे तज्ज्ञ संचालक, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.दरम्यान, साखर उद्योगाला उभारी देण्यासाठी एकहाती सत्ता असलेल्या केंद्र शासनाने ठोस भूमिका घेतल्यास ऊसदराचा तिढा कायमचा सुटेल. त्यामुळे शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदारांना दिलासा द्यावा, असे आवाहनही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी म्हटले आहे की, साखरेचे दर उतरल्याने एफआरपीनुसार दर देणे साखर कारखान्यांना अशक्य झाले होते. गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने एफआरपीनुसार दर देण्याचे जाहीर केले होते. त्यावेळी मंडळाने २,३४६ रुपये प्रतिटन ऊसदर देणार असल्याचे जाहीर केले. तसेच कारखान्याची आर्थिक परिस्थिती पाहता ऊस बिल एकरकमी देणे शक्य नसल्याने पहिला हप्ता १८०० रुपये व उर्वरित रक्कम दुसऱ्या हप्त्यात देण्याचेही संचालक मंडळाने जाहीर केले होते. कारखान्याकडे ऊस पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना पहिला हप्ता नियमानुसार अदा करण्यात आला तर, उर्वरित ५४६ रुपये रक्कमही संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. कारखान्याने कोणतेही पॅकेज न घेता, सरकारची अथवा जिल्हा बँक व इतर कोणत्याही संस्थेची मदत न घेता, साखर व अल्कोहोल विक्री, कोजन प्लँट या माध्यमातून स्वउत्पन्नातून एफआरपीनुसार उसाचे बिल अदा केले आहे. नोव्हेंबर अखेर ६९४०२.३९६ मे. टन ऊस गाळप केले. ५४६ प्रती मे. टन याप्रमाणे कारखान्याने ३ कोटी ७८ लाख ९३ हजार ७०९ रुपये केन पेमेंट शेतकऱ्यांना अदा केले आहे. दरवर्षी गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊसदराचा तिढा निर्माण होत असतो. ऊसदरासाठी कायदा आहे, मात्र साखरेच्या स्थिर राहण्याकडे कोणीही लक्ष देत नाही. बाजारपेठेत साखरेचे दर गडगडले की, एफआरपीनुसार ऊसदर देणे जिकिरीचे होते. (प्रतिनिधी) कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे एफआरपीनुसार शेतकऱ्यांना दर मिळावा, हीच इच्छा संचालक मंडळाची होती. कोणाच्याही दबावाखाली कारखान्याने हा निर्णय घेतला नव्हता. शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे दर देता आला, याबद्दल आम्ही समाधानी आहोत.-शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदारपरदेशी कंपन्यांसाठी साखर उद्योग का?घरगुती वापरासाठी किती साखर लागते? साखरेचा वापर होणाऱ्या यादीत घरगुती साखर वापरणाऱ्या ग्राहकांचा चौथा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर कोकाकोला, पेप्सी या परदेशी कंपन्यांचा नंबर लागतो. मग या परदेशी कंपन्या गलेलठ्ठ करण्यासाठी कमी दराने साखर पुरवली जाते का? अशा कंपन्यांना जगविण्यासाठी साखर उद्योग निर्माण केला आहे का? असा परखड सवाल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केला आहे.