शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

भावंडांसाठी अविवाहित राहून काढलं सायकलींचं पंक्चर -- मलटणच्या रज्जूतार्इंची कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 1:34 AM

मलटण : आई-वडिलांचं छत्र हरवल्यानंतर दोन बहिणी आणि भाऊ यांची जबाबदारी स्वीकारत शिक्षणाला रामराम ठोकला आणि सुरू झाला तो संघर्षमय प्रवास आणि अविरत कष्ट,

विकास शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कमलटण : आई-वडिलांचं छत्र हरवल्यानंतर दोन बहिणी आणि भाऊ यांची जबाबदारी स्वीकारत शिक्षणाला रामराम ठोकला आणि सुरू झाला तो संघर्षमय प्रवास आणि अविरत कष्ट, यासाठी रज्जूतार्इंनी कायम अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत अनेक प्रकारच्या छोटी-मोठी कामे केली, वेगवेगळे व्यवसाय सुरू केले.

आपल्या प्रत्येकाची एक वेगळी ओळख असते, त्याचप्रमाणे मलटणमधील रजनी पवार म्हणजेच रज्जूताई! कष्टातून खूप काही मिळवता येतं, खूप काही साध्य करता येतं आणि कष्टानं समाजात एक वेगळी ओळख निर्माण होऊ शकते, हे रज्जूतार्इंनी दाखवून दिले आहे. आज त्यांचं वय साठ वर्षे आहे.

अगदी सुरुवातीला १९८३-८४ मध्ये भाऊ व बहिणींच्या मदतीने शेतीच्या राखणी घेतल्या. काहीकाळ धुणी भांडीही केली. यातून मिळालेल्या पैशातून मलटणमध्ये मिरची कांडपाचा व्यवसाय सुरू केला. पुढे त्यासोबत पिठाची गिरणी सुरू केल्याने मलटणसह आसपासच्या गावातील लोकांच्या ओळखी वाढू लागल्या. दरम्यानच्या काळात तार्इंनी लाकडाची वखारही सुरू केली. काहीवेळा स्वत: लाकडंसुद्धा फोडली. यापुढे जाऊन त्यांनी सायकल पंक्चर दुकान टाकलं. मलटणमधल्या सगळ्या सायकलींची पंक्चर काढल्याचे त्या स्वत: सांगतात. वयोमानामुळे आज त्या थकल्याने हे दुकान बंद आहे.रज्जूतार्इंनी असे अनेक छोटे लघू व्यवसाय सुरू केले. त्यात शेवया मशीन, रद्दी डेपो, भंगार दुकान या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. आजही यातील काही महिला रज्जूतार्इंच्या प्रेरणेतून स्वत:चे व्यवसाय करत आहेत. भंगार दुकानातून भंगार गोळा करणाºया महिलांना रोजगार मिळवून दिल्याने त्यांची आर्थिक प्रगती झाली आहे. रज्जूताई स्वत: भंगार निवडत असत, त्यांनी सुरू केलेला रद्दी डेपो आजही चालू आहे. आजही त्या रद्दी निवडतात अन् बांधतातही. त्या वयाची साठी पार केली असली तरी त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. आजही त्या म्हणतात नवीन काहीतरी करायचंय!मलटणमधील सर्वजण त्यांना रज्जूताई म्हणतात. पुढची पिढी त्यांना रज्जूआत्या म्हणते, तर लहानगे त्यांना रज्जू आज्जी, असे हाक मारतात. अनेकांना त्यांनी मदत केल्याची उदाहरणे आहेत. मलटणमधील एका मुलास साप चावला त्याच्या उपचारासाठी रज्जूतार्इंनी व प्रतापसिंह यांनी घरोघर जाऊन मदत गोळा केली. आज तो मुलगा केवळ तार्इंच्या व प्रतापसिंह यांच्या प्रयत्नातून बचावला.मलटणच्या तरुण मुलांमध्ये रज्जूताई खूप लाडक्या. आपल्या मनातल्या भावना सांगण्यासाठी ही मुलं हमखास त्यांच्याकडे जमतात. सल्ला विचारतात. 

रज्जूताई म्हणजे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी अनेकांना केलेली मदत न विसरण्यासारखी आहे. त्यांचा आम्हा मलटणकरांना कायम आदर राहील.-प्रतापसिंह नाईक-निंबाळकर,