शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

कडक उन्हामुळे सुकू लागली रोपे, ऊस पाचटीच्या आच्छादनामुळे पुन्हा झाली हिरवीगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 14:07 IST

उन्हाच्या तिव्रतेने त्यांना हानी पोहचू नये म्हणून उसाच्या पाचटीचे आच्छादन टाकून टॅकरने पाणी घातल्याने झाडे हिरवीगार झाली आहेत.

सुर्यकांत निंबाळकरआदर्की : पर्यावरणाचा ऱ्हास व कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता होती यांचा विचार करुन बिबी ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा १३०० नाराळाची रोपे लावून जगवली. उन्हाच्या तिव्रतेने त्यांना हानी पोहचू नये म्हणून उसाच्या पाचटीचे आच्छादन टाकल्याने व टॅकरने पाणी घातल्याने झाडे हिरवीगार झाली आहेत.बिबी ता. फलटण येथील तरूण व ग्रामस्थांनी एकत्र येऊन आठ महिन्यापूर्वी बिबी फाटा ते बिबी गाव, शाळा परिसर, बाजार तळ, वाघजाईनगर, महादेव मंदिर परिसर, बिबी-कोराळे रस्ता आदी ठिकाणी खड्डे खोदुन श्रमदानात नारळाची रोपे लावली. प्रारंभी टँकरने पाणी घालुन रोपे जगवली. त्यानंतर तीन किलोमीटर ठिंबक पाईप टाकून कायमस्वरूपी पाण्याची सोय केल्याने रोपे हिरवीगार दिसत होती.परंतू, कडक उन्हामुळे रोपे सुकू लागली होती. म्हणुन सर्व रोपांभोवती उसाच्या पाचटीचे आच्छादन घातल्याने जमिनीची होणारी धूप थांबून टँकरद्वारे घातलेल्या पाण्याचे होणारे बाष्पीभवन थांबले आहे. यामुळे झाडाच्या बुध्यामध्ये ओलावा टिकणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी श्रमदान व लोकवर्गणी दिली. पावसाळ्यात रोपे हिरवीगार दिसत  होती परंतु उन्हाळ्यामुळे झाडांना इजा पोहोचू नये म्हणून पाचटीचे आच्छादन केले आहे.यावेळी संजय बोबडे, अमोल बोबडे, हृषीकेश बोबडे, प्रमोद बोबडे, मंगल बोबडे, विशाल बोबडे, रावसाहेब बोबडे उपस्थित होते.

गावातील तरुण, ग्रामस्थांनी एकत्र येऊन बिबी-फाटा ते बिबी गाव इतर ठिकाणी नारळाची रोपे लावून त्याला ठिंबकव्दारे पाण्याची सोय केली आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणी दिली आहे. पाचटीचे आच्छदन टाकल्याने ओल टिकून राहिली ने झाडे हिरवीगार दिसत आहेत.  - विशाल बोबडे, ग्रामपंचायत सदस्य बिबी ता . फलटण

टॅग्स :Satara areaसातारा परिसरenvironmentपर्यावरण