शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

काँग्रेसच्या अंतर्गत मनोमिलनाची नांदी पश्चिम महाराष्ट्रातून..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 12:36 IST

congress, politics, Prithviraj Chavan, Vilasrao Patil-Undalkar, Satara area काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी विधी व न्यायमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात गेल्या ३५ वर्षांपासून वर्चस्वाचा वाद आहे. या वादाचा दुसरेच फायदा घेण्याची शक्यता निर्माण झाल्याने आता दोन्ही नेत्यांनी दिलजमाई करण्याचा निर्णय घेतलाय.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या अंतर्गत मनोमिलनाची नांदी पश्चिम महाराष्ट्रातून..काहींना स्थानिक राजकारणाची तर काहींना राज्यातील काँग्रेसच्या एकत्रीकरणाची काळजी

दीपक शिंदेसातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी विधी व न्यायमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात गेल्या ३५ वर्षांपासून वर्चस्वाचा वाद आहे. या वादाचा दुसरेच फायदा घेण्याची शक्यता निर्माण झाल्याने आता दोन्ही नेत्यांनी दिलजमाई करण्याचा निर्णय घेतलाय.

स्थानिक पातळीवरील संस्था ताब्यातून जाण्याची भीती पाटील गटाच्या मनात तर पृथ्वीराज चव्हाण यांनी भविष्यातील काँग्रेसच्या बांधणीसाठीची सुुरुवात म्हणून मनोमिलनाला सहमती दर्शविली आहे. एवढाच यातून अर्थबोध घ्यावा लागेल. विलासराव पाटील-उंडाळकर हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असे काँग्रेसच्या माध्यमातून लढत असताना त्यांनी पहिल्यांदा चरखा या चिन्हावर निवडणूक लढविली.

१९८३-८४ आणि ८९ ला देखील त्यांनी प्रामाणिकपणे प्रेमलाकाकी चव्हाण यांच्यासाठी काम केले. त्यानंतर १९९१ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्याला विलासकाकांनी विरोध केला होता. दरम्यानच्या काळात राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले आणि विलासकाका मंत्री झाले. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याचा सपाटा लावला. त्यांनी दिवंगत चिमणराव कदम, अभयसिंहराजे भोसले, शंकरराव जगताप, विक्रमसिंह पाटणकर, भाऊसाहेब गुदगे यांना ताकद दिली आणि जिल्हा परिषद ताब्यात घेतली. हे करत असताना त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांना लांबच ठेवले.

पृथ्वीराज चव्हाण केंद्रातून राज्यात आले आणि मुख्यमंत्री झाले. त्यांच्यासाठी जागा सोडण्यास विलासकाका उंडाळकर यांनी नकार दिला होता. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढविली आणि सात वेळा आमदार असलेल्या विलासकाका पाटील-उंडाळकर यांचा पराभव झाला. त्यानंतर आणखीनच वाढलेले वैरत्व आता संपत आहेत.स्थानिक अडचण दूर अन् राज्याचीही बांधणीविलासराव पाटील-उंडाळकर गटाच्या ताब्यात असलेल्या कोयना दूध संघ, खरेदी-विक्री संघ, बाजार समिती आणि पंचायत समिती ताब्यातून जाऊ नये. याठिकाणी पृथ्वीराज चव्हाण गटाची साथ मिळाली तर वर्चस्व ठेवण्यास काहीच अडचण येणार नाहीत. याची जाणीव झाल्यानेच विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी मनोमिलनाचे नियोजन केले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनाही काँग्रेसमध्ये असलेले मतभेद विसरून आता काँग्रेस नव्या दमाने पुन्हा उभी करण्याचे काम सुरू असल्याचे दाखवून द्यायचे आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणVilasrao Patil-Undalkarविलासराव पाटील-उंडाळकरSatara areaसातारा परिसरcongressकाँग्रेस