शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

काँग्रेसच्या अंतर्गत मनोमिलनाची नांदी पश्चिम महाराष्ट्रातून..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 12:36 IST

congress, politics, Prithviraj Chavan, Vilasrao Patil-Undalkar, Satara area काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी विधी व न्यायमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात गेल्या ३५ वर्षांपासून वर्चस्वाचा वाद आहे. या वादाचा दुसरेच फायदा घेण्याची शक्यता निर्माण झाल्याने आता दोन्ही नेत्यांनी दिलजमाई करण्याचा निर्णय घेतलाय.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या अंतर्गत मनोमिलनाची नांदी पश्चिम महाराष्ट्रातून..काहींना स्थानिक राजकारणाची तर काहींना राज्यातील काँग्रेसच्या एकत्रीकरणाची काळजी

दीपक शिंदेसातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी विधी व न्यायमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात गेल्या ३५ वर्षांपासून वर्चस्वाचा वाद आहे. या वादाचा दुसरेच फायदा घेण्याची शक्यता निर्माण झाल्याने आता दोन्ही नेत्यांनी दिलजमाई करण्याचा निर्णय घेतलाय.

स्थानिक पातळीवरील संस्था ताब्यातून जाण्याची भीती पाटील गटाच्या मनात तर पृथ्वीराज चव्हाण यांनी भविष्यातील काँग्रेसच्या बांधणीसाठीची सुुरुवात म्हणून मनोमिलनाला सहमती दर्शविली आहे. एवढाच यातून अर्थबोध घ्यावा लागेल. विलासराव पाटील-उंडाळकर हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असे काँग्रेसच्या माध्यमातून लढत असताना त्यांनी पहिल्यांदा चरखा या चिन्हावर निवडणूक लढविली.

१९८३-८४ आणि ८९ ला देखील त्यांनी प्रामाणिकपणे प्रेमलाकाकी चव्हाण यांच्यासाठी काम केले. त्यानंतर १९९१ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्याला विलासकाकांनी विरोध केला होता. दरम्यानच्या काळात राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले आणि विलासकाका मंत्री झाले. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याचा सपाटा लावला. त्यांनी दिवंगत चिमणराव कदम, अभयसिंहराजे भोसले, शंकरराव जगताप, विक्रमसिंह पाटणकर, भाऊसाहेब गुदगे यांना ताकद दिली आणि जिल्हा परिषद ताब्यात घेतली. हे करत असताना त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांना लांबच ठेवले.

पृथ्वीराज चव्हाण केंद्रातून राज्यात आले आणि मुख्यमंत्री झाले. त्यांच्यासाठी जागा सोडण्यास विलासकाका उंडाळकर यांनी नकार दिला होता. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढविली आणि सात वेळा आमदार असलेल्या विलासकाका पाटील-उंडाळकर यांचा पराभव झाला. त्यानंतर आणखीनच वाढलेले वैरत्व आता संपत आहेत.स्थानिक अडचण दूर अन् राज्याचीही बांधणीविलासराव पाटील-उंडाळकर गटाच्या ताब्यात असलेल्या कोयना दूध संघ, खरेदी-विक्री संघ, बाजार समिती आणि पंचायत समिती ताब्यातून जाऊ नये. याठिकाणी पृथ्वीराज चव्हाण गटाची साथ मिळाली तर वर्चस्व ठेवण्यास काहीच अडचण येणार नाहीत. याची जाणीव झाल्यानेच विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी मनोमिलनाचे नियोजन केले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनाही काँग्रेसमध्ये असलेले मतभेद विसरून आता काँग्रेस नव्या दमाने पुन्हा उभी करण्याचे काम सुरू असल्याचे दाखवून द्यायचे आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणVilasrao Patil-Undalkarविलासराव पाटील-उंडाळकरSatara areaसातारा परिसरcongressकाँग्रेस