शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

बारामतीकरांनीच केली साताºयात दुष्काळाची निर्मिती : जयकुमार गोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 21:15 IST

‘माण, खटाव, खंडाळा, फलटण तालुक्यांच्या वाटणीचे पाणी पवारांच्या आदेशाने बारामतीला पळविण्यात आले. पदाच्या लालसेपोटी रामराजेंनी हे पाणी तिकडे जाऊ दिले. आता टँकर पुरवून आणि खासदार निधी देऊन दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी खा. शरद पवार

ठळक मुद्देशरद पवारांवर टीका; एक थेंबही जिल्ह्याबाहेर जाऊ देणार नाही

सातारा : ‘माण, खटाव, खंडाळा, फलटण तालुक्यांच्या वाटणीचे पाणी पवारांच्या आदेशाने बारामतीला पळविण्यात आले. पदाच्या लालसेपोटी रामराजेंनी हे पाणी तिकडे जाऊ दिले. आता टँकर पुरवून आणि खासदार निधी देऊन दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी खा. शरद पवार पुढे येत आहेत. बारामतीकर पवार हेच सातारा जिल्ह्यातील दुष्काळाचे निर्माते आहेत,’ अशी कडवी टीका माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी केली.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आ. गोरे बोलत होते. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हेही यावेळी उपस्थित होते.आ. गोरे म्हणाले, ‘धरणांचे पाणी जिल्ह्याबाहेर पळविले जात असताना जिल्ह्यातील नेते मात्र काहीच करत नव्हते. जिल्ह्यातील जनतेने शरद पवार, अजित पवार यांच्यावर जीवापाड प्रेम केले तरी त्यांनी याच जनतेवर अन्याय केला. आता जिल्ह्याची तहान भागत नाही, तोपर्यंत आम्ही पाण्याचा एक थेंबही जिल्ह्याबाहेर जाऊ देणार नाही. त्यासाठी कुठल्याही परिणामांना सामोरे जायची तयारी ठेवली आहे,’ असा इशाराही यांनी दिला. दरम्यान, साताºयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार होते, त्याला इथल्या स्थानिक नेत्यांनीच पाय आडवा घातला, तेच महाविद्यालय बारामतीला झाले, असा आरोपही आ. गोरे यांनी केला.

आ. गोरे म्हणाले, ‘जिल्ह्यातील नेत्यांनी आपली पदे वाचविण्यासाठी बारामतीकरांपुढे लोटांगण घातले. टेंभू योजनेत वांग-मराठवाडी, कोयना, तारळी धरणांचं पाणी जातं. कºहाड, खटाव या तालुक्यांतून कॅनॉल टाकून हे पाणी खानापूर, तासगाव, सांगोल्याला नेलं आहे. जिल्ह्याबाहेरचे ८० हजार ४७२ हेक्टर क्षेत्र टेंभू धरणामुळे पाण्याखाली आले. मात्र, कºहाड व खटाव तालुक्यातील शेतीला त्याचा फायदा झालेला नाही.’आमचं ठरलंय ‘त्यांचा’ कार्यक्रम करायचाभाजप प्रवेशाबाबत विचारले असता आ. गोरे म्हणाले, ‘पक्ष कुठलाही असला तरी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि माझ्यात मैत्री कायम राहील. माझ्याबाबतची भाजप प्रवेशाची चर्चा खोटी आहे. अनेकांनी मला संपविण्याचा प्रयत्न केला, आता मात्र त्यांना संपविण्यासाठी आमचं ठरलंय!,’ असे आ. गोरे म्हणाले.तासगावला पाणी गेलं; फलटणला नाही

रामराजेंच्या सहीनं बारामती, तासगाव, खानापूर, सांगोल्याला पाणी नेण्यात आलं. मात्र त्यांची सही फलटणला पाणी आणण्यासाठी उपयोगात आली नाही. या गोष्टीमुळे रामराजेंच्या घरातीलही त्यांच्या जवळ राहणार नाहीत, येत्या काही दिवसांत फलटणसह संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण बदलणार आहे, असे भविष्यही आ. गोरे यांनी वर्तवले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSharad Pawarशरद पवारJaykumar Goreजयकुमार गोरेWaterपाणी