शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

बारामतीकरांनीच केली साताºयात दुष्काळाची निर्मिती : जयकुमार गोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 21:15 IST

‘माण, खटाव, खंडाळा, फलटण तालुक्यांच्या वाटणीचे पाणी पवारांच्या आदेशाने बारामतीला पळविण्यात आले. पदाच्या लालसेपोटी रामराजेंनी हे पाणी तिकडे जाऊ दिले. आता टँकर पुरवून आणि खासदार निधी देऊन दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी खा. शरद पवार

ठळक मुद्देशरद पवारांवर टीका; एक थेंबही जिल्ह्याबाहेर जाऊ देणार नाही

सातारा : ‘माण, खटाव, खंडाळा, फलटण तालुक्यांच्या वाटणीचे पाणी पवारांच्या आदेशाने बारामतीला पळविण्यात आले. पदाच्या लालसेपोटी रामराजेंनी हे पाणी तिकडे जाऊ दिले. आता टँकर पुरवून आणि खासदार निधी देऊन दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी खा. शरद पवार पुढे येत आहेत. बारामतीकर पवार हेच सातारा जिल्ह्यातील दुष्काळाचे निर्माते आहेत,’ अशी कडवी टीका माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी केली.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आ. गोरे बोलत होते. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हेही यावेळी उपस्थित होते.आ. गोरे म्हणाले, ‘धरणांचे पाणी जिल्ह्याबाहेर पळविले जात असताना जिल्ह्यातील नेते मात्र काहीच करत नव्हते. जिल्ह्यातील जनतेने शरद पवार, अजित पवार यांच्यावर जीवापाड प्रेम केले तरी त्यांनी याच जनतेवर अन्याय केला. आता जिल्ह्याची तहान भागत नाही, तोपर्यंत आम्ही पाण्याचा एक थेंबही जिल्ह्याबाहेर जाऊ देणार नाही. त्यासाठी कुठल्याही परिणामांना सामोरे जायची तयारी ठेवली आहे,’ असा इशाराही यांनी दिला. दरम्यान, साताºयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार होते, त्याला इथल्या स्थानिक नेत्यांनीच पाय आडवा घातला, तेच महाविद्यालय बारामतीला झाले, असा आरोपही आ. गोरे यांनी केला.

आ. गोरे म्हणाले, ‘जिल्ह्यातील नेत्यांनी आपली पदे वाचविण्यासाठी बारामतीकरांपुढे लोटांगण घातले. टेंभू योजनेत वांग-मराठवाडी, कोयना, तारळी धरणांचं पाणी जातं. कºहाड, खटाव या तालुक्यांतून कॅनॉल टाकून हे पाणी खानापूर, तासगाव, सांगोल्याला नेलं आहे. जिल्ह्याबाहेरचे ८० हजार ४७२ हेक्टर क्षेत्र टेंभू धरणामुळे पाण्याखाली आले. मात्र, कºहाड व खटाव तालुक्यातील शेतीला त्याचा फायदा झालेला नाही.’आमचं ठरलंय ‘त्यांचा’ कार्यक्रम करायचाभाजप प्रवेशाबाबत विचारले असता आ. गोरे म्हणाले, ‘पक्ष कुठलाही असला तरी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि माझ्यात मैत्री कायम राहील. माझ्याबाबतची भाजप प्रवेशाची चर्चा खोटी आहे. अनेकांनी मला संपविण्याचा प्रयत्न केला, आता मात्र त्यांना संपविण्यासाठी आमचं ठरलंय!,’ असे आ. गोरे म्हणाले.तासगावला पाणी गेलं; फलटणला नाही

रामराजेंच्या सहीनं बारामती, तासगाव, खानापूर, सांगोल्याला पाणी नेण्यात आलं. मात्र त्यांची सही फलटणला पाणी आणण्यासाठी उपयोगात आली नाही. या गोष्टीमुळे रामराजेंच्या घरातीलही त्यांच्या जवळ राहणार नाहीत, येत्या काही दिवसांत फलटणसह संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण बदलणार आहे, असे भविष्यही आ. गोरे यांनी वर्तवले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSharad Pawarशरद पवारJaykumar Goreजयकुमार गोरेWaterपाणी