शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

बँक कधीच फोन नाही करत, तुम्ही फसताय कसे परत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 05:29 IST

अधिकाऱ्यांना पडलाय प्रश्न । फोनवर माहिती देताना सतर्क राहण्याची गरज

दत्ता यादव 

सातारा : तुमच्या एटीएमची मुदत संपलीय. एटीएम काही वेळात बंद होईल, अशाप्रकारची माहिती सांगून लोकांना संभ्रमात टाकले जाते. एटीएम हे अत्यंत गरजेचे असल्यामुळे फोन आलेल्या व्यक्तीला वेळ न दवडता आणि विचार न करता आपण इत्थंभूत माहिती पटापटा सांगू लागतो. परंतु काही वेळातच आपल्या बँकेच्या खात्यावरून पैसे डेबिट झाल्याचा एसएमएस येतो, तेव्हाच कळते आपली फसवणूक झालीय. परंतु तोपर्यंत फार वेळ झालेला असतो. मात्र, आपली फसवणूक टाळण्यासाठी फक्त आणि फक्त सतर्कताच तुमच्या कामी येणार आहे. अलीकडे लोकांना फसविण्याचे नवनवीन फंडे पुढे येत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘फोन कॉल गंडा.’ या एका फोनमुळे अनेकांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यातून डॉक्टरांपासून व्यावसायिकांपर्यंत कोणीच सुटले नाही.

महिनाभरापूर्वी साताºयातील प्रसिद्ध डॉक्टरांना असाच एक फोन आला. त्यांना संबंधिताने तुमच्या एटीएम कार्डची मुदत संपली आहे. केवळ तुमचा एक मिनिट द्या, थोडी माहिती हवी आहे. असे सांगितले. डॉक्टरांनी कसलीही विचारपूस न करता संबंधिताला त्यांचे बँक डिटेल्स दिले. परंतु तासाभरानंतर डॉक्टरांच्या मोबाईलवर एसएमएस आला. त्यांच्या खात्यातून तब्बल ६ लाख रुपये काढले गेले होते. हा एसएमएस पाहून डॉक्टरांच्या पायाखालची वाळूच सरकली. आपण उच्चशिक्षित असतानाही अशा प्रकारच्या फोनला बळी पडलो, याचे शल्य त्यांच्या मनामध्ये राहिले.आपले पैसे गेले यापेक्षा आपण फसलो गेलो, हे समाजाला आणि आपल्या आप्तस्वकीयांना कळू नये, अशी त्यांची धारणा होती. या डॉक्टरांप्रमाणेच अनेक व्यावसायकही अशा फोन कॉल्समुळे फसले गेले आहेत.वास्तविक अशा प्रकारच्या फोन कॉल्सना उच्चशिक्षित लोकही कसे बळी पडतात, याचे अप्रूपसगळ्यांनाच असते. परंतु त्यावेळची परिस्थिती, विचार करण्याची क्षमता आणि सतर्कतेकडे दुर्लक्ष केल्यामुळेच अशा लोकांची फसगत होत असल्याचे सायबर तज्ज्ञांचे मत आहे. खरं तर बँकेमधून अशाप्रकारचे फोन केले जातात का? हे अनेकांना माहितीही नसते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून ते आपल्या बँक खात्याची माहिती देत असतात.इथेच लोकांची मोठी फसगत होत असते.काय काळजी घ्याल?४अनोळखी व्यक्तीने बँक डिटेल्स विचारल्यासमाहिती देऊ नका.४अनोळखीने मोबाईलवर पाठविलेली कोणतीही लिंक्स उघडू नका. त्या लगेच डिलिट करा.४बँकेचे खाते, एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड व ओटीपीची माहिती कोणालाही मोबाईलवरून देऊ नका.४लॉटरी, बक्षीस लागल्याचे ई-मेल, कॉल, एसएमएस आल्यास त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, त्याकडे दुर्लक्ष करा.एटीएमची मुदत त्यावर लिहिलेली असते. एटीएमची मुदत संपण्यापूर्वी तीन महिने अगोदर खातेदाराला मेल किंवा पत्राद्वारे कळविले जाते. बँकेत आल्यानंतर खातेदाराला दुसरे एटीएम दिले जाते. परंतु एटीएम खराब आहे की, बंद पडले आहे, हे बँकेला कधीही समजत नाही. फक्त एटीएमची मुदत संपणार आहे, हे बँकेला समजतं. मात्र, बँकेतून फोन कधीही केला जात नाही. एटीएमच्या पाठीमागे सीव्हीव्ही नंबर असतो. तो नंबर कुठल्याही परिस्थितीत कोणालाही देऊ नका.- सर्फराज शेख, ब्रँच मॅनेजर, एचडीएफसी बँक, साताराफसगत होण्याची कारणे..४घाईगडबडीत फोन उचलून समोरची व्यक्ती कोण बोलतेय, याची चौकशी न करता त्याकडे दुर्लक्ष करणे.४अनोळखी व्यक्तीला नाही कसे म्हणू, त्याला काय वाटेल, अशी वाटणारी खंत४बँकेतूनच फोन केला गेला आहे, असे वाटणे.४बँकेतून फोन करून खातेदाराची माहिती घेतली जात नाही, हे माहिती नसणे.बँक डिटेल्स मागविण्याचा अधिकार नाही४‘तुमचे एटीएम बंद होणार आहे. किंवा बंद पडले आहे. सुरू करायचे असेल तर एटीएमचा नंबर सांगा,’ अशा प्रकारचा फोन बँकेमधून कधीच केला जात नाही.४कारण बँकेलाच नव्हे तर कस्टमर केअरलाही खातेदाराला फोन करून खातेदाराचे बँक डिटेल्स मागविण्याचाअधिकार नाही.४समजा तुमच्या एटीएमची मुदत संपणार आहे. त्या वेळीबँकेतून अगोदरच तुम्हाला पत्र किंवा मेल केला जातो. त्या वेळीखातेदार बँकेत जाऊन माहिती घेऊ शकतो. परंतु फोनवर अशा प्रकारे कुठलीही माहिती बँक घेत नाही, हे लोकांनी लक्षात ठेवले पाहिजे, असे सायबरतज्ज्ञ अनिकेतकुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरBanking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँक