शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Satara: 'सह्याद्री'च्या निकालानंतर 'बॅलेट पेपर' पुन्हा चर्चेत!; रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचले, म्हणाल्या..

By प्रमोद सुकरे | Updated: April 10, 2025 12:24 IST

ईव्हीएम मशीन मतदान प्रक्रियेवर समाज माध्यमातून टिकेची झोड 

प्रमोद सुकरे कऱ्हाड: गत ४ महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुकीत सुमारे ४० हजारावर मतांनी पराभूत झालेल्या बाळासाहेब पाटीलांनी नुकत्याच झालेल्या सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय संपादन केला. त्यामुळे सध्या त्यांचे सर्वत्र अभिनंदन सुरू आहे. अशातच दुसरीकडे 'ईव्हीएम' मशीन वरील आक्षेप आणि 'बॅलेट पेपर' वरील मतदान पुन्हा चर्चेत आले आहे. सार्वजनिक निवडणुका देखील बॅलेट पेपरच झाल्या पाहिजेत अशा भावना आता समाज माध्यमातुन मोठ्या प्रमाणात व्यक्त होऊ लागल्या आहेत.खरंतर लोकसभा निवडणुकीत राज्यात सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील रोष व्यक्त करीत मतदारांनी आघाडीला चांगले यश दिले. साहजिकच आघाडीला चांगले वातावरण असल्याच्या चर्चा सुरू असतानाच काही महिन्यात विधानसभा निवडणुका झाल्या. मात्र या निवडणुकीत महायुतीने मोठे यश मिळवले. या लाटेत कराड उत्तरेत देखील 'कमळ' फुलले. पण महायुतीला मिळालेल्या या यशामुळे पुन्हा 'ईव्हीएम' मशीन मतदानावरील शंका सुरू झाल्या. याबाबत काहीनी तर न्यायालयात धाव घेतली होती. थोडक्यात तेव्हापासून ईव्हीएम मशीन वरील शंका आणि बॅलेट पेपर वरील मतदानाची मागणी कमी जास्त प्रमाणात सुरूच आहे.नुकतीच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली. त्यात बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात आले. अन् विधानसभेला पराजित झालेल्या बाळासाहेब पाटलांची भाजपचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे व भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या दोन स्वतंत्र पॅनेलचा पराभव करीत मोठ्या फरकाने विजयी मिळविला. सह्याद्रीतील विजयानंतर झालेल्या विजय सभेमध्ये अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणातून बॅलेट पेपरवर हे मतदान झाले अन खरा निकाल लागला असे म्हणत विधानसभेच्या ईव्हीएम मशिन वरील मतदार बोट ठेवले.तर काहींनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत भाषणे केली.त्याला उपस्थितांनी टाळ्या, शिट्ट्या वाजवत दाद दिली. आता तोच धागा पकडत गेल्या ४ दिवसापासून समाज माध्यमातुन ईव्हीएम मशीनवर झोड उठवली जात आहे. तर बॅलेट पेपरवरच मतदान झाले पाहिजे अशा भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत. आता यातून निष्पन्न काय होणार हे माहित नाही .पण बॅलेट पेपर वरील मतदान प्रक्रिया पुन्हा चर्चेत आली आहे हे मात्र नक्की.रोहिणी खडसेंचे ट्विट रोहिणी खडसेंनीही केले ट्विट सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुक निकालानंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. त्यात खासदार रोहिणी खडसे या देखील आहेत.त्यांनी एक ट्विट केले आहे. त्यात 'चार महिन्यांपूर्वी ५० हजार मताधिक्याने जिंकलेला भाजपचा एक आमदार बॅलेट पेपरवर घेतलेल्या सह्याद्री कारखाना निवडणुकीमध्ये विजयी उमेदवारांच्या अर्धी मते पण घेऊ शकला नाही' असे म्हटले आहे. आता त्यांचे हे ट्विट देखील सध्या चर्चेचा विषय बनला आहे. 

गड राखल्याने चर्चा सुरूसहकारी संस्थातील निवडणुका या नेहमीच मतपत्रिकेवर झालेल्या आहेत. त्याच पद्धतीने सह्याद्री कारखान्याची ही निवडणूक झाली. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर सहकारी साखर कारखान्याची झालेली ही पहिलीच निवडणूक आहे. त्या निवडणुकीत शरद पवारांच्या शिलेदाराने गड राखल्याने या सगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडSugar factoryसाखर कारखानेBalasaheb Patilबाळासाहेब पाटीलBJPभाजपाElectionनिवडणूक 2024