शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्याचा सायकल प्रवास, आतापर्यंत केला २५ जिल्हे तीन हजार ४०० किलोमीटरचा प्रवास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 16:56 IST

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आडगाव चे शेतकरी बाळासाहेब कोळसे यांनी अहमदनगर पासून मुंबई पर्यंत सायकल प्रवास सुरू केला आहे.

सातारा : शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला योग्य किंमत मिळावी, एकरी लागणारी ऊस उत्पादन खर्च पकडून शेतकऱ्याला आर्थिक मदत करण्यात यावी, या मागणीसह इतर मागण्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आडगाव चे शेतकरी बाळासाहेब कोळसे यांनी अहमदनगर पासून मुंबई पर्यंत सायकल प्रवास सुरू केला आहे.कोळसे यांनी १३ ऑक्टोबर रोजी अहमदनगर येथून सायकल प्रवासाला सुरुवात केली आतापर्यंत त्यांनी २५ जिल्हे व तीन हजार ४०० किलोमीटर प्रवास पूर्ण केला आहे या प्रवासाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांना भेटून करणार आहेत.बाळासाहेब कोळसे म्हणतात सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत चालली असून शेतकऱ्यांची दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी गटातटाचे राजकारण सोडून सर्वच पक्षांनी व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे गरजेचे आहे. सर्व आमदार-खासदारांनी व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आपसातील मतभेद विसरावेत.

शेतकरी शेतात काबाडकष्ट करतात मोठ्या मेहनतीने उभी करतात त्यात अतिवृष्टी दुष्काळ पिकांवरील रोगराई त्यांचा सामना करून पीक अंतर त्यानंतर पिकाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.

भारतीय अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून असून येथे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली आहे तरी यासाठी योग्य त्या उपाययोजना करून शेतकऱ्यांना वाचवणे गरजेचे आहे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात शेतकर्यांच्या लाजिरवाणी अवस्था म्हणजे अशोभनीय आहे.

कोळसे यांनी केलेल्या मागण्या..- शेतकऱ्यांना कमी पडल्यावर मालाची किंमत ठरवता यावी- सरकारकडून देण्यात येणारी मदत उत्पादनखर्च पकडून देण्यात यावी- शेतकऱ्यांच्या शेतमालाला लागणारा उत्पादन खर्च पकडून हमीभाव द्यावा- सर्व शेतकर्यांना कर्ज मुक्त करण्यात यावे- नोकर भरतीमधील भ्रष्टाचार करण्यात यावा- शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात यावे- शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या- कर्जबाजारी तणावग्रस्त शेतकऱ्यांना आत्महत्या पासून वाचण्यासाठी शासनाकडून हेल्पलाइन सुरू करण्यात यावी- विज पंपासाठी मोफत वीज देण्यात यावी 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीCyclingसायकलिंग