शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
3
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
4
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
5
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
6
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
7
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
8
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
9
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
10
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
11
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
12
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
13
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
14
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
15
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी
16
विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन
17
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
18
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
19
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
20
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)

बलकवडी म्हणजे... आओ जाओ घर तुम्हारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:51 PM

लोकमत न्यूज नेटवर्कवाई : वाई तालुक्यासह फलटण, खंडाळा तालुक्यांना पाणीपुरवठा करणारे बलकवडी धरण सध्या विविध समस्येच्या गर्तेत अडकले आहे. धरणाच्या सुरक्षेविषयीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धरणावर कसलीही सुरक्षा नसल्याने प्रेमीयुगलांसह मद्यपींचा वावर वाढला असून ‘आओ-जाओ घर तुम्हारा’ असे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.बलकवडी धरणाच्या मुख्य भिंतीवरच झाडा-झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाई : वाई तालुक्यासह फलटण, खंडाळा तालुक्यांना पाणीपुरवठा करणारे बलकवडी धरण सध्या विविध समस्येच्या गर्तेत अडकले आहे. धरणाच्या सुरक्षेविषयीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धरणावर कसलीही सुरक्षा नसल्याने प्रेमीयुगलांसह मद्यपींचा वावर वाढला असून ‘आओ-जाओ घर तुम्हारा’ असे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.बलकवडी धरणाच्या मुख्य भिंतीवरच झाडा-झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे धरणाच्या बांधकामालाच धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सुरक्षा राम भरोसे असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वाढलेली झाडे मद्यपी तसेु प्रेमीयुगुलांचा आश्रय बनली आहेत. त्यामुळे बलकवडी धरण परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.बलकवडी धरणाच्या उभारणीसाठी कोट्यवधी निधी खर्च करण्यात आला आहे. वाई तालुक्याची जिव्हाळ्याची असणारी ‘जललक्ष्मी’ योजना याच धरणावर आहे. हजारो हेक्टर जमीन या योजनेच्या पाण्यावर भिजते. या भागातील अनेकांनी धरणासाठी आपल्या जमिनी देऊन स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवले आहे. नागरिकांच्या त्यागामुळेच धरण परिसराचा कायापालट झाला आहे. ही बाब पाटबंधारे विभाग गांभीर्याने घेत नसल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धरणाच्या सुरक्षिततेबाबत पाटबंधारे विभागाला अनेकदा सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, या विभागाच्या दुर्लक्षामुळे धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.सध्या दिवाळीची सुटी पडल्याने धरण परिसराला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. अनेक पर्यटक थेट धरणाच्या भिंतीवर जाऊन फोटोसेशन करताना दिसत आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने पर्यटकांना अडविणारे कोणीही नाही. याचा फायदा घेऊन पर्यटक संपूर्ण धरणावर बिनधास्तपणे वावरत आहेत. त्यामुळे दुर्दैवाने एखादी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, हाही प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित होत आहे.धरणाच्या मुख्य भिंतीवरच झाडे उगविल्याने भिंतीवरील माती वाहून गेल्याने दगडाच्या बांधकामाला धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक धरणाची सुरक्षा धरणावर झाडे उगविल्याने धोक्यात आली आहे. अनेक धरणांना झाडाझुडपांमुळे गळती लागून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. अशी अनेक उदाहरणे समोर असताना बलकवडी धरणाच्या सुरक्षेकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. पाटबंधारे विभागाच्या वतीने भिंतीवरील झुडपे तातडीने काढावी तसेच याठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.झाडाझुडपात बाटल्यांचा खच...धरण परिसरात मद्यपींचा वावर वाढला असून हे चित्र दररोज पहावयास मिळते. या ठिकारी झाडाझुडपात दारूच्या बाटल्यांचा खच साचला असून बाटल्यांचे प्रमाण दररोज वाढतच चालले आहे. त्यामुळे धरण परिसरात घाणीचे साम्राज्य पसरत चालले आहे. या धरणाच्या सुरक्षेविषयी अनेकवेळा आवाज उठवूनही पाटबंधारे विभाग याकडे गांभिर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. मद्यपींचा बंदोबस्त करण्यासाठी पाटंबधारे विभागाने पोलिस प्रशासनाच्या मदतीने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी येथील नागरिकांच्या वतीने केली जात आहे.