शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

सातारा: सुर्ली घाटातील रस्त्यासाठी आत्मदहनाचा इशारा, रस्त्याची अवस्था बनलीय दयनीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 18:24 IST

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष

कऱ्हाड : गुहाघर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर सुर्ली घाटातील रस्त्याची दयनीय आवस्था झाली आहे. घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने ३० नोव्हेंबरपर्यंत सुर्ली घाट व ओगलेवाडी रेल्वे पुलावरील रस्त्याचे काम सुरू करावे, अन्यथा सर्वपक्षीयांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.याबाबत प्रांत कार्यालयाला निवेदन देण्यात आले. यावेळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, भीमराव ढमाले, नवनाथ पाटील, अधिक सुर्वे, दिगंबर डांगे, मुरारजी माने, मिलिंद सुर्वे, सर्जेराव पानवळ, मानव कल्याणकारी संघटनेचे सलीम पटेल, सुरेश वेताळ, आनंदा माने, विजय आतकरे, सोहेल तांबोळी, अरविंद यादव व ग्रामस्थ उपस्थित होते.प्रशांत यादव म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माध्यमातून कराड-विटा रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, सुर्ली घाटातील रस्ता वन विभागाच्या हद्दीत येत असल्याने जवळपास तीन वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. तर विद्यार्थी, शेतकरी व नोकरदार वर्गालाही याचा फटका बसत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने ३० नोव्हेंबरपर्यंत सुर्ली घाट व रेल्वे पुलावरील रस्त्याचे काम सुरू करावे, अन्यथा सुर्ली, कामथीसह परिसरातील गावांतील ग्रामस्थांना सोबत घेऊन तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष...सुर्ली घाटातील रस्त्याचे काम तातडीने करावे यासाठी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने वेळोवेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad transportरस्ते वाहतूकhighwayमहामार्ग