शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सातारा: सुर्ली घाटातील रस्त्यासाठी आत्मदहनाचा इशारा, रस्त्याची अवस्था बनलीय दयनीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 18:24 IST

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष

कऱ्हाड : गुहाघर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर सुर्ली घाटातील रस्त्याची दयनीय आवस्था झाली आहे. घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने ३० नोव्हेंबरपर्यंत सुर्ली घाट व ओगलेवाडी रेल्वे पुलावरील रस्त्याचे काम सुरू करावे, अन्यथा सर्वपक्षीयांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.याबाबत प्रांत कार्यालयाला निवेदन देण्यात आले. यावेळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, भीमराव ढमाले, नवनाथ पाटील, अधिक सुर्वे, दिगंबर डांगे, मुरारजी माने, मिलिंद सुर्वे, सर्जेराव पानवळ, मानव कल्याणकारी संघटनेचे सलीम पटेल, सुरेश वेताळ, आनंदा माने, विजय आतकरे, सोहेल तांबोळी, अरविंद यादव व ग्रामस्थ उपस्थित होते.प्रशांत यादव म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माध्यमातून कराड-विटा रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, सुर्ली घाटातील रस्ता वन विभागाच्या हद्दीत येत असल्याने जवळपास तीन वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. तर विद्यार्थी, शेतकरी व नोकरदार वर्गालाही याचा फटका बसत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने ३० नोव्हेंबरपर्यंत सुर्ली घाट व रेल्वे पुलावरील रस्त्याचे काम सुरू करावे, अन्यथा सुर्ली, कामथीसह परिसरातील गावांतील ग्रामस्थांना सोबत घेऊन तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष...सुर्ली घाटातील रस्त्याचे काम तातडीने करावे यासाठी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने वेळोवेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad transportरस्ते वाहतूकhighwayमहामार्ग