शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: सुर्ली घाटातील रस्त्यासाठी आत्मदहनाचा इशारा, रस्त्याची अवस्था बनलीय दयनीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 18:24 IST

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष

कऱ्हाड : गुहाघर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर सुर्ली घाटातील रस्त्याची दयनीय आवस्था झाली आहे. घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने ३० नोव्हेंबरपर्यंत सुर्ली घाट व ओगलेवाडी रेल्वे पुलावरील रस्त्याचे काम सुरू करावे, अन्यथा सर्वपक्षीयांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.याबाबत प्रांत कार्यालयाला निवेदन देण्यात आले. यावेळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, भीमराव ढमाले, नवनाथ पाटील, अधिक सुर्वे, दिगंबर डांगे, मुरारजी माने, मिलिंद सुर्वे, सर्जेराव पानवळ, मानव कल्याणकारी संघटनेचे सलीम पटेल, सुरेश वेताळ, आनंदा माने, विजय आतकरे, सोहेल तांबोळी, अरविंद यादव व ग्रामस्थ उपस्थित होते.प्रशांत यादव म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माध्यमातून कराड-विटा रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, सुर्ली घाटातील रस्ता वन विभागाच्या हद्दीत येत असल्याने जवळपास तीन वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. तर विद्यार्थी, शेतकरी व नोकरदार वर्गालाही याचा फटका बसत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने ३० नोव्हेंबरपर्यंत सुर्ली घाट व रेल्वे पुलावरील रस्त्याचे काम सुरू करावे, अन्यथा सुर्ली, कामथीसह परिसरातील गावांतील ग्रामस्थांना सोबत घेऊन तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष...सुर्ली घाटातील रस्त्याचे काम तातडीने करावे यासाठी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने वेळोवेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad transportरस्ते वाहतूकhighwayमहामार्ग