कोरेगाव शहर वीज पुरवठ्याबद्दल स्वयंपूर्ण : शशिकांत शिंदे
By Admin | Updated: June 21, 2017 15:06 IST2017-06-21T15:06:45+5:302017-06-21T15:06:45+5:30
नवीन उच्चदाब शक्तीच्या ट्रान्सफॉर्मरचे लोर्कापण

कोरेगाव शहर वीज पुरवठ्याबद्दल स्वयंपूर्ण : शशिकांत शिंदे
आॅनलाईन लोकमत
कोरेगाव , दि. २१ : कोरेगाव शहराची वीज समस्या कायमस्वरुपी संपविण्यात आली आहे. अथक परिश्रमानंतर औद्योगिक वसाहत उपकेंद्रामध्ये नवीन उच्चदाब शक्तीचा ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाला असून, त्याद्वारे शहराला अखंडीत वीज पुरवठा केला जात आहे. स्मार्ट सिटी योजनेतील विजेबाबत दिलेले आश्वासन पूर्ण केले असून, शहर आता वीज पुरवठ्याबाबत स्वयंपूर्ण बनले आहे, असे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंंदे यांनी केले.
महावितरण कंपनीच्या कोरेगाव औद्योगिक वसाहत उपकेंद्रामध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या नवीन उच्चदाब शक्तीच्या ट्रान्सफॉर्मरचे लोर्कापण आ. शिंंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, कार्यकारी अभियंता सुनील माने, अतिरिक्त कार्यकारी अभियंता के. वाय. देशपांडे, उपकार्यकारी अभियंता अभिजित महामुनी, सहाय्यक अभियंता संतोष तळपे उपस्थित होते.
आ. शिंंदे पुढे म्हणाले, सातत्याने खंडीत होत असलेल्या वीज पुरवठ्याबाबत शहरवासियांनी आंदोलन केले होते, त्याची दखल घेत स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर उभारणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. याबाबत मी स्वत ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बोललो होतो, त्यांनी मंजुरी दिल्याने अवघ्या एक वर्षाच्या आत काम मार्गी लागले असून शहराला आता २४ तास अखंड वीज पुरवठा होणार आहे.
महावितरण कंपनीच्या अभियंत्यांनी मनोगतामध्ये आव्हानात्मक काम लवकर केल्याचे समाधान असल्याचे सांगितले. अभिजित महामुनी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. गणेश होळ यांनी सूत्रसंचालन केले. संतोष तळपे यांनी आभार मानले. कार्यक्रमास नगरसेवक संजय पिसाळ, नागेश कांबळे, किशोर बर्गे, महादेव जाधव, नगर विकास कृती समितीचे राजेश बर्गे, पृथ्वीराज बर्गे, संतोष नलावडे, सचिन बर्गे, गणेश धनवडे, राजेंद्र दिसले, सुभाष धनवडे, प्रशांत खिरे, अमोल जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
आता २४ तास पाणी देण्याचा प्रयत्न
विजेच्याबाबतीत स्वयंपूर्ण झाल्याने आता शहरवासियांना २४ तास मुबलक पाणी देण्याचाही प्रयत्न सुरु आहे. शहरात दजेर्दार एलईडी पथदिव्यांबरोबरच सौरउर्जा प्रकल्पही उभारण्यात येणार आहे. नगरपंचायतीच्या माध्यमातून अनेकविध चांगले उपक्रम हाती घेतले असल्याचेही आ. शिंंदे यांनी निदर्शनास आणून दिले.