शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

लेखकावर गवंड्याच्या हाताखाली काम करण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 17:02 IST

उंब्रज : ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, बाबा कदम यांनी लिहिलेल्या पुस्तकांनीच मला लिहिण्याची प्रेरणा दिली. ३ कादंबºया, ३ कथासंग्रह, १ चरित्र लिहिले. हे सांगणाºया कºहाड तालुक्यातील मरळी येथील लेखक शंकर कवळे यांच्या ‘माणुसकीचा मोठेपणा’ या कथासंग्रहातील माणुसकी आणि मोठेपणा ही कथा चौथीच्या मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात घेण्यात आली आहे.

ठळक मुद्दे कथा शंकर कवळे यांच्या ‘माणुसकी’च्या मजुरीची ! पाठ्यपुस्तकात कथेचा समावेश दरवर्षी मानधन मिळणार आहे ते फक्त दोनशे रुपये.

उंब्रज : ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, बाबा कदम यांनी लिहिलेल्या पुस्तकांनीच मला लिहिण्याची प्रेरणा दिली. ३ कादंबºया, ३ कथासंग्रह, १ चरित्र लिहिले. हे सांगणाºया कºहाड तालुक्यातील मरळी येथील लेखक शंकर कवळे यांच्या ‘माणुसकीचा मोठेपणा’ या कथासंग्रहातील माणुसकी आणि मोठेपणा ही कथा चौथीच्या मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात घेण्यात आली आहे.

दरम्यान, माणुसकी आणि मोठेपणा ही कथा लिहिणारा हा लेखक आज दोनवेळची घरातील चूल पेटविण्यासाठी गवंड्याच्या हाताखाली मजूर म्हणून राबत आहे. दुसºयाचा शेतात मजूरी करतोय. उद्याचा दिवस चांगला उगवेल आणि माझे लेखन पुन्हा सुरू होईल, या आत्मविश्वासाने आज परिस्थितीशी झगडत आहे, याकडे कोणाचेच लक्ष नाही.

   कºहाड तालुक्यातील मरळी हे छोटे खेडेगाव. खंडोबाच्या पाली या गावापासून ३ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. या गावात शंकर दिनकर कवळे यांचा जन्म झाला. वडील दिनकर हे दोरखंड वळायचे काम करत, तर आई शकुंतला शेतमजुरी करायची. ५ भाऊ, ३ बहिणी असा मोठा परिवार. १ गुंठा जमीन नाही. गरीबी पाचवीला पुजलेली. पण शंकर यांना शिकायचं होतं. घरच्या आर्थिक परिस्थितीशी झगडत त्यांनी १२ वी पर्यंत शिक्षण घेतले आणि शेवटी परिस्थिती पुढे हार पत्करली. दुगलीवरची गाई घेऊन तिला चरण्यासाठी डोंगर गाठू लागले. पण काही तरी शिकायचेच ही इच्छा गप्प बसू देत नव्हती.  मोठ्या भावाने आणलेली लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, बाबा कदम यांची पुस्तके ते डोंगरात बसून वाचू लागले आणि हीच पुस्तके त्यांच्या लेखणीला प्रेरणादायी ठरली.

हुंडाविरोधी ‘आरती’, प्रेम कसे असावे सांगणारी ‘अनुराग’ आणि ग्रामीण भागातील वास्तव सांगणारी ‘बिजली’ या ३ कादंबºया अस्तित्वात आल्या. माणुसकीचा मोठेपणा, खरा माणूस, बुद्धीमान बिरबल हे कथासंग्रह तयार झाले आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे चरित्र त्यांनी लिहिले.

लेखक शंकर कवळे सांगतात, मी लिखाणास सुरुवात केली की तहान, भूक हरपते. फक्त लिखाणच सुरू होते. हे सर्व लिखाण मी गावातील ज्योतिबाच्या देवळाच्या गाभाºयात बसून केले आहे. घर अपुरे, त्यामुळे देवळच घर होते. गाभाराच लिखाणाची खोली बनवली. लिहिलेले लिखाण प्रकाशित करण्यासाठी खूप ठेचा खाल्या. अल्प मानधनात वितरकांना हक्क दिले. पण पुस्तके प्रकाशित केली. मला अधिकाधिक मानधन मिळाले ते म्हणजे चार हजार रुपये. हीच आतापर्यंतची अधिकची कमाई.

          आज शंकर कवळे हे दहा बाय दहाच्या खोलीत राहतात. पावसाने ओले झालेल्या या खोलीत शंकररावांच्या माणुसकीचा मोठेपणापासून इतर सर्व पुस्तके पाहताना, वाचताना मन मात्र ओलेचिंब होऊन जाते. प्लास्टिकच्या पिशवीतून ते एक एक पुस्तक बाहेर काढत होते. त्यांची वास्तववादी लिखाणाची शैली मनाला भुरळ पाडत होती.

बोलत बोलत शंकरराव स्वत:च्या आयुष्याच्या पुस्तकाचे एक एक पान उलघडू लागले. लग्न उशिरा झाले, लग्न करून घरात आल्यानंतर पत्नी पूनम या दुसºयाच्या शेतात शंकररावांच्या बरोबर मजुरी करण्यास जाऊ लागल्या. ते आज अखेर सुरूच आहे. पण, पती लेखक आहेत याचा मात्र त्यांना नितांत अभिमान आहे. शंकररावांची मुलगी कादंबरी सद्या ७ वीत शिकतेय आणि मुलगा विश्वम हा दीड वर्षाचा आहे.

कादंबरी घरातच होती म्हणून सहज विचारले. शाळेत का गेली नाही.तर शंकरराव बोलले आजारी आहे, दवाखान्यात न्यायची आहे. पण, पैसे नाहीत म्हणून नेली नाही. उद्या नेणार आहे. एवढी विदारक परिस्थिती दिसून आली. पण अजूनही शंकरराव खचले नाहीत. घराकडे पाहून म्हणाले, घरकुल मिळतंय पण जागा नाही. पण बघू, अजून खूप लिहायचे आहे, पण वेळ मिळत नाही. सर्व वेळ जगण्यासाठीच्या कमाई वर जातोय.

पाठ्यपुस्तकात तुमची कथा कशी काय प्रसिध्द झाली, या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, एका मासिकात लोकशाहीत वागावं कसं? हा मी लिहिलेला लेख प्रसिध्द झाला होता. हा लेख वाचून जयसिंगपूरचे प्रा. जगन्नाथ गवळी यांनी संपर्क साधला. माझे सर्व लिखाण त्यांनी वाचले आणि कथासंग्रह पाठ्यपुस्तक महामंडळाकडे पाठवून देण्यास सांगितले. मी वर्षापूर्वी कथासंग्रह पाठवून दिला आणि महामंडळाने माझी कथा चौथीच्या मराठी माध्यमाच्या पुस्तकासाठी निवडली आणि प्रसिद्ध केली .याबाबत मला दरवर्षी मानधन मिळणार आहे ते फक्त दोनशे रुपये.शंकरराव सांगतात, माझा गावात कोणी मित्र ही नाही आणि शत्रू ही. मी आणि कुटुंब यापुरताच मर्यादित असतो. अजून खूप लिखाण करायचं आहे. जे डोक्यात आहे ते लेखणीतून उतरण्यासाठी मला वेळ पाहिजे. हा वेळ मिळण्यासाठी मला जगण्याच्या लढाईतून उसंत मिळणे गरजेचे आहे. शंकररावांना ही उसंत मिळण्यासाठी, त्यांची लेखणी पुन्हा परजण्यासाठी शासन, समाजसेवी संघटना आणि वाचक यांच्याकडून आर्थिक मदतीचा हात मिळेल का हा प्रश्न आहे.        

    शंकर कवळे यांनी आरती ही कादंबरी लिहिली त्याची एकच प्रत त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ही कादंबरी ते इतरांना वाचण्यासाठी देऊ ही शकत नाहीत. त्यांची प्रसिद्ध झालेलीे सर्व पुस्तके त्यांनी नाममात्र मानधन घेऊन वितरकांना सर्व हक्कासह दिली आहेत. काहींचे मानधन ही मिळालेले नाही. शंकर कवळे लिखित पुस्तके मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपºयात वितरीत झाली आहेत. हे त्यांना वाचकांनी पाठवलेल्या पत्रांच्यामुळे लक्षात येते. चंद्रपूर जिल्ह्यातील सोनेगाव (बिगूर) येथील लीना ढोणे या पत्रातून लिहितात, ‘तुमची सर्व पुस्तके वाचली. तुमची पुस्तके वाचत असताना वाटते समोर जणू काही नाटकच सुरू आहे, असा भास होत होता. अशी आलेली पत्रे कवळे यांच्या लेखनशैलीची खासियत निदर्शनास आणून देताना दिसून येतात.