शहरं
Join us  
Trending Stories
1
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
6
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
7
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
8
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
9
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
10
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
11
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
12
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
13
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
14
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
15
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
16
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
17
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
18
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
19
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दलाकडे जनतेचा बघण्याचा दृष्टिकोन हुतात्म्यांमुळे बदलला

By admin | Updated: November 28, 2014 00:15 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे प्रतिपादन

भुर्इंज : ‘सातारची भूमी ही शूरवीरांची भूमी आहे. इथल्या मातीने क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांच्यासारख्या रत्नांबरोबरच २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यात अजमल कसाब सारख्या दहशतवाद्याला पकडणाऱ्या हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्यासारखा धाडशी पोलीस अधिकारीही दिला आहे. या वीरांनी राज्यातील जतनेचा पोलीस दलाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला,’ असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी केले.
किसन वीर कारखाना कार्यस्थळावर २६/११ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला परतवून लावताना आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन, मानवंदना आणि संविधान दिन अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खंडाळा साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, भुर्इंज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची उपस्थिती होती.
देशमुख म्हणाले, ‘तुकाराम ओंबळेंनी कसाबला पकडले नसते, तर मुंबईत आणखी लोक मारले गेले असते. दहशतवाद्यांचे मनसुबे जगाला कळले नसते. ओंबळेंनी देशभक्तीने प्रेरित होऊन हिमतीचे काम केले. त्यांच्यासह या हल्ल्यातील हुतात्म्यांचे कल्पनाशक्तीचा योग्य वापर करत उचित स्मारक उभारून मदन भोसलेंनी देशभक्तीतून सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. कारखान्याने उभारलेले हे स्मारक खऱ्या अर्थाने आजच्या तरुण पिढीचे प्रेरणास्थळ आहे.’
प्रारंभी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दल व कारखान्याच्या सुरक्षारक्षकांनी हुतात्म्यांना मानवंदना दिली.
यावेळी कारखान्याचे संचालक संचालक नारायणराव पवार, नंदाभाऊ जाधव, हणमंतराव पिसाळ, चंद्रकांत इंगवले, सुभाष साळुंखे, संदीप पोळ, अशोक मोरे, रोहिदास पिसाळ, अ‍ॅड. प्रभाकर बर्गे, किसनराव कदम, रतनसिंह शिंदे, नंदकुमार निकम, लालसिंग जमदाडे, सचिन साळुंखे, सुनंदा चव्हाण, कार्यकारी संचालक विजय वाबळे, मोहनराव भोसले, प्रल्हाद चव्हाण, बापूसाहेब शिंदे, सतीश भोसले, धनाजी डेरे, प.ना. पोतदार, चंद्रकांत चव्हाण, शंकरराव पवार, नवनाथ केंजळे, बाळासाहेब कांबळे, विलासराव जाधव, मधुकर शिंदे, शिवाजीराव जाधव-पाटील, उपस्थित होते. (प्रतिनिधी)