शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

आश्वासन दिले; पण वेळ नाही म्हणे!

By admin | Updated: September 10, 2016 00:39 IST

शेतकरी हवालदील : जमिनीवरचे शिक्के कधी काढणार; शेतकऱ्यांना पडला प्रश्न

खंडाळा : तालुक्यातील औद्योगिकीकरण टप्पा क्र. तीन मधील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शिक्के काढण्यासाठी १५८९ हेक्टर क्षेत्रासाठी ७५२ हरकती दाखल झाल्या आहेत. शिक्के काढण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी यासाठी शेतकऱ्यांनी उपोेषणाचा मार्ग पत्करला होता. उपोेषण सोडताना पंधरा दिवसांत मीटिंग घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. मात्र, महिन्यानंतरही साधी मीटिंगची तारीखही ठरविण्यात आली नाही. त्यामुळे शिक्के काढण्याचा प्रश्न प्रलंबितच असून, शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत.खंडाळा तालुक्यात औद्योगिकीकरणाचा तिसरा टप्पा खंडाळा, बावडा, म्हावशी, अहिरे, मोर्वे, शिवाजीनगर, भादे या सात गावांतील जमिनीवर साकारला जात आहे. यामध्ये जवळपास १६८० हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला होता. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमीन अधिग्रहण करता येणार नसल्याचा शासनाचा कायदा आहे. मात्र, या जमिनीवर एमआडीसीचे शिक्के असल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. अधिग्रहणाला विरोध असताना शिक्के का काढले जात नाहीत? ते तातडीने काढण्यात यावेत, यासाठी अस्थानिक शेतकऱ्यांनी उपोषण केले होते. चार दिवसांच्या उपोषणानंतर पालकमंत्री विजय शिवतारे, शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम जाधव यांच्या मध्यस्थीने शेतकऱ्यांनी उपोषण सोडले. शिक्के काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यासठी १५ दिवसांत उद्योगमंत्री व संबंधित विभागाचे अधिकारी यांची बैठक घेऊन यावर मार्ग काढण्याचे लेखी आश्वासन दिले होते. १२ आॅगस्ट रोजी उपोषणाची सांगता केली गेली. त्यानंतर २५ आॅगस्टपर्यंत बैठकीचे नियोजन करण्याचे ठरले होते. मात्र, राज्यकर्त्यांसह मध्यस्थांनाही त्याचा विसर पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर येत आहे.शेतकऱ्यांना हरकती दाखल करता याव्यात, यासाठी काही दिवस खंडाळा तहसील कार्यालय व त्यानंतर फलटण प्रांत कार्यालयात सोय केली होती. यामध्ये शिवाजीनगर- ४०६ हेक्टर, मोर्वे- ४१२ हेक्टर, भादे- २७८ हेक्टर, अहिरे- २६७ हेक्टर, म्हावशी- १४३ हेक्टर, खंडाळा- १६ हेक्टर, बावडा- ६२ हेक्टर, अशा एकूण १५८९ हेक्टर क्षेत्राबाबत हरकती दाखल झाल्या आहेत. पूर्वी दिलेल्या हरकती गहाळ झाल्याने शेतकऱ्यांनी नव्याने हरकती दिल्या आहेत. शासनस्तरावर तातडीने यावर कार्यवाही होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी धावपळ केली खरी. मात्र, अद्यापतरी राज्य शासन स्तरावर कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. (प्रतिनिधी)आमच्या जमिनीवर नाहक शिक्के मारले गेले आहेत. ते काढून शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ मिळाला, यासाठी आम्ही शेतकरी कृती समितीच्या वतीने उपोषण केले. सत्ताधाऱ्यांनी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेतले. मात्र, पंधरा दिवसांची मुदत देऊनही काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आमच्यापुढे पेचप्रसंग निर्माण झाला आहे.- तेजस भोसले, शेतकरी, शिवाजीनगर