शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

आश्वासन दिले; पण वेळ नाही म्हणे!

By admin | Updated: September 10, 2016 00:39 IST

शेतकरी हवालदील : जमिनीवरचे शिक्के कधी काढणार; शेतकऱ्यांना पडला प्रश्न

खंडाळा : तालुक्यातील औद्योगिकीकरण टप्पा क्र. तीन मधील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शिक्के काढण्यासाठी १५८९ हेक्टर क्षेत्रासाठी ७५२ हरकती दाखल झाल्या आहेत. शिक्के काढण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी यासाठी शेतकऱ्यांनी उपोेषणाचा मार्ग पत्करला होता. उपोेषण सोडताना पंधरा दिवसांत मीटिंग घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. मात्र, महिन्यानंतरही साधी मीटिंगची तारीखही ठरविण्यात आली नाही. त्यामुळे शिक्के काढण्याचा प्रश्न प्रलंबितच असून, शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत.खंडाळा तालुक्यात औद्योगिकीकरणाचा तिसरा टप्पा खंडाळा, बावडा, म्हावशी, अहिरे, मोर्वे, शिवाजीनगर, भादे या सात गावांतील जमिनीवर साकारला जात आहे. यामध्ये जवळपास १६८० हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला होता. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमीन अधिग्रहण करता येणार नसल्याचा शासनाचा कायदा आहे. मात्र, या जमिनीवर एमआडीसीचे शिक्के असल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. अधिग्रहणाला विरोध असताना शिक्के का काढले जात नाहीत? ते तातडीने काढण्यात यावेत, यासाठी अस्थानिक शेतकऱ्यांनी उपोषण केले होते. चार दिवसांच्या उपोषणानंतर पालकमंत्री विजय शिवतारे, शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम जाधव यांच्या मध्यस्थीने शेतकऱ्यांनी उपोषण सोडले. शिक्के काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यासठी १५ दिवसांत उद्योगमंत्री व संबंधित विभागाचे अधिकारी यांची बैठक घेऊन यावर मार्ग काढण्याचे लेखी आश्वासन दिले होते. १२ आॅगस्ट रोजी उपोषणाची सांगता केली गेली. त्यानंतर २५ आॅगस्टपर्यंत बैठकीचे नियोजन करण्याचे ठरले होते. मात्र, राज्यकर्त्यांसह मध्यस्थांनाही त्याचा विसर पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर येत आहे.शेतकऱ्यांना हरकती दाखल करता याव्यात, यासाठी काही दिवस खंडाळा तहसील कार्यालय व त्यानंतर फलटण प्रांत कार्यालयात सोय केली होती. यामध्ये शिवाजीनगर- ४०६ हेक्टर, मोर्वे- ४१२ हेक्टर, भादे- २७८ हेक्टर, अहिरे- २६७ हेक्टर, म्हावशी- १४३ हेक्टर, खंडाळा- १६ हेक्टर, बावडा- ६२ हेक्टर, अशा एकूण १५८९ हेक्टर क्षेत्राबाबत हरकती दाखल झाल्या आहेत. पूर्वी दिलेल्या हरकती गहाळ झाल्याने शेतकऱ्यांनी नव्याने हरकती दिल्या आहेत. शासनस्तरावर तातडीने यावर कार्यवाही होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी धावपळ केली खरी. मात्र, अद्यापतरी राज्य शासन स्तरावर कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. (प्रतिनिधी)आमच्या जमिनीवर नाहक शिक्के मारले गेले आहेत. ते काढून शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ मिळाला, यासाठी आम्ही शेतकरी कृती समितीच्या वतीने उपोषण केले. सत्ताधाऱ्यांनी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेतले. मात्र, पंधरा दिवसांची मुदत देऊनही काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आमच्यापुढे पेचप्रसंग निर्माण झाला आहे.- तेजस भोसले, शेतकरी, शिवाजीनगर