शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

आधी दरनिश्चिती; मगच भूमिपूजन: खंबाटकी बोगदा प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:16 IST

वेळे : नवीन खंबाटकी बोगदा तयार करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, त्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. परंतु ...

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, शेतक ºयांच्या भावनांशी खेळू नये

वेळे : नवीन खंबाटकी बोगदा तयार करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, त्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. परंतु प्रशासनाने अजूनही शेतकºयांच्या जमिनीचा दर निश्चित केला नाही. त्यातच या बोगद्याच्या भूमिपूजनाच्या बातम्यांचा सुळसुळाट लोकांमध्ये पसरत आहे.

म्हणून ‘आधी दरनिश्चिती कराल तरच भूमिपूजन करून देऊ,’ अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना सोमवारी वेळे ग्रामस्थांनी दिले. निवेदनात म्हटले आहे की, शेतकºयांना पाठविलेल्या हरकतीबाबतच्या नोटिसा उशिरा प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये अंतिम निवडीबाबत कोणताही सखोल खुलासा करण्यात आलेला नाही. शेतकºयांनी उपजिल्हाधिकारी कार्यालय क्र. ९ यांना दिलेल्या एकाही हरकत अर्जाचा विचार केला गेला नाही. संपादित झालेल्या जमिनीचे मूल्यांकन हे ढोबळमानाने केले आहेत. त्यात झाडेझुडपे, विहिरी, दगडी ताल, इतर बांधकाम, पाईपलाईन आदींचा समावेश करण्यात आलेला नाही.

तसेच संयुक्त मोजणी करण्यात आलेले क्षेत्र सोडून राहिलेले लहान आकाराचे क्षेत्र निरुपयोगीच आहे. अशा क्षेत्राचादेखील समावेश संपादन क्षेत्रात करण्यात यावा. शेतकºयांना विश्वासात घेऊन, खातरजमा करून सध्याच्या बाजारभावाला अनुसरून या जमिनीची नुकसानभरपाई मिळावी. जोपर्यंत प्रशासन दरनिश्चिती करून अंतिम निवाडा जाहीर करणार नाही तोपर्यंत यासंदर्भात कोणत्याही प्रकारची प्रशासकीय कार्यवाही करण्यास शेतकºयांचा तीव्र विरोध असेल.

ही दरनिश्चिती करत असताना सर्व गोष्टी विचारात घेऊन मूल्यांकन करावे. जर प्रशासनाने याची दखल न घेता पुढील कार्यवाही सुरू ठेवली तर संपूर्ण कुटुंबासह रास्ता रोको आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा या निवेदनामार्फत देण्यात आला.वाई तालुका पंचायत समितीचे उपसभापती अनिल जगताप, घनश्याम नवले, दीपक पवार, विश्वास कोचळे, रवींद्र पवार, बाबासो पवार, संजय पवार यांच्यासह अनेक शेतकरी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. या निवेदनावर प्रकल्पबाधित सर्व शेतकºयांच्या सह्या आहेत.‘लोकमत’च्या बातमीची दखल‘लोकमत’ने शेतकºयांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी वारंवार प्रयत्न केला आहे. दि. १५ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातमीची गांभीर्याने दखल घेऊन आमदार मकरंद पाटील यांनी तातडीने यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन शेतकºयांच्या प्रश्नांवर चर्चा केली. जिल्हाधिकारी यांनी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले. मात्र हे आश्वासन हवेतच विरळू नये, यासाठी प्रशासनाने काळजीपूर्वक निर्णय घेतले पाहिजेत. 

शेतकºयांवर सातत्याने अन्याय होत राहिला आहे. त्यांच्यासमोर अनेक अडचणी आहेत. जमिनी संपादित करून अजून अडचणीत वाढ झाली आहे. शेतकºयांना उपाशी राहून विकासकामांत सहकार्य करावे लागत आहे. याची थोडी तरी जाणीव प्रशासनाने ठेवावी. नाहीतर एकदा का शेतकरी पेटून उठला तर कोणत्याही परिस्थितीत तो माघार घेत नाही. त्याच्या भावनांशी खेळू नका.- मोहन पवार, माजी उपसरपंच, वेळे

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षा