शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आधी दरनिश्चिती; मगच भूमिपूजन: खंबाटकी बोगदा प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:16 IST

वेळे : नवीन खंबाटकी बोगदा तयार करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, त्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. परंतु ...

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, शेतक ºयांच्या भावनांशी खेळू नये

वेळे : नवीन खंबाटकी बोगदा तयार करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, त्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. परंतु प्रशासनाने अजूनही शेतकºयांच्या जमिनीचा दर निश्चित केला नाही. त्यातच या बोगद्याच्या भूमिपूजनाच्या बातम्यांचा सुळसुळाट लोकांमध्ये पसरत आहे.

म्हणून ‘आधी दरनिश्चिती कराल तरच भूमिपूजन करून देऊ,’ अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना सोमवारी वेळे ग्रामस्थांनी दिले. निवेदनात म्हटले आहे की, शेतकºयांना पाठविलेल्या हरकतीबाबतच्या नोटिसा उशिरा प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये अंतिम निवडीबाबत कोणताही सखोल खुलासा करण्यात आलेला नाही. शेतकºयांनी उपजिल्हाधिकारी कार्यालय क्र. ९ यांना दिलेल्या एकाही हरकत अर्जाचा विचार केला गेला नाही. संपादित झालेल्या जमिनीचे मूल्यांकन हे ढोबळमानाने केले आहेत. त्यात झाडेझुडपे, विहिरी, दगडी ताल, इतर बांधकाम, पाईपलाईन आदींचा समावेश करण्यात आलेला नाही.

तसेच संयुक्त मोजणी करण्यात आलेले क्षेत्र सोडून राहिलेले लहान आकाराचे क्षेत्र निरुपयोगीच आहे. अशा क्षेत्राचादेखील समावेश संपादन क्षेत्रात करण्यात यावा. शेतकºयांना विश्वासात घेऊन, खातरजमा करून सध्याच्या बाजारभावाला अनुसरून या जमिनीची नुकसानभरपाई मिळावी. जोपर्यंत प्रशासन दरनिश्चिती करून अंतिम निवाडा जाहीर करणार नाही तोपर्यंत यासंदर्भात कोणत्याही प्रकारची प्रशासकीय कार्यवाही करण्यास शेतकºयांचा तीव्र विरोध असेल.

ही दरनिश्चिती करत असताना सर्व गोष्टी विचारात घेऊन मूल्यांकन करावे. जर प्रशासनाने याची दखल न घेता पुढील कार्यवाही सुरू ठेवली तर संपूर्ण कुटुंबासह रास्ता रोको आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा या निवेदनामार्फत देण्यात आला.वाई तालुका पंचायत समितीचे उपसभापती अनिल जगताप, घनश्याम नवले, दीपक पवार, विश्वास कोचळे, रवींद्र पवार, बाबासो पवार, संजय पवार यांच्यासह अनेक शेतकरी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. या निवेदनावर प्रकल्पबाधित सर्व शेतकºयांच्या सह्या आहेत.‘लोकमत’च्या बातमीची दखल‘लोकमत’ने शेतकºयांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी वारंवार प्रयत्न केला आहे. दि. १५ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातमीची गांभीर्याने दखल घेऊन आमदार मकरंद पाटील यांनी तातडीने यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन शेतकºयांच्या प्रश्नांवर चर्चा केली. जिल्हाधिकारी यांनी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले. मात्र हे आश्वासन हवेतच विरळू नये, यासाठी प्रशासनाने काळजीपूर्वक निर्णय घेतले पाहिजेत. 

शेतकºयांवर सातत्याने अन्याय होत राहिला आहे. त्यांच्यासमोर अनेक अडचणी आहेत. जमिनी संपादित करून अजून अडचणीत वाढ झाली आहे. शेतकºयांना उपाशी राहून विकासकामांत सहकार्य करावे लागत आहे. याची थोडी तरी जाणीव प्रशासनाने ठेवावी. नाहीतर एकदा का शेतकरी पेटून उठला तर कोणत्याही परिस्थितीत तो माघार घेत नाही. त्याच्या भावनांशी खेळू नका.- मोहन पवार, माजी उपसरपंच, वेळे

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षा