शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

शिरवळच्या जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे पाणी पेटले, ७ जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 17:25 IST

शिरवळ : शिरवळच्या जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे पाणी पेटले असून, योजनेचे काम सुरू न झाल्याने भाजपाचे राज्य सरचिटणीस अनुप सूर्यवंशी ...

शिरवळ : शिरवळच्या जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे पाणी पेटले असून, योजनेचे काम सुरू न झाल्याने भाजपाचे राज्य सरचिटणीस अनुप सूर्यवंशी यांच्यासह ७ युवकांनी शिरवळ ग्रामपंचायतीसमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु शिरवळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे आंदोलकांना ताब्यात घेण्यात यश आले.  शिरवळ, ता. खंडाळा याठिकाणी शासनाच्या जलजीवन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ४ कोटी ७२ लाख ८३ हजार ६६७ रुपये किमतीची जलशुद्धीकरण पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे. दरम्यान, शिरवळ गावच्या पाणीपुरवठा योजनेबाबत शासनाच्या नियमावलीनुसार नवीन योजनेमध्ये २० दशलक्ष लिटर क्षमतेची जलशुद्धीकरण केंद्रासाठी १० गुंठे व १.८० लाख लिटर क्षमतेच्या उंच टाकीसाठी २ गुंठे जागा अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबाबत शिरवळच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जुन्या पाण्याच्या टाकीजवळ शिरवळ ग्रामपंचायतीकडून जागा सूचित करण्यात आली होती. 

मात्र, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद उपविभाग, खंडाळा यांच्या पाहणीनंतर ही जागा शासकीय नियमावलीनुसार शिरवळसाठी अपुरी असल्याबाबत जागेची मोजमापे घेण्यात आल्यानंतर निदर्शनास आले. त्यानुसार उपअभियंता खंडाळा उपविभाग व कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा सातारा जिल्हा परिषद यांचा अहवाल प्राप्त होताच याबाबत संबंधितांशी लेखी व तोंडी झालेल्या बैठकीमधील निर्णयानुसार व पाहणीनुसार शिरवळ येथील शासकीय गट नंबर ९४४ मधील जागा निश्चित करीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून भूमिपूजन करण्यात आले होते. त्यामुळे जुन्या पाण्याच्या टाकीजवळ जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी जनता फाउंडेशनच्या युवकांनी करीत खंडाळा पंचायत समितीसमोर घंटानाद करीत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू न झाल्यास गुरुवार, दि.१२ ऑक्टोबर रोजी शिरवळ ग्रामपंचायतसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे शिरवळ ग्रामपंचायतीला शिरवळ पोलिसांच्या छावणीचे रूप येत सकाळी ८ वाजेपासून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास भारतीय जनता पार्टीचे राज्य सरचिटणीस अनुप सूर्यवंशी, जनता फाउंडेशनचे अध्यक्ष अजिंक्य कांबळे, इम्रान काझी, हितेश जाधव, गणेश पानसरे, गजानन कुडाळकर, केदार हाडके यांनी शिरवळ ग्रामपंचायतीसमोर येत अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे संबंधित आंदोलकांना ताब्यात घेण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी