शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पांच्या आगमनाबरोबर पावसाचेही आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:44 IST

कुडाळ : जुलै महिन्यात अतिवृष्टी झाल्यानंतर पावसाने ओढ दिली. यामुळे खरिपातील पिके ऐन बहराच्या काळात कोमेजू लागली होती. याला ...

कुडाळ : जुलै महिन्यात अतिवृष्टी झाल्यानंतर पावसाने ओढ दिली. यामुळे खरिपातील पिके ऐन बहराच्या काळात कोमेजू लागली होती. याला पावसाची नितांत गरज होती. यातच गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, बाप्पांच्या आगमनाबरोबर पावसाचेही आगमन झाल्याने शेतकरी आनंदित झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग, हायब्रीड, कडधान्य आदी पिके कोमेजू लागली होती. यातच पिकांचा बहराच्या काळात पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र, दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकरी काहीसा आनंदित झाला आहे.

खरीप हंगामातील भुईमुगाच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून, त्यांना पावसाची आवश्यकता होती. आता बाप्पांच्या आगमनाबरोबर पावसानेही हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने पिकांच्या शेंगा भरणार असून, हातातोंडाशी आलेले पीक आता चांगले येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन पिकांना मात्र ऐन बहरात पाऊस न मिळाल्याने शेंगा पुरेपूर भरल्या नाहीत. यामुळे याच्या उत्पादनावर परिणाम होणार असून, उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

पिके ऐन बहराच्या काळात पाऊस उघडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. याला काहीसा दिलासा मिळाला आहे. यात गेल्या महिन्यात अतिवृष्टीने तालुक्याच्या पश्चिम भागातील भातशेतीचे बऱ्याचशा ठिकणी नुकसान झालेले होते. मात्र, आता पावसाचे आगमन झाल्याने उर्वरित भात शेतीही चांगली आहे.

शेतीला नेहमीच निसर्गाच्या या लहरीपणाला सामोरे जावे लागत आहे. यातच आता पावसाच्या आगमनाने पिके टवटवीत दिसू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीक वाया न जाता काहीतरी हाताशी राहील, अशी शेतकऱ्याला आशा वाटू लागली आहे.

(चौकट)

वाया जाणारे पीक बहरू लागले..

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकरी समाधानी झाला आहे. खरिपाच्या पिकांना या पावसाने संजीवनी मिळाली असून, पावसाअभावी वाया जाणारे पीक पुन्हा बहरू लागले आहे. यामुळे काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने गणेशाच्या आगमनाबरोबर पुन्हा हजेरी लावल्याने सर्वांनाच हायसे वाटू लागले आहे.