शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

बाप्पांच्या आगमनाबरोबर पावसाचेही आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:44 IST

कुडाळ : जुलै महिन्यात अतिवृष्टी झाल्यानंतर पावसाने ओढ दिली. यामुळे खरिपातील पिके ऐन बहराच्या काळात कोमेजू लागली होती. याला ...

कुडाळ : जुलै महिन्यात अतिवृष्टी झाल्यानंतर पावसाने ओढ दिली. यामुळे खरिपातील पिके ऐन बहराच्या काळात कोमेजू लागली होती. याला पावसाची नितांत गरज होती. यातच गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, बाप्पांच्या आगमनाबरोबर पावसाचेही आगमन झाल्याने शेतकरी आनंदित झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग, हायब्रीड, कडधान्य आदी पिके कोमेजू लागली होती. यातच पिकांचा बहराच्या काळात पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र, दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकरी काहीसा आनंदित झाला आहे.

खरीप हंगामातील भुईमुगाच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून, त्यांना पावसाची आवश्यकता होती. आता बाप्पांच्या आगमनाबरोबर पावसानेही हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने पिकांच्या शेंगा भरणार असून, हातातोंडाशी आलेले पीक आता चांगले येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन पिकांना मात्र ऐन बहरात पाऊस न मिळाल्याने शेंगा पुरेपूर भरल्या नाहीत. यामुळे याच्या उत्पादनावर परिणाम होणार असून, उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

पिके ऐन बहराच्या काळात पाऊस उघडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. याला काहीसा दिलासा मिळाला आहे. यात गेल्या महिन्यात अतिवृष्टीने तालुक्याच्या पश्चिम भागातील भातशेतीचे बऱ्याचशा ठिकणी नुकसान झालेले होते. मात्र, आता पावसाचे आगमन झाल्याने उर्वरित भात शेतीही चांगली आहे.

शेतीला नेहमीच निसर्गाच्या या लहरीपणाला सामोरे जावे लागत आहे. यातच आता पावसाच्या आगमनाने पिके टवटवीत दिसू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीक वाया न जाता काहीतरी हाताशी राहील, अशी शेतकऱ्याला आशा वाटू लागली आहे.

(चौकट)

वाया जाणारे पीक बहरू लागले..

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकरी समाधानी झाला आहे. खरिपाच्या पिकांना या पावसाने संजीवनी मिळाली असून, पावसाअभावी वाया जाणारे पीक पुन्हा बहरू लागले आहे. यामुळे काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने गणेशाच्या आगमनाबरोबर पुन्हा हजेरी लावल्याने सर्वांनाच हायसे वाटू लागले आहे.