शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जिल्यातील धरणांमध्ये आणखी १०२ टीएमसी पाणी शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 8:09 PM

सातारा : पाणीदार सातारा जिल्यातील प्रमुख धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, धोम-बलकवडी, तारळी या प्रमुख धरणांमध्ये मिळून २० फेबु्रवारीपर्यंत तब्बल १०२.६० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्याचबरोबरच बहुतांश लघुप्रकल्प व तलावांमध्येही पाणी शिल्लक असल्याने यंदा उन्हाळा सुस' जाणार आहे.सातारा जिल्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. जिल्यातून ...

ठळक मुद्देउन्हाळा सुस' : लहान-मोठ्या तलावांमध्येही मुबलक साठा असल्याने चिंता दूर

सातारा : पाणीदार सातारा जिल्यातील प्रमुख धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, धोम-बलकवडी, तारळी या प्रमुख धरणांमध्ये मिळून २० फेबु्रवारीपर्यंत तब्बल १०२.६० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्याचबरोबरच बहुतांश लघुप्रकल्प व तलावांमध्येही पाणी शिल्लक असल्याने यंदा उन्हाळा सुस' जाणार आहे.

सातारा जिल्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. जिल्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. दुष्काळी मराठवाड्यातील एखाद्या जिल्'ात वर्षभर पडत असेल तेवढा पाऊस महाबळेश्वर, नवजा, तापोळा या परिसरात एका दिवसात पडतो. त्यामुळे या जिल्'ातील धरणेही मोठ्या प्रमाणावर भरलेले असते. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या १०५.२५ टीएमसी क्षमतेचे कोयना धरणात दरवर्षी आॅगस्टपर्यंतच भरून ओसांडून वाहत असते.सातारा, महाबळेश्वर, जावळी, वाई, पाटण, कºहाड या परिसरात मुसळधार पाऊस पडत असला तरी माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यांना दुष्काळाच्या झळाही तेवढ्याच तीव्रतेने जाणवतात. जनावरांना पशुधन मिळत नसल्याने चारा छावण्या सुरू करण्याची वेळ माण, खटावमध्ये येत होती.गेल्यावर्षी जिल्'ात चांगल्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणांमध्ये मुलबक पाणीसाठा झाला आहे. प्रमुख धरणांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त पाणी शिल्लक आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता असणार नाही; पण शेतीच्या पाण्याचा प्रश्न डोके वर काढू शकतो.लघु प्रकल्पांतही साठासातारा शहराला कास, शहापूर, महादरे तलावातून पाणीपुरवठा केला जातो. या तिन्हीमध्ये सध्या पाणी आहे. तरीही सातारा पालिकेने आठवड्यातून एकदा पाणीकपातीचे संकेत दिले आहेत. त्याचप्रमाणे येरळामध्ये ०.२२, नेरमध्ये ०.१३६, आंधळीत ०.०८८ तर राणंदमध्ये ०.१३४ टीएमसी पाणी शिल्लक आहे.दुष्काळीपट्ट्यातही पाणी योजनेचे काममाण, खटाव या तालुक्यामधील दुष्काळ कायमचा हद्दपार करण्यासाठी अनेक गावांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर पाण्याची कामे झाले आहेत. या भागातही पाणीसाठा काही अंशी शिल्लक आहे. एप्रिल, मे महिन्यात त्या तालुक्यांची तहान भागविण्याची मदार या कामावर आहे.आता बाष्पीभवनही वाढणारमार्च महिना उजेडला की उन्हाची तीव्रता वाढणार आहे. साहजिकच बाष्पीभवन झपाट्याने होऊन पाणी कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सध्या मुबलक पाणी असले तरी पाण्याची बचत करणेच योग्य ठरणार आहे.