शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

ही रानवाट वेगळी...दूरध्वनी खात्यातील नोकरी शेतीपूर्वी बनली पार्टटाईम

By admin | Updated: March 7, 2016 00:30 IST

प्रमोदची दुष्काळातील शेतीवर मात..

9स्पटेंबर १९४२ लढ्यात हुतात्मा परशुराम घार्गे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चामध्ये सहभागी झालेले दिवंगत श्रीरंग राऊत यांचे चिरंजीव म्हणून तालुक्यात ओळख असलेले प्रमोद ऊर्फ बंडा श्रीरंग राऊत यांनी प्रगतशील शेतकरी म्हणून नवी ओळख निर्माण केली आहे. दुष्काळ पाचवीला पुजलेल्या वडूज भागातील पाणीटंचाईवर त्यांनी जालीम उपाय शोधून काढला आहे. आंतरपिके घेऊन जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्यावर त्यांनी भर दिला आहे. वडूजच्या दूरसंचार कार्यालयात कार्यरत असलेल्या बंडा राऊत यांना वडिलार्जित जमिनीत नोकरी सांभाळत उर्वरित काळात त्यांना शेतीची आवड आहे. विहिरीला कमी पाणी असल्याने बागायती शेती करताना त्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत होते.वडूज येथील कुंभारकी नावाच्या शिवारात दीड एकर क्षेत्रामध्ये आजअखेर पाण्यावर अवलंबून जमेल तसे धान्यच पिकविले जात होते; परंतु नोकरीनिमित्त बाहेरगावी गेल्यानंतर इतर ठिकाणची कमी पाण्यातील शेती आणि त्या शेतकऱ्यांचे कष्ट पाहून आपणही प्रयत्न करावेत, असा मनाशी चंग बांधला. जमिनीत सहा विंधन विहिरी घेऊन जलवाहिनी केली. ते पाणी विहिरीत सोडले. यामुळे साडेसहा परूस विहीर पाण्याने तुडुंब भरली आहे. दिवसभर नोकरी सांभाळत रात्रीच्या वेळी पिकांना पाणी पाजण्याचे काम ते करीत असतात. कांदा पिकाअंतर्गत देशी मुळ्याची लागण त्यांनी केली आहे. मुळ्याचे वजन सुमारे किलोच्या आसपास असून, लांबीलाही तो मुळा जादा आहे. त्याचबरोबरीने हरभरा, चवळी अशी पिके घेऊन त्यांनी कमी पाण्यात आंतरपिकाला जादा महत्त्व दिले. त्यामुळे उत्पन्न ही जादा मिळत आहे. उत्पन्नापेक्षा शेती कशी केली आहे, हे दाखविण्यासाठी ते प्रत्येक मित्रांना बरोबर घेऊन शेती दाखवित आहेत. मित्र आणि त्यांच्यासोबत आलेल्या प्रत्येकाला ते हरभरा, चवळी आणि मुळा देऊन दुष्काळातील शेतकऱ्यांची दानत ही व्यक्त करीत आहेत. त्यांच्या या दिलखुलास स्वभावामुळे आणि नोकरी सांभाळत केलेले शेतीतील कष्टाचे परिसरातून कौतुक होत आहे. टेलिफोन खात्यातील नोकरी पार्टटाईम करून शेतीला फुलटाईम जॉब अपॉर्च्युनिटी म्हणून तर पाहत नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.शेखर जाधव