शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

टेंभूचे पाणी मिळणार नाही म्हणणाऱ्या आमदारांकडून नौटंकी -: अनिल देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 20:16 IST

‘टेंभूचे पाणी माण व खटाव तालुक्यांतील दुष्काळी गावांना मिळविण्यासाठी डॉ. दिलीप येळगावकर आणि मी तब्बल १६ वर्षे संघर्ष केला. सुदैवाने आमच्या मागणीनुसार राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्याने हे पाणी मिळाले आहे.

ठळक मुद्देनिवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काहींचा श्रेय घेण्याचा प्रयत्न; भाजपा सरकारच्या माध्यमातून उत्तर माण, टेंभूचा प्रश्न मार्गी लागेल

सातारा : ‘टेंभूचे पाणी माण व खटाव तालुक्यांतील दुष्काळी गावांना मिळविण्यासाठी डॉ. दिलीप येळगावकर आणि मी तब्बल १६ वर्षे संघर्ष केला. सुदैवाने आमच्या मागणीनुसार राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्याने हे पाणी मिळाले आहे. हे पाणीच काय पण बुडबुडाही मिळणार नाही, असं म्हणणारे माणचे आमदार आता नौटंकी करत पाण्याची मागणी करत आहे,’ अशी खरपूस टीका भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर केली.

सातारा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देसाई म्हणाले, ‘माजी मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत म्हणून मिरवणाºया माणच्या आमदारांनी गेल्या नऊ वर्षांत एकदाही टेंभूचे पाणी मागण्याचं शहाणपण दाखवलं नाही. आता भाजप सरकारच्या प्रयत्नामुळे टेंभूचं पाणी मिळाल्याचं सिद्ध झाल्यानंतर त्याचं श्रेय घेण्यासाठी आ. गोरे यांचा खटाटोप सुरू आहे.’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून माणच्या पूर्व भागात टेंभू योजनेचे पिण्यासाठी पाणी आणण्यात यश आले आहे. आता उत्तर माणला जिहे-कटापूर योजनेतून आंधळी धरणातून पाणी उचलून देणे आणि टेंभू योजनेतील उर्वरित गावच्या पाणी प्रश्नासाठी मी आणि माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांचा पाठपुरावा सुरू आहे,’ असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

देसाई म्हणाले, ‘टेंभू योजनेतून माण-खटावला पाणी मिळावे, यासाठी २००३ पासून सलग १६ वर्षे माणच्या जनतेला बरोबर घेऊन मोर्चे, आंदोलने करून संघर्ष केला. डॉ. दिलीप येळगावकर यांनीही कित्येक वर्षे टेंभूमधून माण- खटावला पाणी मिळावे, यासाठी संघर्ष केला. उच्च न्यायालयात याबाबत याचिकाही त्यांनी दाखल केली होती. आमच्या या लढ्याला राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून यश मिळायला सुरुवात झाली. टेंभूमधून आज माणच्या १६ गावांना पिण्यासाठी पाणी मिळाले असून, महाबळेश्वरवाडी तलाव भरण्याचे काम सुरू आहे. लवकरच खटाव तालुक्यातील मायणी तलावही भरण्यात येणार आहे. वास्तविक टेंभूचे पाणी माण - खटावला मिळावे, ही मागणी आम्ही १६ वर्षांपासून करत आहोत. या मागणीला यशही येत आहे. मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही लोकांकडून आता ही मागणी नव्याने करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देसाई यांनी केला.

 

टॅग्स :WaterपाणीSatara areaसातारा परिसरTembhu Projectटेंभू धरण