शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

टेंभूचे पाणी मिळणार नाही म्हणणाऱ्या आमदारांकडून नौटंकी -: अनिल देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 20:16 IST

‘टेंभूचे पाणी माण व खटाव तालुक्यांतील दुष्काळी गावांना मिळविण्यासाठी डॉ. दिलीप येळगावकर आणि मी तब्बल १६ वर्षे संघर्ष केला. सुदैवाने आमच्या मागणीनुसार राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्याने हे पाणी मिळाले आहे.

ठळक मुद्देनिवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काहींचा श्रेय घेण्याचा प्रयत्न; भाजपा सरकारच्या माध्यमातून उत्तर माण, टेंभूचा प्रश्न मार्गी लागेल

सातारा : ‘टेंभूचे पाणी माण व खटाव तालुक्यांतील दुष्काळी गावांना मिळविण्यासाठी डॉ. दिलीप येळगावकर आणि मी तब्बल १६ वर्षे संघर्ष केला. सुदैवाने आमच्या मागणीनुसार राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्याने हे पाणी मिळाले आहे. हे पाणीच काय पण बुडबुडाही मिळणार नाही, असं म्हणणारे माणचे आमदार आता नौटंकी करत पाण्याची मागणी करत आहे,’ अशी खरपूस टीका भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर केली.

सातारा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देसाई म्हणाले, ‘माजी मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत म्हणून मिरवणाºया माणच्या आमदारांनी गेल्या नऊ वर्षांत एकदाही टेंभूचे पाणी मागण्याचं शहाणपण दाखवलं नाही. आता भाजप सरकारच्या प्रयत्नामुळे टेंभूचं पाणी मिळाल्याचं सिद्ध झाल्यानंतर त्याचं श्रेय घेण्यासाठी आ. गोरे यांचा खटाटोप सुरू आहे.’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून माणच्या पूर्व भागात टेंभू योजनेचे पिण्यासाठी पाणी आणण्यात यश आले आहे. आता उत्तर माणला जिहे-कटापूर योजनेतून आंधळी धरणातून पाणी उचलून देणे आणि टेंभू योजनेतील उर्वरित गावच्या पाणी प्रश्नासाठी मी आणि माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांचा पाठपुरावा सुरू आहे,’ असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

देसाई म्हणाले, ‘टेंभू योजनेतून माण-खटावला पाणी मिळावे, यासाठी २००३ पासून सलग १६ वर्षे माणच्या जनतेला बरोबर घेऊन मोर्चे, आंदोलने करून संघर्ष केला. डॉ. दिलीप येळगावकर यांनीही कित्येक वर्षे टेंभूमधून माण- खटावला पाणी मिळावे, यासाठी संघर्ष केला. उच्च न्यायालयात याबाबत याचिकाही त्यांनी दाखल केली होती. आमच्या या लढ्याला राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून यश मिळायला सुरुवात झाली. टेंभूमधून आज माणच्या १६ गावांना पिण्यासाठी पाणी मिळाले असून, महाबळेश्वरवाडी तलाव भरण्याचे काम सुरू आहे. लवकरच खटाव तालुक्यातील मायणी तलावही भरण्यात येणार आहे. वास्तविक टेंभूचे पाणी माण - खटावला मिळावे, ही मागणी आम्ही १६ वर्षांपासून करत आहोत. या मागणीला यशही येत आहे. मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही लोकांकडून आता ही मागणी नव्याने करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देसाई यांनी केला.

 

टॅग्स :WaterपाणीSatara areaसातारा परिसरTembhu Projectटेंभू धरण