शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
4
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
5
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
6
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
7
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
8
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
9
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
10
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
11
पुतीन परतले, पुढे...?
12
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
13
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
15
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
16
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
17
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
18
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
19
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
20
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

टेंभूचे पाणी मिळणार नाही म्हणणाऱ्या आमदारांकडून नौटंकी -: अनिल देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 20:16 IST

‘टेंभूचे पाणी माण व खटाव तालुक्यांतील दुष्काळी गावांना मिळविण्यासाठी डॉ. दिलीप येळगावकर आणि मी तब्बल १६ वर्षे संघर्ष केला. सुदैवाने आमच्या मागणीनुसार राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्याने हे पाणी मिळाले आहे.

ठळक मुद्देनिवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काहींचा श्रेय घेण्याचा प्रयत्न; भाजपा सरकारच्या माध्यमातून उत्तर माण, टेंभूचा प्रश्न मार्गी लागेल

सातारा : ‘टेंभूचे पाणी माण व खटाव तालुक्यांतील दुष्काळी गावांना मिळविण्यासाठी डॉ. दिलीप येळगावकर आणि मी तब्बल १६ वर्षे संघर्ष केला. सुदैवाने आमच्या मागणीनुसार राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्याने हे पाणी मिळाले आहे. हे पाणीच काय पण बुडबुडाही मिळणार नाही, असं म्हणणारे माणचे आमदार आता नौटंकी करत पाण्याची मागणी करत आहे,’ अशी खरपूस टीका भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर केली.

सातारा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देसाई म्हणाले, ‘माजी मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत म्हणून मिरवणाºया माणच्या आमदारांनी गेल्या नऊ वर्षांत एकदाही टेंभूचे पाणी मागण्याचं शहाणपण दाखवलं नाही. आता भाजप सरकारच्या प्रयत्नामुळे टेंभूचं पाणी मिळाल्याचं सिद्ध झाल्यानंतर त्याचं श्रेय घेण्यासाठी आ. गोरे यांचा खटाटोप सुरू आहे.’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून माणच्या पूर्व भागात टेंभू योजनेचे पिण्यासाठी पाणी आणण्यात यश आले आहे. आता उत्तर माणला जिहे-कटापूर योजनेतून आंधळी धरणातून पाणी उचलून देणे आणि टेंभू योजनेतील उर्वरित गावच्या पाणी प्रश्नासाठी मी आणि माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांचा पाठपुरावा सुरू आहे,’ असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

देसाई म्हणाले, ‘टेंभू योजनेतून माण-खटावला पाणी मिळावे, यासाठी २००३ पासून सलग १६ वर्षे माणच्या जनतेला बरोबर घेऊन मोर्चे, आंदोलने करून संघर्ष केला. डॉ. दिलीप येळगावकर यांनीही कित्येक वर्षे टेंभूमधून माण- खटावला पाणी मिळावे, यासाठी संघर्ष केला. उच्च न्यायालयात याबाबत याचिकाही त्यांनी दाखल केली होती. आमच्या या लढ्याला राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून यश मिळायला सुरुवात झाली. टेंभूमधून आज माणच्या १६ गावांना पिण्यासाठी पाणी मिळाले असून, महाबळेश्वरवाडी तलाव भरण्याचे काम सुरू आहे. लवकरच खटाव तालुक्यातील मायणी तलावही भरण्यात येणार आहे. वास्तविक टेंभूचे पाणी माण - खटावला मिळावे, ही मागणी आम्ही १६ वर्षांपासून करत आहोत. या मागणीला यशही येत आहे. मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही लोकांकडून आता ही मागणी नव्याने करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देसाई यांनी केला.

 

टॅग्स :WaterपाणीSatara areaसातारा परिसरTembhu Projectटेंभू धरण