शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

टेंभूचे पाणी मिळणार नाही म्हणणाऱ्या आमदारांकडून नौटंकी -: अनिल देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 20:16 IST

‘टेंभूचे पाणी माण व खटाव तालुक्यांतील दुष्काळी गावांना मिळविण्यासाठी डॉ. दिलीप येळगावकर आणि मी तब्बल १६ वर्षे संघर्ष केला. सुदैवाने आमच्या मागणीनुसार राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्याने हे पाणी मिळाले आहे.

ठळक मुद्देनिवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काहींचा श्रेय घेण्याचा प्रयत्न; भाजपा सरकारच्या माध्यमातून उत्तर माण, टेंभूचा प्रश्न मार्गी लागेल

सातारा : ‘टेंभूचे पाणी माण व खटाव तालुक्यांतील दुष्काळी गावांना मिळविण्यासाठी डॉ. दिलीप येळगावकर आणि मी तब्बल १६ वर्षे संघर्ष केला. सुदैवाने आमच्या मागणीनुसार राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्याने हे पाणी मिळाले आहे. हे पाणीच काय पण बुडबुडाही मिळणार नाही, असं म्हणणारे माणचे आमदार आता नौटंकी करत पाण्याची मागणी करत आहे,’ अशी खरपूस टीका भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर केली.

सातारा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देसाई म्हणाले, ‘माजी मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत म्हणून मिरवणाºया माणच्या आमदारांनी गेल्या नऊ वर्षांत एकदाही टेंभूचे पाणी मागण्याचं शहाणपण दाखवलं नाही. आता भाजप सरकारच्या प्रयत्नामुळे टेंभूचं पाणी मिळाल्याचं सिद्ध झाल्यानंतर त्याचं श्रेय घेण्यासाठी आ. गोरे यांचा खटाटोप सुरू आहे.’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून माणच्या पूर्व भागात टेंभू योजनेचे पिण्यासाठी पाणी आणण्यात यश आले आहे. आता उत्तर माणला जिहे-कटापूर योजनेतून आंधळी धरणातून पाणी उचलून देणे आणि टेंभू योजनेतील उर्वरित गावच्या पाणी प्रश्नासाठी मी आणि माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांचा पाठपुरावा सुरू आहे,’ असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

देसाई म्हणाले, ‘टेंभू योजनेतून माण-खटावला पाणी मिळावे, यासाठी २००३ पासून सलग १६ वर्षे माणच्या जनतेला बरोबर घेऊन मोर्चे, आंदोलने करून संघर्ष केला. डॉ. दिलीप येळगावकर यांनीही कित्येक वर्षे टेंभूमधून माण- खटावला पाणी मिळावे, यासाठी संघर्ष केला. उच्च न्यायालयात याबाबत याचिकाही त्यांनी दाखल केली होती. आमच्या या लढ्याला राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून यश मिळायला सुरुवात झाली. टेंभूमधून आज माणच्या १६ गावांना पिण्यासाठी पाणी मिळाले असून, महाबळेश्वरवाडी तलाव भरण्याचे काम सुरू आहे. लवकरच खटाव तालुक्यातील मायणी तलावही भरण्यात येणार आहे. वास्तविक टेंभूचे पाणी माण - खटावला मिळावे, ही मागणी आम्ही १६ वर्षांपासून करत आहोत. या मागणीला यशही येत आहे. मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही लोकांकडून आता ही मागणी नव्याने करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देसाई यांनी केला.

 

टॅग्स :WaterपाणीSatara areaसातारा परिसरTembhu Projectटेंभू धरण