शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

..अन् माणचे पाणी खटावकडे वळविले, पोलिसांनी स्वाभिमानी कार्यकर्त्यांना  घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 17:27 IST

शेखर जाधव वडूज: कायम अन्याय सहन करावा लागत असल्याने खटाव तालुक्यातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत गत महिन्याभरापासून ...

शेखर जाधववडूज: कायम अन्याय सहन करावा लागत असल्याने खटाव तालुक्यातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत गत महिन्याभरापासून सुरू असलेल्या माण तालुक्याकडील तारळीच्या कँनालच्या प्रवाह बदलून खटाव तालुक्याकडे वळविला . संबंधित पंचवीस ते तीस जणांना वडूज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेतकरी संघटनेच्या न्याय भूमिकेमुळे स्वाभिमानीने खटाव तालुक्याचा स्वाभिमान जोपासल्याच्या चर्चा परिसरात सुरू होत्या.खटाव तालुक्यातील पुर्व भागातील गावांची उन्हाळी आवर्तनाची मागणी आहे. मात्र तरी देखील राजकीय पोळी भाजण्यासाठी सुरू असलेला श्रेयवाद आणि संबंधित अधिकाऱ्यांची टाळाटाळ याबाबत तहसिलदार कार्यालयाला येत्या सोमवारी (दि.८) घेराव घालण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने इशारा दिला आहे. यापार्श्वभूमीवर डाळमोडी हद्दीतील तारळी गेटवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पाच तारीख ओलांडून गेली तरी अधिकारी पाणी सोडण्याची तयारी दाखवत नसल्याने संयमाचा बांध फुटल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक आंदोलन करत अखेर पाणी सोडले. खटाव तालुक्यातील डाळमोडी येथील तारळीचे माण व खटावसाठी गेट असून ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी हे गेट खटाव तालुक्याकडे वळविले. सुमारे तीन तास हे पाणी सुरू होते. वडूज पोलिसांनी शेतकरी संघटनेचा सुमारे तीस कार्यकर्ते ताब्यात घेऊन त्यांना वडूज पोलिस ठाण्यात ठेवले आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी