शहरं
Join us  
Trending Stories
1
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
2
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
3
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
4
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
5
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
6
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
7
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
8
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
9
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
10
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
11
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
12
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
13
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
14
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
15
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
16
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
18
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
19
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
20
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

काँग्रेसमधून ‘आनंद’ गायब अन् पृथ्वी‘राज’ धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:59 PM

प्रमोद सुकरे । लोकमत न्यूज नेटवर्क कºहाड : कोणाला स्वप्नातही वाटणार नाही अशा प्रकारची घडामोड कºहाडमध्ये घडली. पक्षांतर्गत कुरबुरीमुळे ...

प्रमोद सुकरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : कोणाला स्वप्नातही वाटणार नाही अशा प्रकारची घडामोड कºहाडमध्ये घडली. पक्षांतर्गत कुरबुरीमुळे पृथ्वीराज चव्हाणांच्या मागे मिनी मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहणारे आनंदराव पाटील अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले. काँग्रेसमधून आनंदराव पाटील भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याने आता कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचे राजकारण अडचणीत येण्याची शक्यता आहे.आनंदराव पाटील हे चव्हाण कुटुंबीयांचे निष्ठावंत पाईक म्हणून ओळखले जातात. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर आनंदरावांचा भाव चांगलाच वाढला होता. मिनी मुख्यमंत्री म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात होते. निष्ठेचे फळ म्हणून त्यांना विधान परिषदेचे आमदार होण्याची संधीही मिळाली. या सर्व बाबींचा आनंदराव पाटील यांना भविष्यातील वाट चोखाळताना विचार करावा लागणार आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांना एका वेगळ््या रांगेत बसविले पण आता छोट्या मोठ्या मानापमान नाट्याने मागच्या दिवसांची आठवण न ठेवता पुढचा भविष्यकाळ अडचणीचा ठरू शकतो. ना घर का ना घाट का अशी अवस्था होऊ नये म्हणजे झाले.सातारा जिल्ह्यातही काँग्रेसची मोठी पडझड झाली. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी धक्का दिला. ते आता भाजपचे खासदार आहेत. तर माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनीही काही दिवसांपूर्वीच हातात कमळ घेतले आहे. आता पक्षातील पृथ्वीराज चव्हाण समर्थक असलेल्या काहींकडून त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने आनंदराव पाटील व त्यांचे समर्थक अस्वस्थ आहेत. त्यामुळे आनंदराव पाटील नवी वाट चोखाळतील, अशी चर्चा सुरू आहे.दरम्यान, सोमवारी आमदार आनंदराव पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी डॉ. अतुल भोसलेही उपस्थित होते. हा योगायोग होता, असे म्हणता येणार नाही. त्यातच त्यांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे. साहजिकच त्यामुळे पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत. मात्र, आनंदराव पाटील कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन दिशा ठरविणार असल्याचे सांगताहेत.भोसलेंची खेळी फायद्याची की तोट्याची?आमदार आनंदराव पाटील यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी भेट घालून देऊन डॉ. अतुल भोसलेंनी मोठी खेळी केल्याचे त्यांचे समर्थक सांगतात; पण क्रिया आली की प्रतिक्रिया ही येतेच. याप्रमाणे भोसलेंची ही खेळी फायद्याची की तोट्याची, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.मनधरणीचे प्रयत्न...आमदार आनंदराव पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मंगळवारी दिवसभर पाटलांच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी दिसत होती. त्यातच काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सतेज पाटील आदींनी भ्रमणध्वनीवरून आनंदराव पाटील यांच्याशी संपर्क करून पक्षांतर्गत वाद मिटवू, असे सांगून मनधरणीचे प्रयत्न सुरू केल्याचे निकटवर्तीय सांगतात.मनोहारी मार्ग सुकर होईल...माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर गटाने एकत्र येण्याची गरज काही कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. मात्र, त्यात आमदार आनंदराव पाटील काहींना अडसर वाटत होते. आनंदराव पाटलांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. तर पृथ्वीराज चव्हाण व विलासराव पाटील-उंडाळकर गटाच्या मनोमिलनाचा ‘मनोहारी’ मार्ग सुकर होईल, अशीही चर्चा सुरू झाली आहे.