शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Satara: सरसकट आले खरेदीचे फर्मान; ‘स्वाभिमानी’च्या लढ्याला यश 

By नितीन काळेल | Updated: August 9, 2024 18:52 IST

जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना होणार फायदा

सातारा : आले उत्पादक शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उभारलेल्या लढ्याला यश आले असून शासनाने आदेशच काढला आहे. या आदेशाने आता सरसकट आले खरेदी होणार आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातीलही शेकडो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात आले पीक घेण्यात येते. सध्या आल्याला चांगला दरही मिळत आहे. पण, आले खरेदी करताना व्यापारी प्रतवारी करत होते. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान व्हायचे. या विरोधात जून महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लढा उभारला. त्यावेळी उपनिबंधक कार्यालयाने बाजार समिती तसेच व्यापाऱ्यांनाही सरसकट आले खरेदीबाबत सूचना केली होती. तर आता महाराष्ट्र राज्याच्या पणन संचालयाने परिपत्रकच काढले आहे.केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमतीवर शेतकऱ्यांकडून शेतमालाची खरेदी करणे बंधनकारक आहे. मात्र, आले या शेतमालासाठी किमान आधारभूत किंमत लागू नाही. राज्यातील आले उत्पादक शेतकरी हा व्यापारी आणि दलाली यांच्या मनमानी कारभारामुळे भरडला जातोय. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी निवेदन दिले होते. यावर पणनमंत्र्यांबरोबर बैठक झाली होती. त्यावेळी त्यांनी जुने आणि नवे आले अशी प्रतवारी न करता खरेदी करावी. प्रतवारीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते, अशी मागणी केली होती. त्यामुळे पणनमंत्र्यांनी आले खरेदीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्यातील सर्वच बाजार समित्यांना सूचना केली होती. त्यानुसार पणन संचालयाने परिपत्रक काढले आहे.बाजार समितीने परंपरागत पध्दतीने सरसकट आले खरेदीबाबत अधिकृत परवानाधारक व्यापारी व अडते यांना सूचना करावी. जुने व नवे आले वेगळे आणण्याचा आग्रह धरु नये. आले खरेदीचा व्यवहार झाल्यावर साैदा पट्टी करावी. त्यावर दर कसा दिला याचा उल्लेख अधिकृत बिलावर करावा. काही तक्रारी आल्यास बाजार समितीने तत्काळ निवारण करावे, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलेले आहे. यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने स्वागत..आले खरेदी करताना प्रतवारी करु नये याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लढा दिला होता. यामध्ये शेतकरीही सहभागी झाले होते. याबाबत पणन संचालयाने परिपत्रक काढून सरसकट आले खरेदीबाबत सूचना केली आहे. त्यामुळे स्वाभिमानीच्या या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. शासनाच्या या आदेशाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने स्वागत आहे. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना