शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

सातारा: बोरखळच्या तरुण सरपंचाची आत्महत्या, आठ महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 12:32 IST

अत्यंत हुशार आणि कर्तबगार सरपंच म्हणून परिसरात परिचयाचे होते

शिवथर : बोरखळ, ता. सातारा येथील गावचे तरुण सरपंच अमोल नथुराम नलवडे (वय ३५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी समोर आली. आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे आठ महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या आत्महत्येने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमोल नलवडे हे बोरखळ गावचे सरपंच होते. राजकारणासोबतच ते पोल्ट्रीफार्मचा व्यवसाय करत होते. बोरखळ गावापासून जवळच जरंडेश्वर रोडवर त्यांचा पोल्ट्रीफार्म आहे. मंगळवार, दि. ११ रोजी वडील नथुराम नलवडे हे पोल्ट्रीफार्मकडे गेले होते. त्यावेळी पोल्ट्री फॉर्ममध्ये मुलगा अमोल नलवडे हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी तातडीने गावकऱ्यांना याची माहिती दिली. सरपंचांनी आत्महत्या केल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर नागरिकांनी सातारा तालुका पोलिसांना माहिती देऊन पोल्ट्रीफार्मकडे धाव घेतली.अमोल नलवडे हे अत्यंत हुशार आणि कर्तबगार सरपंच म्हणून परिसरात परिचयाचे होते. त्यांच्या आत्महत्येबाबत परिसरात उलटसुलट चर्चा असली तरी आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशीही चर्चा गावात सुरू आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsarpanchसरपंच