शहरं
Join us  
Trending Stories
1
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
2
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
3
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
4
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
5
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
6
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
7
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
8
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
9
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
10
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
11
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
12
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
13
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
14
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
15
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
16
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
17
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
18
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
19
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
20
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही; मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 19:05 IST

corona virus Sataranews- कोरोना महामारी वाढते म्हणून लॉकडाऊन करणे, हा एकमेव पर्याय नाही. शासनाने उद्योजकतेची चाके बंद ठेवली तर अनेक अडचणी वाढतील. उद्योजकांपुढे आर्थिक संकट उभे राहील, त्यासोबतच जे लोक या उद्योग, व्यवसायावर अवलंबून आहेत, त्यांची उपासमार होईल. त्यामुळे अन्य पर्याय निवडावा, अशी मागणी जिल्ह्यातील उद्योजक करत आहेत.

ठळक मुद्देपुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही; मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हाच पर्यायअन्य पर्याय निवडावा, अशी जिल्ह्यातील उद्योजकांची मागणी

सातारा : कोरोना महामारी वाढते म्हणून लॉकडाऊन करणे, हा एकमेव पर्याय नाही. शासनाने उद्योजकतेची चाके बंद ठेवली तर अनेक अडचणी वाढतील. उद्योजकांपुढे आर्थिक संकट उभे राहील, त्यासोबतच जे लोक या उद्योग, व्यवसायावर अवलंबून आहेत, त्यांची उपासमार होईल. त्यामुळे अन्य पर्याय निवडावा, अशी मागणी जिल्ह्यातील उद्योजक करत आहेत.संपूर्ण राज्यासोबत सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली असल्याने शासन लॉकडाऊनच्या तयारीत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबोधित करताना आठ दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे. आता पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार, या भीतीमुळे लोकांच्या पोटात गोळा आलेला आहे.

बँकांनी त्यांच्या पाठीमागे कर्ज वसुलीचा तगादा लावलेला आहे. बँकांची पुन्हा एकदा वसुली सुरू केली आहे. उद्योग बंद झाले तर अनेक अडचणी निर्माण होतील. शासनाने निर्णय घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे. यासाठी प्रयत्न करतील, अशी ग्वाहीदेखील दिली जात आहे.

  •  कोरोनाचे एकूण रुग्ण- ५८०३१
  • बरे झालेले रुग्ण -५५२७४
  • कोरोना बळी - १८४८

जिल्ह्यामध्ये कोरोना महामारी गायब झाल्याची लोकांमध्ये भावना तयार झाल्याने कोरोना पुन्हा वाढला. लोकांनी मास्क कोरोना महामारीमुळे जिल्ह्यातील छोटे उद्योजक अडचणीत सापडले आहेत. या उद्योजकांच्या पाठीमागे बँकांचा कर्ज वसुलीसाठी ससेमिरा सुरू झालेला आहे. लॉकडाऊन केल्यास उद्योजकांसमोर अडचणी वाढतील. लोकांनी आपली तसेच दुसऱ्याचीदेखील काळजी घेऊन नियम पाळल्यास कोरोना महामारी थांबू शकेल.- बाळासाहेब महामुलकर, उद्योजक

जिल्ह्यातील उद्योजकांनी सर्व प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत. इथून पुढच्या कालावधीतदेखील आम्ही काळजी घेऊ, परंतु शासनाने कुठल्याही परिस्थितीत उद्योग बंद ठेवू नयेत. उद्योग बंद झाले तर अनेक लोकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते, याची काळजी घेणेही आवश्यक आहे.- श्रीकांत तोडकर, उद्योजक

जिल्हाधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळी संचारबंदी केली असल्याने आता रात्रीच्या शिफ्ट बंद कराव्या लागणार, अशी शक्यता आहे. मात्र, उद्योग सुरू ठेवण्यासाठी कामगारवर्ग कंपन्यांमध्ये येणे आवश्यक आहे. त्यामुळे मासच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे रात्रीच्या वेळी कंपन्यांचे काम सुरू ठेवण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.- उदयसिंह देशमुख, अध्यक्ष मास

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर