शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही; मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 19:05 IST

corona virus Sataranews- कोरोना महामारी वाढते म्हणून लॉकडाऊन करणे, हा एकमेव पर्याय नाही. शासनाने उद्योजकतेची चाके बंद ठेवली तर अनेक अडचणी वाढतील. उद्योजकांपुढे आर्थिक संकट उभे राहील, त्यासोबतच जे लोक या उद्योग, व्यवसायावर अवलंबून आहेत, त्यांची उपासमार होईल. त्यामुळे अन्य पर्याय निवडावा, अशी मागणी जिल्ह्यातील उद्योजक करत आहेत.

ठळक मुद्देपुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही; मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हाच पर्यायअन्य पर्याय निवडावा, अशी जिल्ह्यातील उद्योजकांची मागणी

सातारा : कोरोना महामारी वाढते म्हणून लॉकडाऊन करणे, हा एकमेव पर्याय नाही. शासनाने उद्योजकतेची चाके बंद ठेवली तर अनेक अडचणी वाढतील. उद्योजकांपुढे आर्थिक संकट उभे राहील, त्यासोबतच जे लोक या उद्योग, व्यवसायावर अवलंबून आहेत, त्यांची उपासमार होईल. त्यामुळे अन्य पर्याय निवडावा, अशी मागणी जिल्ह्यातील उद्योजक करत आहेत.संपूर्ण राज्यासोबत सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली असल्याने शासन लॉकडाऊनच्या तयारीत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबोधित करताना आठ दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे. आता पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार, या भीतीमुळे लोकांच्या पोटात गोळा आलेला आहे.

बँकांनी त्यांच्या पाठीमागे कर्ज वसुलीचा तगादा लावलेला आहे. बँकांची पुन्हा एकदा वसुली सुरू केली आहे. उद्योग बंद झाले तर अनेक अडचणी निर्माण होतील. शासनाने निर्णय घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे. यासाठी प्रयत्न करतील, अशी ग्वाहीदेखील दिली जात आहे.

  •  कोरोनाचे एकूण रुग्ण- ५८०३१
  • बरे झालेले रुग्ण -५५२७४
  • कोरोना बळी - १८४८

जिल्ह्यामध्ये कोरोना महामारी गायब झाल्याची लोकांमध्ये भावना तयार झाल्याने कोरोना पुन्हा वाढला. लोकांनी मास्क कोरोना महामारीमुळे जिल्ह्यातील छोटे उद्योजक अडचणीत सापडले आहेत. या उद्योजकांच्या पाठीमागे बँकांचा कर्ज वसुलीसाठी ससेमिरा सुरू झालेला आहे. लॉकडाऊन केल्यास उद्योजकांसमोर अडचणी वाढतील. लोकांनी आपली तसेच दुसऱ्याचीदेखील काळजी घेऊन नियम पाळल्यास कोरोना महामारी थांबू शकेल.- बाळासाहेब महामुलकर, उद्योजक

जिल्ह्यातील उद्योजकांनी सर्व प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत. इथून पुढच्या कालावधीतदेखील आम्ही काळजी घेऊ, परंतु शासनाने कुठल्याही परिस्थितीत उद्योग बंद ठेवू नयेत. उद्योग बंद झाले तर अनेक लोकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते, याची काळजी घेणेही आवश्यक आहे.- श्रीकांत तोडकर, उद्योजक

जिल्हाधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळी संचारबंदी केली असल्याने आता रात्रीच्या शिफ्ट बंद कराव्या लागणार, अशी शक्यता आहे. मात्र, उद्योग सुरू ठेवण्यासाठी कामगारवर्ग कंपन्यांमध्ये येणे आवश्यक आहे. त्यामुळे मासच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे रात्रीच्या वेळी कंपन्यांचे काम सुरू ठेवण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.- उदयसिंह देशमुख, अध्यक्ष मास

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर