शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
4
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
5
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
6
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
7
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
8
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
9
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
10
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
11
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
12
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
13
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
14
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
15
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
16
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
17
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
18
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
19
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
20
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
Daily Top 2Weekly Top 5

सातारा पालिकेत ‘राजे’ विरुद्ध ‘शिलेदार’!, निवडणुकीत ‘भाजप’ला बंडखोरीचा धोका

By सचिन काकडे | Updated: November 12, 2025 17:16 IST

Local Body Election: अनेक उमेदवारांच्या पुढे दुहेरी संकट

सचिन काकडेसातारा : साताऱ्याच्या राजकारणात ‘मनोमिलन’ यशस्वी झाले असले तरी, आगामी पालिका निवडणुकीत भाजपसमोर ‘बंडखोरी’ चे मोठे संकट उभे ठाकले आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या एकत्र येण्यानंतर पालिकेच्या ५० जागांसाठी तब्बल ५०० हून अधिक उमेदवारांनी इच्छा व्यक्त केल्याने, भाजपपुढे उमेदवार निवडीचा मोठा पेच आहे. या बंडखोरीमुळे पालिकेत ‘राजे’ विरुद्ध ‘शिलेदार’ असा सामना रंगणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.पालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, सोमवारी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी रीतसर मुलाखती घेण्यात आल्या. यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, रात्री उशिरा उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन ‘गुफ्तगू’ केले.यानंतर आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही दोन्ही राजे उपस्थित होते. या बैठकीत ‘कोणत्या शिलेदाराला लॉटरी’ आणि ‘कोणाला बाजूला ठेवायचे’ यावर विचारमंथन झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उमेदवारांची संख्यापाहता भाजपला गमिनी काव्याने उमेदवारांची निवड करावी लागणार असल्याने कोणाला लॉटरी लागणार आणि कोणाला नाही? यावर बरीच राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत.अनेक उमेदवारांच्या पुढे दुहेरी संकटदोन राजेंच्या जुन्या-नव्या निष्ठावंतांनी गेल्या चार वर्षांत प्रभागात ‘स्वतंत्र व्होट बँक’ तयार केली आहे. क्षमता असूनही जर उमेदवारी नाकारली गेली तर हे नाराज शिलेदार शांत बसणार नाहीत. ते थेट महाविकास आघाडीच्या छावणीत प्रवेश करून राजेंच्या विरोधात ‘राजकीय ताकद’ दाखवू शकता. महाविकास आघाडीने देखील गेल्या काही दिवसांपासून उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून, नाराज बंडखोर उमेदवार महाविकास आघाडीची ताकद ठरू शकतात.जागा वाटपाचा फॉर्म्युला...सातारा पालिकेची निवडणूक सातारा विकास आणि नगर विकास आघाड्यांमार्फत होणार नाही, हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे दोन आघाड्या, मूळ भाजप आणि शिंदे सेना यांच्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा जुळवायचा, हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. येत्या दोन-तीन दिवसांत राजकीय समीकरणे बदलणार असून, बंडखोरीचे हे वादळ साताऱ्यात कोणाला धक्का देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.