शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात प्रशासन अलर्ट! ३६९ कुटुंबांचे स्थलांतर; पश्चिमेकडील गावांत सतर्कता, NDRFची टीम येणार

By नितीन काळेल | Updated: July 20, 2023 19:43 IST

अतिवृष्टीच्या पाश्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून संभाव्य दरडप्रवण भागातील ३६९ कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर करण्यात आले आहे.

सातारा: अतिवृष्टीच्या पाश्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून संभाव्य दरडप्रवण भागातील ३६९ कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर करण्यात आले आहे. साताऱ्यासह वाई, पाटण, जावळी आणि महाबळेश्वर या पश्चिमेकडील तालुक्यातील हे नागरिक आहेत. त्यांना शाळा, निवारा शेड, मंदिरात हलिवण्यात आले असून अन्न, शुध्द पाण्यासह महत्वाच्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. तसेच दोन दिवसांत जिल्ह्यात एनडीआरएफची टीमही दाखल होणार आहे.

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यातच पुढील पाच दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमिवर राज्य शासन तसेच जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही गुरुवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून सूचना केली. यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी रस्ते खचत असून पूल वाहून जात आहेत. दरडी कोसळू लागल्याने प्रशासकीय यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन संवेदनशील ठिकाणच्या नागरिकांचे स्थलांतर करावे अशी सूचना केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनीही पाटण तालुक्यातील अनेक गावांना भेट देऊन आढावा घेतलेला आहे. तसेच तेथील अधिकाऱ्यांना अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्याची सूचना केली आहे.

या पार्श्वभूमिवर सध्या जिल्हा प्रशासनाने धोकादायक गावातील कुटुंबांना तात्पुरते स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पश्चिम भागातील पाच तालुक्यातील दरडप्रवण गावातील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. गुरुवारी स्थलांतरित कुटुंबीयांचा आकडा ३६९ झाला होता. यामध्ये पुढे आणखी वाढ होणार आहे.

स्थलांतरित कुटुंबीयांची माहिती...

  • सातारा तालुका : मोरेवाडीतील १८, सांडवालीतील २० आणि भैरवगडमधील ६० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
  • जावळी तालुका : बोंडारवाडी ६, भुतेघर येथील ३ कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे. तसेच नरफदेव, रांजणी आणि धनगरपेढामधील नागरिकांना स्थलांरित होण्याबाबत सूचना करण्यात आलेली आहे.
  • वाई तालुका : जोर गाव ८, गोळेगाव-गोळेवस्ती येथील ४ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आलेले आहे.
  • पाटण तालुका : मिरगाव, हुंबरळी आणि ढोकावळे येथील १५० कुटुंबाचे तर म्हारवंडमधील ३५ कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे.
  • महाबळेश्वर तालुका : माचूतर, एरंडल, शिंदोळा, दुधोशी, दरे, चतूरबेट, मालूसर, येर्णे येथील ६५ कुटुंबे स्थलांतरित

जिल्ह्यात धोकादायक दरडप्रवण ४१ गावे...

  • महाबळेश्वर तालुका : येरणे बुद्रुक, घावरी, मालुसरे, दरे, चिखली, चतूरबेट, नावली, येर्णे खुर्द, शिंदोळा, एरंडल, धावली, दुधोशी, भेकवलीवाडी, आचली, कुमठे (कामटवाडी)
  • पाटण तालुका : आंबेघर तर्फ मरळी खालचे, आंबेघर तर्फ मरळी वरचे, ढोकावळे, हुंबरळी, मिरगाव, डावरी चोपडेवाडी, वरंडेवाडी, काहीर, दिक्षी, खुडुपलेवाडी, मेंढोशी बोर्गेवाडी, शिद्रुकवाडी (धावडे), जितकरवाडी (जिंती), धनवडेवाडी/शिंदेवाडी (निगडे), जोशेवाडी (कालगाव), बागलेवाडी, जुगाईवाडी, कुसावडे (पळसरी).
  • वाई तालुका : कोंढावळे, जोर.
  • जावळी तालुका : बोंडापरवाडी, भुतेघर, वहिटे.
  • सातारा तालुका : सांडवली, बोंडारवाडी, भैरवगड (टोळेवाडी)

जिल्ह्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. तसेच पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमिवर दरडप्रवण भागातील लोकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आलेले आहे. त्यांना अन्न, पाणी तसेच आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यात येत आहेत. सध्या पाऊस होत असल्याने दरडप्रवण भागात नागरिकांनी जाणे टाळावे. तसेच प्रशासनासही सहकार्य करावे. लवकरच एनडीआरएफची टीमही दाखल होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारीst जितेंद्र डुडी यांनी दिली. 

टॅग्स :satara-acसाताराRainपाऊस