नशीब बलवत्तर म्हणून दुर्घटना टळली
By Admin | Updated: September 15, 2014 23:25 IST2014-09-15T21:29:40+5:302014-09-15T23:25:48+5:30
नगरपालिका, म्हाडाचे अक्षम्य दुर्लक्ष

नशीब बलवत्तर म्हणून दुर्घटना टळली
सातारा : शनिवार पेठ येथील नालबंद वाड्याच्या मागील बाजूस झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत म्हाडा व नगरपालिकांकडून इमारत बांधण्यात येत आहे. या ठिकाणी बांधकामासाठी करण्यात आलेल्या एका खड्ड्यात सहा वर्षीय जिशान वाहिद शेख हा लहान मुलगा पाय घसरून पडला. मात्र घटनेची माहिती कळताच नागरिकांनी तत्काळ त्याला खड्ड्यातून बाहेर काढले. या दुर्घटनेत जिशान किरकोळ जखमी झाला.नालबंद इमारतीच्या मागे इमारतीच्या शौचालयासाठी मोठा खड्डा खोदण्यात आलेला आहे. पावसामुळे या खड्ड्यात पाणी साठले आहे. परिसरातील लहान मुले या खड्ड्याजवळ खेळत असतात. या खड्ड्याला कसलेही कुंपन नसल्यामुळे लहान मुलांना धोका निर्माण झाला असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. (प्रतिनिधी)
या परिसरात असलेल्या खड्ड्यामुळे लहान मुलांनाच अधिक धोका निर्माण झाला आहे. कोणतीही मोठी घटना होण्यापूर्वी नगरपालिका व म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित या खड्ड्याला कुंपण घालावे, अथवा संबंधित खड्डा मुजवून टाकणे गरजेचे आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळेच खड्ड्यात पडलेल्या लहान मुलाचे प्राण वाचू शकले.
- अंजुम शेख,
नागरिक