शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Accident: चारचाकी गाडीला भीषण अपघात, रुग्णालयात नेताना तिघांचाही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 10:17 IST

Accident: याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, रविवारी आर्वी येथील तिघेजण न्यायालयीन कामकाजाच्या निमित्ताने वकिलांना भेटायला सातारा येथे गेले होते

सातारा/रहिमतपूर : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामधील सुर्ली येथे रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चारचाकी वाहन चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत आर्वी येथील तिघेजण ठार झाले आहेत. या अपघातामुळे गावावर शोककळा पसरली. तुकाराम आबाजी माने वय ६५, तानाजी आनंद माने वय ६२, सुभाष गणपत माने वय ६० सर्व रा.आर्वी, ता. कोरेगाव अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, रविवारी आर्वी येथील तिघेजण न्यायालयीन कामकाजाच्या निमित्ताने वकिलांना भेटायला सातारा येथे गेले होते. रात्री गावी परतत असताना दहा वाजण्याच्या सुमारास इर्टिका गाडी चालक सुभाष माने यांचा सुर्ली गावच्या हद्दीतील वाठार बाजूकडे रस्त्यावर असलेल्या वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली. अपघात एवढा भीषण होता की यामध्ये गाडीचे पुढचे तोंड पूर्णपणे उचकटलेले आहे. अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले होते. या अपघाताची माहिती मिळताच वाठार येथील काही युवकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे घेऊन निघाले होते. मात्र, रस्त्यातच तिघाही जखमींचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेमुळे आर्वी गावावर शोककळा पसरली आहे. या अपघाताची नोंद रहिमतपूर पोलिस ठाण्यात झाली आहे. 

टॅग्स :Accidentअपघातsatara-acसाताराhospitalहॉस्पिटल