शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

Accident: चारचाकी गाडीला भीषण अपघात, रुग्णालयात नेताना तिघांचाही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 10:17 IST

Accident: याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, रविवारी आर्वी येथील तिघेजण न्यायालयीन कामकाजाच्या निमित्ताने वकिलांना भेटायला सातारा येथे गेले होते

सातारा/रहिमतपूर : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामधील सुर्ली येथे रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चारचाकी वाहन चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत आर्वी येथील तिघेजण ठार झाले आहेत. या अपघातामुळे गावावर शोककळा पसरली. तुकाराम आबाजी माने वय ६५, तानाजी आनंद माने वय ६२, सुभाष गणपत माने वय ६० सर्व रा.आर्वी, ता. कोरेगाव अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, रविवारी आर्वी येथील तिघेजण न्यायालयीन कामकाजाच्या निमित्ताने वकिलांना भेटायला सातारा येथे गेले होते. रात्री गावी परतत असताना दहा वाजण्याच्या सुमारास इर्टिका गाडी चालक सुभाष माने यांचा सुर्ली गावच्या हद्दीतील वाठार बाजूकडे रस्त्यावर असलेल्या वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली. अपघात एवढा भीषण होता की यामध्ये गाडीचे पुढचे तोंड पूर्णपणे उचकटलेले आहे. अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले होते. या अपघाताची माहिती मिळताच वाठार येथील काही युवकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे घेऊन निघाले होते. मात्र, रस्त्यातच तिघाही जखमींचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेमुळे आर्वी गावावर शोककळा पसरली आहे. या अपघाताची नोंद रहिमतपूर पोलिस ठाण्यात झाली आहे. 

टॅग्स :Accidentअपघातsatara-acसाताराhospitalहॉस्पिटल