शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कोट्यवधीचे पूल झाले; पण ‘उजेड’ पडेना!, कृष्णा पुलावरील वाहतूक धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 14:31 IST

पुलाच्या फुटपाथवरून या अंधारात वाट काढणेही जिकीरीचे

कऱ्हाड : कऱ्हाड-विटा मार्गावर येथील कृष्णा नदीवर कोट्यवधीचा पूल उभारला गेला; पण या पुलावर एकही पथदिवा लावला गेला नाही. त्यामुळे रात्रीच्या अंधारात या पुलावर काळोख पसरलेला असतो. पुलाच्या फुटपाथवरून या अंधारात वाट काढणेही जिकीरीचे बनते. संबंधित विभागाने पुलावरील अंधार दूर करण्यासाठी पथदिवे लावण्याची गरज आहे.कऱ्हाडकडून सैदापूर ओगलेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन पूल आहेत. या पुलांवरून एकेरी वाहतूक सुरू झाल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटला आहे. कृष्णा नदीवर यापूर्वी कमी उंचीचा पूल होता. मात्र पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली की, बहुतांश वेळा तो पूल दोन-तीन दिवस पाण्याखाली असायचा. २०१९ साली नवीन पुलाचे बांधकाम सुरू झाले. त्यावेळी जुना कृष्णा पूल अस्तित्वात होता. मात्र, त्यावर्षी आलेल्या महापुरात जीर्ण झालेला तो पूल कोसळला. त्यामुळे तेथील वाहतूक शेजारीच उभारलेल्या नव्या पुलावरून सुरू झाली. दुहेरी वाहतुकीचा ताण त्या पुलावर होता. पुलावरील वाहतूक कोंडी लक्षात घेत नवीन पुलाचे काम गतीने पूर्ण करून नवीन कृष्णा पूल ३० मे रोजी वाहतुकीस खुला करण्यात आला.सध्या दोन्ही नवीन पुलावरून एकेरी वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडीतून वाहनधारकांची सुटका झाली आहे. पादचाऱ्यांपासून ते अवजड वाहनांपर्यंत सर्वजण या दोन्ही नवीन कृष्णा पुलावरून ये-जा करू लागलेत. मात्र,अजूनही या पुलांवर पथदिवे लावले गेलेले नाहीत. त्यामुळे पुलावरून रात्री प्रवास करताना वाहनधारकांना कसरत करावी लागते. दिवसा वाहनधारकांना येथे सतर्कता बाळगावी लागत नसली तरी,रात्रीच्यावेळी मात्र या पूल परिसरात अपघाताची शक्यता निर्माण होते.

पादचाऱ्यांचा जीव मुठीतनवीन कृष्णा पुलांच्या दोन्ही बाजूला पादचारी मार्ग काढण्यात आले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी, युवती तसेच परिसरातील नागरिक या पादचारी पुलांचा वापर करतात. मात्र,रात्रीच्यावेळी या पादचारी मार्गावरून पायी चालत जाणे धोक्याचे बनत आहे. एका बाजुला नदी तर दुसऱ्या बाजूला रस्ता अशा परिस्थितीत अंधारातून पादचाऱ्यांना मार्गक्रमण करावे लागत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षा