शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

Satara: उभ्या कारवर उसाने भरलेला मालट्रक पलटी, नाल्याच्या कठड्यामुळे दांपत्याचे वाचले प्राण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 12:45 IST

वेळ आली होती, पण काळ आला नव्हता

मलकापूर : देवदर्शनासाठी निघालेल्या महामार्गाच्या कडेला उभ्या कारवर उसाने भरलेला मालट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नवीन निर्माण झालेल्या नाल्याच्या कठड्यामुळे दोन सैनिक दांपत्याचे प्राण वाचले आहेत. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नांदलापूर हद्दीत अकॅडमिक हाइट पब्लिक स्कूल समोर झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दोन सैनिक दाम्पत्य आणि कार चालक असे पाच जण (एमएच १२ वायएफ ८७२०)मधून मिलिटरी अपसिंगे (ता. सातारा) येथून देवदर्शनासाठी कोल्हापूरला निघाले होते. पुणे-बंगळुरू महामार्गावर पहाटे चारच्या सुमारास नांदलापूर येथील अकॅडमिक हाइट पब्लिक स्कूल समोर आले असता चालकाने कार महामार्गाच्या कडेला थांबवली. काही वेळातच पाठीमागून ऊस भरलेला मालट्रक (एमएच ४५ ०८३३) हा भरधाव वेगात येऊन कारवर पलटी झाला.या अपघातात सैनिक दाम्पत्यांसह चालक किरकोळ जखमी झाला आहे. मात्र, कारसह मालट्रक व उसाच्या मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उसाच्या मालासह मालट्रक कारवर पलटी झाला मात्र महामार्गालगत नवीन नाला बांधला आहे. यामुळे मालट्रक व ऊस नाल्यावर पडल्यामुळे व मालट्रकचा पुढील भाग कारच्या बॉनेटवर टेकला. यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघाताची माहिती मिळताच माहामार्ग देखभाल विभागातील क्रेनचे कर्मचारी सुनील कदम, राहुल कदम यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.नागरिकांसह वाहनधारकांच्या मदतीने व कदम क्रेनच्या साहाय्याने उसाचा माल बाजूला केला. उसाचा माल बाजूला करत कारमधील पाच जणांना सुखरूप बाहेर काढले. अपघाताची माहिती शहर व महामार्ग पोलिसांना दिली. माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह कऱ्हाड शहरचे पोलिस कर्मचारी अपघातस्थळी दाखल झाले. अपघातस्थळाचा पंचनामा करून व उसाचा माल दुसऱ्या वाहनात भरून सकाळी दहा वाजेच्या सुमारास अपघातग्रस्त वाहने बाजूला केली.

वेळ आली होती, पण काळ आला नव्हतानांदलापूर हद्दीत पहाटे उसाचा ट्रक कारवर पलटी झाला. मात्र, मालट्रक कारच्या बॉनेटवर टेकला, तर नवीन बनवलेल्या नाल्यावर उसाचा माल टेकल्यामुळे कारमधील पाचही जणांना किरकोळ दुखापत झाली. हाच ट्रक व ऊस कारच्या मधोमध पडाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. या घटनेत काळ आला होता, पण सुदैवाने वेळच आली नव्हती म्हणून सर्व जण सुखरूप बाहेर आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात