शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
4
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
5
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
6
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
7
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
8
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
9
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
10
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
11
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
12
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
13
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
14
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
15
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
16
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
17
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
18
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
19
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
20
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी

माळरानं हिरवाईने नटणार; बांधावर, जमिनीवर बांबू उगवणार!; पावसाळ्यात सातारा जिल्ह्यात बांबू लागवडीला सुरुवात

By नितीन काळेल | Updated: May 17, 2024 19:29 IST

बांबूचा फायदा काय ?.. जाणून घ्या

सातारा : सातारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर बांबू लागवड योजना राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांना हेक्टरी ६ लाख ९० हजारांचे अनुदान मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल वाढत असून, कृषी आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत पावसाळ्यात शेतीच्या बांधावर आणि जमिनीवरही ९५२ हेक्टरमध्ये ५ लाख ८५ हजार रोपे लावण्यात येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल. त्याचबरोबर बांबूच्या हिरवाईने माळरानही नटणार आहे.राज्य शासनाने गेल्या वर्षीपासून बांबू लागवडीसाठी नवीन योजना आणली आहे. या अंतर्गत सातारा आणि लातूर या दोन जिल्ह्यांची निवड प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना एक हेक्टरसाठी ६ लाख ९० हजार रुपये अनुदान दिले जात आहे. हे तीन वर्षांसाठी मिळणार आहे. या बांबू लागवडीचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. यामध्ये हे झाड लावल्यानंतर ४० वर्षांपर्यंत उत्पन्न देते. यासाठी पाणीही देण्याची गरज नसते, तसेच बांबूपासून अनेक वस्तू बनतात. बांबूला चांगली बाजारपेठही उपलब्ध आहे. त्यामुळे बांबू लागवडीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ही बांबू लागवड सुरू आहे. यासाठी शेतकऱ्यांना पैसे देण्याची गरज नाही. आता कृषी आणि सामाजिक वनीकरण विभागानेही बांबू रोपे लागवडीची तयारी केलेली आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर ५ लाख ८५ हजार बांबू रोपे लावण्यात येणार आहेत. शेतीचे बांध आणि जमीन, तसेच माळरानावर ही रोपे लावली जातील. यासाठी १ हजार ३२५ शेतकरी लाभार्थी झालेत.

बांबूचा फायदा काय ?बांबूपासून विविध वस्तू बनविता येतात, तसेच फर्निचरही तयार केले जाते, तर केंद्र शासनाने कंपन्यांत ७ टक्के बायोमास वापरण्याची सूचना केलेली आहे. त्यामुळे बांबू हा त्यासाठी उत्तम पर्याय आहे. यातून शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत, तसेच एकदा बांबूची लागवड केल्यानंतर ४० वर्षे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळणार आहे.

अनुदान तीन वर्षे..

  • लागवडपूर्व कामांसाठी - १,७९,२७२ रुपये
  • प्रथम वर्ष संगोपन - २,१४,६५३
  • द्वितीय वर्ष संगोपन - १,४४,२७४
  • तृतीय वर्ष संगोपन - १,५१,८९०

रोपे देण्यासाठी संस्था..राज्य शासनाने ही योजना सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रोपे देण्यासाठी तीन संस्था तयार करण्यात आलेल्या आहेत. या संस्थेकडून शेतकऱ्यांना बांबूची रोपे मिळत आहेत. यासाठी शासनच कंपन्यांना रोपाचे पैसे देणार आहे. नंतर शेतकऱ्याच्या लाभातून पैसे कमी केले जाणार आहेत.बांबू लागवड नियोजनतालुका - गावे - लाभार्थीसातारा - ८२ - १८१जावळी - ६३ - १०१वाई - ६८ - १८७माण - ६० - १८७खटाव - ६८ - २०८खंडाळा - ३० - ७०फलटण - ७३ - १८२पाटण - ४८ - ९४कोरेगाव - ३६ - ६९कऱ्हाड - ०८ - ३७महाबळेश्वर - ०१ - ०९

सामाजिक वनीकरण आणि कृषी विभागाने पावसाळ्यात बांबू लागवड नियाेजन केलेले आहे. शेतीचे बांध, तसेच माळरानावरही बांबू लागवड करण्यात येईल. यातून शेतकऱ्यांना अर्थप्राप्ती होणार आहे. या पावसाळ्यात जिल्ह्यात ९५२ हेक्टरवर ५ लाख ८५ हजार बांबू रोपे लावण्यात येणार आहेत. - हरिश्चंद्र वाघमोडे, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी