शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

धरणं गाठतायत तळ; सातारा जिल्ह्यात दुष्काळी झळ

By नितीन काळेल | Updated: February 7, 2024 18:47 IST

उन्हाळा सुरू होत असल्याने पाणी टंचाईची तीव्रता वाढणार

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी अपुरे पर्जन्यमान झाल्याने धरणे भरली नाहीत. प्रमुख सहा प्रकल्पात तर ९५ टीएमसीच पाणीसाठा आहे. तर कण्हेर आणि उरमोडी धरणात ४४ टक्केच पाणी शिल्लक राहिलेले आहे. यामुळे दुष्काळी झळा तीव्र झाल्या असून आगामी काळात संकट आणखी गहिरे होणार आहे.जिल्ह्यात मान्सूनच्या पावसावरच शेती तसेच पिण्याच्या पाण्याचे गणित अवलंबून असते. दरवर्षी जूनपासून सप्टेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९०० मिलीमीटरच्या आसपास पाऊस पडतो. पण, गेल्यावर्षी पावसाने दगा दिला. वार्षिक सरासरीच्या ७० टक्केच पाऊस झाला. काेणत्याही तालुक्यातील पावसाने वार्षिक सरासही गाठली नाही. त्यामुळे पश्चिम भागातील प्रमुख धरणेही भरली नाहीत. तर पूर्व दुष्काळी भागातील पाणी प्रकल्पातही समाधानकारक साठा झाला नाही. त्यामुळे गेल्यावर्षी आॅक्टोबर महिन्यापासूनच दुष्काळी झळा वाढल्या आहेत. त्यातच आता उन्हाळा सुरू होत असल्याने टंचाईची तीव्रता वाढणार आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी आणि तारळी ही प्रमुख धरणे आहेत. या धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८ टीएमसी आहे. सध्या या धरणांत अवघा ९५.५१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. त्यातील कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. सध्या कोयनेत ७१.२६ टीएमसीच पाणीसाठा राहिला आहे. आगामी पाच महिने हे पाणी पुरवावे लागणार आहे. तर धोम आणि तारळीत चांगला साठा असलातरी आगामी काळात पाणी मागणी वाढणार असल्याने विसर्ग करावा लागणार आहे. सध्या धोम धरणातून ७५० तर कण्हेरमधून १७५ आणि कोयना धरणातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सिंचनासाठी सुरू आहे.

गतवर्षीपेक्षा २५ टीएमसी पाणी कमी..जिल्ह्यातील प्रमुख धरणात सध्यस्थितीत ९५.५१ टीएमसीच पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी तो आतापर्यंत १२० टीएमसी इतका होता. कोयनेत ८६ टीएमसी, धोम ११.३४, कण्हेर ७.५१, उरमोडी ९.१८ आणि तारळीत पाच टीएमसीवर पाणी होते. त्यामुळे गेल्यावर्षी पावसाळ्यापर्यंत टंचाईच्या झळा फारशा जाणवल्या नव्हत्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीdroughtदुष्काळ