शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

धरणं गाठतायत तळ; सातारा जिल्ह्यात दुष्काळी झळ

By नितीन काळेल | Updated: February 7, 2024 18:47 IST

उन्हाळा सुरू होत असल्याने पाणी टंचाईची तीव्रता वाढणार

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी अपुरे पर्जन्यमान झाल्याने धरणे भरली नाहीत. प्रमुख सहा प्रकल्पात तर ९५ टीएमसीच पाणीसाठा आहे. तर कण्हेर आणि उरमोडी धरणात ४४ टक्केच पाणी शिल्लक राहिलेले आहे. यामुळे दुष्काळी झळा तीव्र झाल्या असून आगामी काळात संकट आणखी गहिरे होणार आहे.जिल्ह्यात मान्सूनच्या पावसावरच शेती तसेच पिण्याच्या पाण्याचे गणित अवलंबून असते. दरवर्षी जूनपासून सप्टेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९०० मिलीमीटरच्या आसपास पाऊस पडतो. पण, गेल्यावर्षी पावसाने दगा दिला. वार्षिक सरासरीच्या ७० टक्केच पाऊस झाला. काेणत्याही तालुक्यातील पावसाने वार्षिक सरासही गाठली नाही. त्यामुळे पश्चिम भागातील प्रमुख धरणेही भरली नाहीत. तर पूर्व दुष्काळी भागातील पाणी प्रकल्पातही समाधानकारक साठा झाला नाही. त्यामुळे गेल्यावर्षी आॅक्टोबर महिन्यापासूनच दुष्काळी झळा वाढल्या आहेत. त्यातच आता उन्हाळा सुरू होत असल्याने टंचाईची तीव्रता वाढणार आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी आणि तारळी ही प्रमुख धरणे आहेत. या धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८ टीएमसी आहे. सध्या या धरणांत अवघा ९५.५१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. त्यातील कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. सध्या कोयनेत ७१.२६ टीएमसीच पाणीसाठा राहिला आहे. आगामी पाच महिने हे पाणी पुरवावे लागणार आहे. तर धोम आणि तारळीत चांगला साठा असलातरी आगामी काळात पाणी मागणी वाढणार असल्याने विसर्ग करावा लागणार आहे. सध्या धोम धरणातून ७५० तर कण्हेरमधून १७५ आणि कोयना धरणातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सिंचनासाठी सुरू आहे.

गतवर्षीपेक्षा २५ टीएमसी पाणी कमी..जिल्ह्यातील प्रमुख धरणात सध्यस्थितीत ९५.५१ टीएमसीच पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी तो आतापर्यंत १२० टीएमसी इतका होता. कोयनेत ८६ टीएमसी, धोम ११.३४, कण्हेर ७.५१, उरमोडी ९.१८ आणि तारळीत पाच टीएमसीवर पाणी होते. त्यामुळे गेल्यावर्षी पावसाळ्यापर्यंत टंचाईच्या झळा फारशा जाणवल्या नव्हत्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीdroughtदुष्काळ