शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कोयनेतून वीजनिर्मितीसाठी ८२ टीएमसी पाण्याचा वापर, राज्याचा भार कमी करुन केले अनेक जिल्हे प्रकाशमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 17:20 IST

गतवर्षीच्या तांत्रिक वर्षांची तुलना केली असता, पाणीसाठा कमी आहे. मात्र सध्या सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे दीड महिना पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

नीलेश साळुंखेकोयनानगर : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यांसाठी वरदायिनी ठरलेल्या कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या सन २०२२-२३ च्या तांत्रिक वर्षास १ जूनपासून सुरुवात झाली. दि ३१ मे रोजी संपलेल्या तांत्रिक वर्षात कोयना जलविद्युत प्रकल्पातून ३८७०.९० दशलक्ष युनिट वीजनिर्मिती केली आहे. सध्या धरणात २१.३२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

कोयना धरणाचेपाणीवाटप कृष्णा लवादानुसार १ जून ते ३१ मे या कालावधीत तांत्रिक वर्षाचे कामकाज चालते. यामध्ये ६७.५० टीएमसी पाणी वीजनिर्मितीस व उर्वरित सिंचनासाठी वापरले जाते. चालूवर्षी ६७.५० आरक्षित पाणीसाठ्याची मर्यादा ओलांडत तब्बल ८२.६४ टीएमसी पाण्याचा वापर पश्चिमेला वीजनिर्मितीसाठी करण्यात आला.सन २०२१-२२ या तांत्रिक वर्षात सुरुवातीला १ जून २०२१ रोजी धरणात २९.२७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षी काही दिवस ढगफुटीसदृश पाऊस व वर्षभरातील पावसाने तब्बल १६० टीएमसी अशी विक्रमी पाण्याची आवक झाली असून, ती धरणाच्या साठवण क्षमतेच्या दीडपट होती. यामधील पूरस्थितीत सहा वक्री दरवाजांतून ४६.४६ टीएमसी व पायथा वीजगृहातून ७.८४ टीएमसी, तसेच सिंचनासाठी पायथा वीजगृहातून २१.७० टीएमसी, नदी विमोचकातून १.१८ टीएमसी, गळती ०.०२६ टीएमसी असे पूर्वेला एकूण ७७.२० टीएमसी पाणी सोडण्यात आले.तसेच पश्चिमेला वीजनिर्मितीसाठी ८२.६४ टीएमसी पाण्याचा वापर केला. पायथा वीजगृहातून सिंचन व पूर काळात सोडलेल्या २९.५६ टीएमसी पाण्यापासून १२९.९० दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली. पश्चिमेकडील चार टप्प्यांतून ३७४१ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती केली. या तांत्रिक वर्षात एकूण ३८७०.९० दशलक्ष युनिटची वीजनिर्मिती कोयना जलविद्युत प्रकल्पातून झाली आहे.

दीड महिना पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक...

१०५ टीएमसी क्षमता असलेल्या शिवसागर जलाशयात सध्या २१.३२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, मृतसाठा ५.१२ टीएमसी वगळता १६.२० टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी हाच पाणीसाठा २९.२७ टीएमसी इतका होता गतवर्षीच्या तांत्रिक वर्षांची तुलना केली असता, पाणीसाठा कमी आहे. मात्र सध्या सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे दीड महिना पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

कोळशाच्या तुटवड्यावर कोयनेचा आधार...राज्यात कोळशाच्या तुटवड्यामुळे वीजनिर्मिती अडचणीत आली होती. राज्याची विजेची गरज भागविण्यासाठी जलसंपदा विभागाने कोयनेला अतिरिक्त १५ टीएमसी पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यामुळे राज्याचा वीजनिर्मितीचा भार कमी होऊन अनेक जिल्हे प्रकाशमान झाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणelectricityवीजWaterपाणी