शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Satara Rain: तुफान पावसामुळे सातारा जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू, ३५ जण बेपत्ता; नद्यांना मोठा पूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 18:14 IST

Satara landslide, Rain update: पाटण, वाई, जावली, महाबळेश्वर तालुक्यात दरडी कोसळल्या, नद्यांना मोठा पूर. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मागील २४ तासाता नवजा येते ७४६ तर कोयना येथे ६१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तुफान पाऊस सुरु असून या पावसामुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागाला मोठा फटका बसला आहे. सातारा, पाटण, वाई, जावली या तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून यामुळे ८ जणांचा मृत्यू आणि सुमारे ३५ जणांहून अधिक जण बेपत्ता आहेत. आत्तापर्यंत १०० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. (Satara flood, Rain update: 8 died and 35 missing.)

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मागील २४ तासाता नवजा येते ७४६ तर कोयना येथे ६१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्येही ५५० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. महाबळेश्वरमधील आंबेनळी घाट बंद असून पोलादपूरकडे जाणारा रस्ता २० फूट खाली खचला आहे. त्यामुळे पाहणीसाठी गेलेल्या महाबळेश्वरच्या तहसिलदार सुषमा पाटील काही काळ अडकून पडल्या होत्या. कोयना धरणातून सध्या ५० हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत असून कराड शहरात पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे. 

वाई तालुक्यातील देवरुख याठिकाणी ५ घरांवर दरड कोसळली आहे. त्याठिकाणाहून आत्तापर्यंत २७ जणांना वाचविण्यात आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. पाटण तालुक्यातील आंबेघर याठिकाणीही मोठी दरड कोसळल्यामुळे त्याखाली १० ते १२ घरे गाडली गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणाहून ६० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मात्र, १५ लोक बेपत्ता आहे. त्यांचा शोध सुरु आहे. पाटण तालुक्यातीलच मिरगाव याठिकाणीही दरड कोसळल्यामुळे ७ ते ८ घरांचे नुकसान झाले आहे. तर याठिकाणी १२ लोक बेपत्ता आहेत. याठिकाणी एनडीआरएफची टीम पाठविण्यात आली आहे. मात्र, रस्ताच नसल्यामुळे ते देखील हतबल झाले आहेत. तरीही या लोकांना कोयना धरणातून बोटीच्या माध्यमातून सुरक्षित स्थळी आणण्याचे काम सुरु आहे. ढोकावळे या पाटणमधीलच गावातील ४ जण बेपत्ता आहेत. तर उंबर्डी येथेही दरड कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. 

गुरुवारी जावली तालुक्यातील रेंगडी येथे वाहून गेलेल्या चार लोकांपैकी दोघांचे मृतदेह मिळाले असून दोन जण अजूनही बेपत्ता आहेत. तर जोर येथील २ जण पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस