शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

Satara Rain: तुफान पावसामुळे सातारा जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू, ३५ जण बेपत्ता; नद्यांना मोठा पूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 18:14 IST

Satara landslide, Rain update: पाटण, वाई, जावली, महाबळेश्वर तालुक्यात दरडी कोसळल्या, नद्यांना मोठा पूर. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मागील २४ तासाता नवजा येते ७४६ तर कोयना येथे ६१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तुफान पाऊस सुरु असून या पावसामुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागाला मोठा फटका बसला आहे. सातारा, पाटण, वाई, जावली या तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून यामुळे ८ जणांचा मृत्यू आणि सुमारे ३५ जणांहून अधिक जण बेपत्ता आहेत. आत्तापर्यंत १०० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. (Satara flood, Rain update: 8 died and 35 missing.)

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मागील २४ तासाता नवजा येते ७४६ तर कोयना येथे ६१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्येही ५५० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. महाबळेश्वरमधील आंबेनळी घाट बंद असून पोलादपूरकडे जाणारा रस्ता २० फूट खाली खचला आहे. त्यामुळे पाहणीसाठी गेलेल्या महाबळेश्वरच्या तहसिलदार सुषमा पाटील काही काळ अडकून पडल्या होत्या. कोयना धरणातून सध्या ५० हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत असून कराड शहरात पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे. 

वाई तालुक्यातील देवरुख याठिकाणी ५ घरांवर दरड कोसळली आहे. त्याठिकाणाहून आत्तापर्यंत २७ जणांना वाचविण्यात आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. पाटण तालुक्यातील आंबेघर याठिकाणीही मोठी दरड कोसळल्यामुळे त्याखाली १० ते १२ घरे गाडली गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणाहून ६० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मात्र, १५ लोक बेपत्ता आहे. त्यांचा शोध सुरु आहे. पाटण तालुक्यातीलच मिरगाव याठिकाणीही दरड कोसळल्यामुळे ७ ते ८ घरांचे नुकसान झाले आहे. तर याठिकाणी १२ लोक बेपत्ता आहेत. याठिकाणी एनडीआरएफची टीम पाठविण्यात आली आहे. मात्र, रस्ताच नसल्यामुळे ते देखील हतबल झाले आहेत. तरीही या लोकांना कोयना धरणातून बोटीच्या माध्यमातून सुरक्षित स्थळी आणण्याचे काम सुरु आहे. ढोकावळे या पाटणमधीलच गावातील ४ जण बेपत्ता आहेत. तर उंबर्डी येथेही दरड कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. 

गुरुवारी जावली तालुक्यातील रेंगडी येथे वाहून गेलेल्या चार लोकांपैकी दोघांचे मृतदेह मिळाले असून दोन जण अजूनही बेपत्ता आहेत. तर जोर येथील २ जण पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस