शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

Satara Rain: तुफान पावसामुळे सातारा जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू, ३५ जण बेपत्ता; नद्यांना मोठा पूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 18:14 IST

Satara landslide, Rain update: पाटण, वाई, जावली, महाबळेश्वर तालुक्यात दरडी कोसळल्या, नद्यांना मोठा पूर. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मागील २४ तासाता नवजा येते ७४६ तर कोयना येथे ६१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तुफान पाऊस सुरु असून या पावसामुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागाला मोठा फटका बसला आहे. सातारा, पाटण, वाई, जावली या तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून यामुळे ८ जणांचा मृत्यू आणि सुमारे ३५ जणांहून अधिक जण बेपत्ता आहेत. आत्तापर्यंत १०० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. (Satara flood, Rain update: 8 died and 35 missing.)

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मागील २४ तासाता नवजा येते ७४६ तर कोयना येथे ६१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्येही ५५० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. महाबळेश्वरमधील आंबेनळी घाट बंद असून पोलादपूरकडे जाणारा रस्ता २० फूट खाली खचला आहे. त्यामुळे पाहणीसाठी गेलेल्या महाबळेश्वरच्या तहसिलदार सुषमा पाटील काही काळ अडकून पडल्या होत्या. कोयना धरणातून सध्या ५० हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत असून कराड शहरात पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे. 

वाई तालुक्यातील देवरुख याठिकाणी ५ घरांवर दरड कोसळली आहे. त्याठिकाणाहून आत्तापर्यंत २७ जणांना वाचविण्यात आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. पाटण तालुक्यातील आंबेघर याठिकाणीही मोठी दरड कोसळल्यामुळे त्याखाली १० ते १२ घरे गाडली गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणाहून ६० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मात्र, १५ लोक बेपत्ता आहे. त्यांचा शोध सुरु आहे. पाटण तालुक्यातीलच मिरगाव याठिकाणीही दरड कोसळल्यामुळे ७ ते ८ घरांचे नुकसान झाले आहे. तर याठिकाणी १२ लोक बेपत्ता आहेत. याठिकाणी एनडीआरएफची टीम पाठविण्यात आली आहे. मात्र, रस्ताच नसल्यामुळे ते देखील हतबल झाले आहेत. तरीही या लोकांना कोयना धरणातून बोटीच्या माध्यमातून सुरक्षित स्थळी आणण्याचे काम सुरु आहे. ढोकावळे या पाटणमधीलच गावातील ४ जण बेपत्ता आहेत. तर उंबर्डी येथेही दरड कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. 

गुरुवारी जावली तालुक्यातील रेंगडी येथे वाहून गेलेल्या चार लोकांपैकी दोघांचे मृतदेह मिळाले असून दोन जण अजूनही बेपत्ता आहेत. तर जोर येथील २ जण पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस