शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

सातारा जिल्ह्यातील तीन कारखान्यांकडून ७७.४० कोटी एफआरपी थकीत

By दीपक शिंदे | Updated: April 19, 2023 14:28 IST

कारखान्यांनी गाळप होण्यापूर्वी ऊस दर जाहीर केले नाहीत

सातारा : साखर कारखान्यांचा पट्टा पडला असून यावर्षीही जिल्ह्यातील किसनवीर सह कारखाने शेतकऱ्यांना शासनाने ठरवून दिलेल्या एफआरपीपेक्षा जास्त रक्कम देण्यात पिछाडीवर आहेत. कारखान्यांनी गाळप होण्यापूर्वी ऊस दर जाहीर केले नाहीत. त्यामुळे नेमके किती दर मिळणार याची उत्सुकता शेतकऱ्यांना आहे.यावर्षीही ऊस उत्पादकांच्या उसाचे पैसे तीन साखर कारखान्यांनी ७७.४० कोटी थकीत आहेत. यावर्षी कारखान्यांचा पट्टा १५ मार्चपर्यंत पडला आहे. साखर कारखाने बंद झाले असले, तरी एफआरपी देण्यात तीन साखर कारखाने पिछाडीवर आहेत. यापैकी किसन वीर कारखान्याचेच ३४.७५ बाकी आहेत.अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची देय रक्कम १५७.७६ कोटी असून १८२.६५ कोटी रक्कम अदा केली आहे. बाळासाहेब देसाई साखर कारखान्याने रक्कम ५०२८.४९ कोटी असून ५४.२४ कोटी रक्कम अदा केली आहे. किसनवीर सहकारी साखर कारखान्याची देय रक्कम १०८.१० कोटी असून ७३३५.६८ अदा केले आहेत. या कारखान्याची अद्याप थकीत रक्कम ३४.७५ कोटी इतकी आहे.सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची देय रक्कम २१६.५४ कोटी इतकी असून २७३.९३ कोटी अदा केले आहेत. स्वराज्य इंडिया ॲग्रो उपळवेची देय रक्कम ११२.८९ कोटी असून १२७.४४ कोटी अदा केले आहेत. खटाव माण ॲग्रो प्रोसेसिंगची देय रक्कम १४०.१९ कोटी इतकी असून कारखान्याने १६७.६७ कोटी अदा केले आहेत.जरंडेश्वर शुगर ४१३.३३ कोटी इतकी रक्कम देय असून ५४५.५२ कोटी रक्कम अदा केले आहेत. खंडाळा सहकारी साखर कारखान्याची देय रक्कम ३१.९६ कोटी असून ३३.६० रक्कम अदा केली आहे. यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखाना देय २४९.८८ कोटी देय असून ३०३.४० अदा केले आहेत. अथनी शुगर शेवाळेवाडी कारखान्याची देय १०३.९८ असून १५ एप्रिलअखेर १३२.९७ कोटी रुपये अदा केले आहेत.कल्लापाण्णा आवाडे कारखान्याची (श्रीराम, फलटण) देय रक्कम १००.१० कोटी असून ११५.७४ काेटी अदा केले आहेत. जयवंत शुगर्स, धावरवाडी कारखान्याची देय रक्कम १४५.७३ कोटी असून आतापर्यंत १८६.८५ कोटी अदा केले आहेत. ग्रीन पावर शुगरची देय रक्कम १२३.३२ कोटी इतकी असून १०१.०६ काेटी अदा केले आहेत. शरयू ॲग्रो (कापशी) कारखान्याची १७८.१३ कोटी रक्कम देय असून १५७.७४ कोटी अदा केले आहेत.

किसन वीरच्या ऊस उत्पादकांना चिंताअथक परिश्रमांतून किसन वीर कारखाना सुरू करण्यात आला आहे. यावर्षी ४ हजार मे. टन गाळप क्षमता असून ४,६०,५४६ मे. टन ३१ मार्चअखेर गाळप केले आहे. मोठ्या संख्येने ऊस गाळप केला असला तरी ऊस उत्पादकांना वेळेवर बिले मिळावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नियमानुसार गाळप सुरू करण्यापूर्वीच दर जाहीर करायला हवा होता; परंतु कारखान्यांनी नियमबाह्य कृती केली असून शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला नाही. याबाबत साखर आयुक्त कारवाई करत नाहीत. -राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखाने